जाळ्यात गुदमरलेल्या चार कासवांची लाडघर गावकऱ्यांकडून सुटका

    11-Mar-2025   
Total Views | 16
entangled sea turtle


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
दापोली तालुक्यातील लाडघरच्या समुद्रात जाळ्यात अडकलेल्या चार समुद्री कासवांना स्थानिक गावकऱ्यांनी मंगळवार दि. ११ मार्च रोजी जीवदान दिले (entangled sea turtle). ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांची सुटका करुन त्यांना पुन्हा समुद्रात सोडले (entangled sea turtle). कोकण किनारपट्टीवर सध्या समुद्री कासवांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने गावकऱ्यांनी केलेले हे बचाव कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. (entangled sea turtle)


 
मंगळवारी सकाळी लाडघरच्या समुद्रात डाॅल्फिनच्या दर्शनाला गेलेल्या बोटीला जाळ्यात अडकलेली कासवे दिसली. त्यांची संख्या चार होती. वाघर प्रकारच्या जाळ्यात ही कासवे अडकली होती. वाघर प्रकारचे जाळे हे समुद्रात टाकून दिवसभरासाठी ठेवले जाते. या जाळीत सागरी कासवाच्या आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या चार माद्या अडकल्या होत्या. अडकलेल्या कासवांना पाहून लागलीच डाॅल्फिन बोट चालकांनी इतर गावकऱ्यांची मदत मागवली. त्यानंतर या चारही कासवांना जाळे कापून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना एक-एक करुन समुद्रात सोडण्यात आले. सलील मोरे, संदीप मोरे, सानीज शिरधनकर, संजय शेट्ये , प्रवीण शेट्ये, प्रीतम बागकर यांनी ही कामगिरी बजावली बजावली. सध्या कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचा विणीचा हंगाम असल्यामुळे अंडी घालण्यासाठी मादी कासवे किनाऱ्यावर येत आहे. अशा परिस्थितीत लाडघरच्या ग्रामस्थांनी या चार माद्यांची केलेली सुटका महत्त्वाची ठरली आहे.
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121