“रवी जाधव देवा..”, सुबोध भावेने ताली पाहिल्यावर दिली अशी प्रतिक्रिया

    16-Aug-2023
Total Views |
 
subodh bhave
 
 
मुंबई : तृतीयपंथी गौरी सावंत यांनी तृतीयपंथींसाठी दिलेला लढा 'ताली' या वेब मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी जाधव यांनी केला आहे. या मालिकेत अभिनेत्री सुश्मिता सेन हिने गौरी सावंत याची व्यक्तिरेखा साकारली असून सर्वच क्षेत्रातून आणि थाप या वेब मालिकेला मिळत आहे. यावरुनच अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच सुबोधने ‘ताली’ या वेबमालिकेच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत मालिकेतील झळकलेल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य केले आहे. तसेच यातील कथानक आणि लेखन याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाला सुबोध भावे?
 
“श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत ‘ताली’ ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पाहिली. बस बाई बस या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितीज पटवर्धन मित्रा त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही.खूप खूप कौतुक तुझे.
 
हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शितल काळे तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशाणदार, अर्जुन बरन मित्रांनो अशी निर्मिती करायला धाडस लागतं. अप्रतिम. जिओ सिनेमा मनापासून धन्यवाद ही मालिका सादर केल्याबद्दल. रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेला आहे. 
 

taali 
 
 
कृतिका देव गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता.बस इतकेच. श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन”, असे सुबोधने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
‘ताली’ हे नाव कसं आलं?
 
“ ‘ताली’ या वेब मालिकेचे आधीचे नाव ‘अम्मा’ ठेवण्याचा विचार केला होता. त्याव्यतिरिक्त माझ्या मनात ‘गौराई’ असे नाव आले होते, कारण गौरीला कायम आई व्हायचे होते. त्यामुळे गौरी आणि आई दे दोन्ही शब्द एकत्र करुन गौराई हे नाव. पण त्यानंतर सुष्मिता म्हणाली की ही संपुर्ण वेब मालिका ही टाळीवर म्हणजेच तालीवर आधारित आहे. कारण चित्रपटात एक संवाद देखील आहे की ‘मै ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी’. मग सुष्मिता म्हणाली की, आपण या वेब मालिकेचं नाव ताली ठेवूयात का? आणि मग कोणतंही दुमत त्यावर झालं नाही आणि वेब मालिकेचं नाव ताली निश्चित करण्यात आले”, असा मालिकेच्या नावाचा किस्सा रवी जाधव यांनी सांगितला.