"१९ वेळा लाँन्च होऊनही 'राहूलयान' पोहोचलंच नाही!"

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा राहूल गांधींना टोला

    05-Mar-2024
Total Views | 97

Rahul Gandhi


मुंबई :
राहूलयान १९ वेळा प्रक्षेपित झालं पण पोहोचलंच नाही. त्यामुळे आता २० व्यांदा प्रयत्न सुरु आहे, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना लगावला आहे. अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मंगळवारी जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात ते बोलत होते.
 
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "मोदीजी भविष्यातील भारतासाठी तयार आहेत. २०३० मध्ये भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणार आहे. २०३५ पर्यंत अंतराळात स्टेशन तयार करायचं आहे, २०३६ मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करायचं आहे आणि २०४० मध्ये भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवून मून मिशन यशस्वी करायचं आहे. एकीकडे मोदीजी चंद्रावर चंद्रयान प्रक्षेपित करत आहे तर दुसरीकडे सोनिया गांधी २० व्यांदा राहूल गांधींना लॉन्च करण्याचा प्रयोग करत आहेत. हे राहूल यान १९ वेळा प्रक्षेपित झालं पण पोहोचलंच नाही. त्यामुळे आता २० व्यांदा प्रयत्न सुरु आहे."

 
"जो पक्ष आपल्या पक्षातच लोकशाही मानत नाही आणि परिवारवादाने कार्य करते तो पक्ष देशाच्या लोकशाहीला मजबूत करु शकेल का? मोदीजींच्या विरोधात एकत्र आलेले इंडी आघाडीतील सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. सोनिया गांधींना राहूल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे, ममतादीदींना त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यांच्यापैकी तुमच्यासाठी कुणीच नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "तुम्हाला वाटत असेल की, २०२४ ची निवडणुक ही मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी असेल. परंतू, या गैरसमजामध्ये राहू नका. येणारी निवडणुक ही २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्याची निवडणुक आहे. २०४७ मध्ये व्यासपीठावर खूप कमी लोकं असतील. पण व्यासपीठापुढे बसलेले सर्व युवक असतील. ही निवडणुक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्याची आहे."

  
महाराष्ट्रात तीन पायांचा ऑटो!
 
"महाराष्ट्रात तीन चाकांचा ऑटो चालतो ज्याचं नाव महाविकास आघाडी आहे. या ऑटोचे तिन्ही चाक पंक्चर आहेत. पंक्चर ऑटो महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राचा विकास करू शकतो," असेही ते म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121