२० वर्षांनंतर मृत्युदंडातून सुटका; ३४ कोटी 'दियाह' भरून सौदीने अब्दुल रहीमला दिली माफी, नेमकं प्रकरण काय?

Total Views |
 
Abdul Rahim
 
कोझिकोड: (Abdul Rahim) सुमारे २० वर्षांच्या तुरुंगवासानंतर अब्दुल रहीम, रामनाट्टुकारा (कोझिकोड) येथील रहिवासी, ईदच्या दिवशी आपल्या घरी परतला. रियाधमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहीमला सौदी अरेबियाच्या ऐतिहासिक न्यायप्रक्रियेनंतर या वर्षी २० मे रोजी क्षमादान देण्यात आले आणि त्यानंतरच तो भारतासाठीच्या विमानाने गुरुवारी, २८ मे रोजी रियाधहून कोझिकोडच्या करिपुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. रियाधमधील भारतीय दूतावासाने या पुनर्मिलनाबद्दल आणि त्या देशातील अधिकारी व स्थानिक मल्याळी संघटनांच्या सहकार्याबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. (Abdul Rahim)
 
नेमकं प्रकरण काय? 
 
२८ नोव्हेंबर २००६ रोजी रियाधमध्ये चालक म्हणून कामाला गेलेल्या रहीमला त्याच्या प्रायोजकाच्या १७ वर्षांच्या अर्धांगवायू व श्वसन उपकरणावर अवलंबून असलेल्या मुलाची काळजी घेण्याचे काम सोपवण्यात आले होते. २४ डिसेंबर २००६ रोजी त्या मुलाच्या श्वसन उपकरणाला रहिमचा चुकून हात लागला आणि त्या घटनेनंतर तो मुलगा बेशुद्ध पडला. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रहीमला अटक करण्यात आली आणि २०११ मध्ये सौदीच्या न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयांनीही हा दंड कायम ठेवला. (Abdul Rahim)
 
वर्षानुवर्षे कायदेशीर लढा...
 
वर्षानुवर्षेच्या कायदेशीर लढ्यांनंतर २०२४ मध्ये पीडित कुटुंबाने 'दियाह' अर्थात रक्तमुआवजा म्हणून १५ दशलक्ष सौदी रियाल हा अंदाजे ३४.३५ कोटी रुपयांचा मोठा दंड स्वीकारून रहीमला क्षमा करण्यास सहमती दर्शविली. इस्लामी कायद्यानुसार दियाह ही अशा प्रकरणांमध्ये दिली जाणारी आर्थिक भरपाई आहे. सौदी न्यायालयाने २ जुलै २०२४ रोजी मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली, परंतु त्या आधी राहिलेल्या तुरुंगवर्षांची माफी देण्याऐवजी त्याला अरबी कॅलेंडरनुसार जवळपास २० वर्षांची शिक्षा पूर्ण करावी लागली; ही कारावास मुदत २० मे रोजी पूर्ण झाली. (Abdul Rahim)
 
निधी उभारणीची मोठी मोहिम...
 
रहीमची सुटका आणि त्यासाठी निधी उभारणीची मोठी मोहिम हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नव्हते. 'अब्दुल रहीम वाचवा' या मोहीमेअंतर्गत जगभरातील साध्या नागरिकांनी, परदेशस्थ भारतीय मल्याळी संघटनांनी आणि केरळमधील स्थानिक समितींनी समन्वित प्रयत्न करून निधी गोळा केला. एएनआयच्या अहवालानुसार मार्च अखेरपासून १२ एप्रिल २०२४ पर्यंत देणगींनी एकत्रितपणे सुमारे ४७.८७ कोटी रुपये जुळवले. सौदीअरबातील ६० पेक्षा जास्त मल्याळी संघटना आणि केरळमधील समर्थक गटांनी या प्रयत्नांचे नेतृत्व केले. (Abdul Rahim)
 
दरम्यान, रहीमच्या कुटुंबाने गेल्या दोन दशकात अनेक दुख:द क्षण अनुभवले. त्याच्या अटकेनंतर सहा महिन्यांनी त्यांचे वडील मुहम्मदकुट्टी यांचे निधन झाले. त्याची आई फातिमा यांना विरळ भेटी मिळाल्या; माफीनंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटता आले. तुरुंगवासाच्या काळात त्यांचे परकिय संपर्क मुख्यत्वे व्हिडिओ कॉलद्वारे झाले. (Abdul Rahim)
 
ईदच्या दिवशी घरात परतताना रहीम भावनिक होते; स्थानिक वृत्तसंस्थांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी जगभरातील केरळी नागरिकांचे आणि मल्याळी संघटनांचे आभर मानले. रियाधमधील भारतीय दूतावासानेही रहिम आणि त्यांच्या कुटुंबाला पुनर्मिलनाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि सौदी अधिकाऱ्यांचे सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. (Abdul Rahim)
 
'दियाह' सौदी न्यायप्रक्रियेतील निर्णायक घटक
 
सौदी न्यायप्रक्रियेत 'दियाह' हा घटक निर्णायक ठरला. ज्याद्वारे पीडित कुटुंबाच्या सहमतीने मृत्युदंड किंवा गुन्हेगारी निकालांबाबत आर्थिक समझोत्याने माफी मिळू शकते. रहीमच्या बाबतीतही स्थानिक समुदायाच्या व्यापक पाठिंब्याने आणि मोठ्या आर्थिक प्रयत्नांनी हा मार्ग शक्य झाला. स्थानिक आणि परदेशातील मल्याळी समुदायाने केलेल्या सार्वजनिक निधी संकलनाची आणि कायदेशीर पाठिंब्याची भूमिका या प्रकरणात ठळकपणे दिसून आली. (Abdul Rahim)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com