पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं! होर्मुझ तणावाचा भारताला मोठा फटका; भाजीपाल्याच्या दरातही ५० टक्क्यांनी वाढ...

आखाती तणावाचा थेट परिणाम; मुंबईसह देशभरात महागाई वाढणार

Total Views |
 
Fuel Price Hike India
 
मुंबई : (Fuel Price Hike India) जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारातील वाढत्या अस्थिरतेचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने तेल  कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ३ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. वाढत्या इंधनदरांमुळे वाहतूक खर्च, मालवाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असून त्याचा परिणाम आता भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरही दिसू लागला आहे.(Fuel Price Hike India)
 
मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये प्रति लिटर
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ झाली असून नवीन दर १०६.६८ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ झाली असून आता मुंबईत डिझेल ९३.१४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०७ रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे खासगी वाहनधारक, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रावर अतिरिक्त आर्थिक भार पडू लागला आहे.(Fuel Price Hike India)
 
देशातील महानगरांमध्ये किती वाढले इंधनदर?
 
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७.७७ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. कोलकात्यात सर्वाधिक वाढ झाली असून तिथे पेट्रोल १०८.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. डिझेलच्या दरांमध्येही मोठी वाढ दिसून आली. दिल्लीमध्ये डिझेल ९०.६७ रुपये, कोलकात्यात ९५.१३ रुपये आणि चेन्नईमध्ये ९५.२५ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.(Fuel Price Hike India)
 
महाराष्ट्रातील शहरांमधील पेट्रोलचे नवे दर
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुढीलप्रमाणे वाढले आहेत:
  • मुंबई - १०३.५४ रुपये
  • ठाणे - १०६.८४ रुपये
  • पुणे - १०६.८२ रुपये
  • छत्रपती संभाजीनगर - १०६.३४ रुपये
  • सोलापूर - १०७.१९ रुपये
  • नागपूर - १०७.३७ रुपये
  • नाशिक - १०७.९३ रुपये
  • कोल्हापूर - १०७.४९ रुपये
  • अमरावती - १०८.१४ रुपये
  • रत्नागिरी - १०८.३५ रुपये
  • सिंधुदुर्ग - १०५.५० रुपये
  • यवतमाळ - १०४.९३ रुपये
  • परभणी - १०५.५० रुपये
  • बीड - १०५.४४ रुपये
  • अकोला - १०४.५० रुपये
या दरवाढीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील वाहतूक खर्चातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
हेही वाचा : द्रुतगती महामार्ग प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;विदर्भातील ५४७ कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मंजुरी
 
इंधन महागाईचा आकडा धक्कादायक
 
एप्रिल महिन्यात इंधन क्षेत्रातील महागाईत प्रचंड वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पेट्रोल महागाई दर एका महिन्यापूर्वीच्या २.५० टक्क्यांवरून थेट ३२.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर हाय-स्पीड डिझेलमधील महागाई दर ३.६२ टक्क्यांवरून २५.१९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू, एलपीजी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे उत्पादन आणि वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.(Fuel Price Hike India)
 
तेल कंपन्यांना दररोज हजारो कोटींचा फटका
 
उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, वाढत्या आयात खर्चाच्या तुलनेत किरकोळ विक्री दर बराच काळ स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना दररोज सुमारे १० अब्ज रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून ग्राहकांवर अचानक भार पडू नये यासाठी काही काळ दर नियंत्रित ठेवण्यात आले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर अखेर कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.(Fuel Price Hike India)
 
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा भारताला फटका
 
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. मध्यपूर्वेतील ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. या परिसरातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. या तणावाचा थेट परिणाम भारताच्या आयात खर्चावर झाला असून तेल, गॅस आणि इंधन वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी उत्पादन खर्च, मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर मोठा परिणाम दिसत आहे.(Fuel Price Hike India)
 
मुंबई महानगरात भाजीपाल्याचे दर ५०% वाढले
 
इंधन दरवाढीचा परिणाम आता थेट स्वयंपाकघरावरही दिसू लागला आहे. मुंबई महानगर परिसरात भाजीपाल्याच्या दरात सरासरी ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक २० ते ३० टक्क्यांनी घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.(Fuel Price Hike India)
 
उच्च तापमान, शेतीमधील उत्पादन घट, वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान आणि वाढलेले इंधनदर यामुळे भाजीपाला महागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, कांदा, भेंडी, कोथिंबीर, फुलकोबी आणि हिरव्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.(Fuel Price Hike India)
 
पुढे आणखी दरवाढ होण्याची शक्यता?
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिला आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या तर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुढील काही दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकार आणि तेल कंपन्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता कायम राहिल्यास महागाईचा दबाव आणखी वाढू शकतो.(Fuel Price Hike India)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com