मुंबई : महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अतुल शाह यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या महायूतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावर दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना अतुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली.
हे वाचलंत का? - "काँग्रेसच्या युवराजांनी जाहीरपणे..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांना आव्हान
अतुल शाह म्हणाले की, "महाविकास आघाडीचे लोक ज्यापद्धतीने मुंबादेवी मतदारसंघाची बदनामी करत आहेत. महिलांना आयटम आणि माल बोलत आहेत, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. अरविंद सावंत यांना आम्ही मोदीजींच्या राज्यात दोनदा निवडून आणले. शायना एनसी यांनीसुद्धा त्यांचा प्रचार केला. आज त्यांच्याविषयी ते अपशब्द बोलत आहेत. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही. १५ वर्षे आमदार असूनही इथे कुठलेच विकासकाम झाले नाही. त्यामुळे कुंभारवाडा, कामाठीपुरा आणि उमरखाडीचा नवीन प्रकल्प तयार करून लोकांना चांगली घरे देऊ, असे आम्ही ठरवले आहे."