पवारांनी केलेले शिंदेंचे कौतुक हाच राऊतांचा पोटशूळ! मंत्री उदय सामंत यांची टीका

    12-Feb-2025
Total Views | 49
 
Uday Samant
 
नवी दिल्ली : शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक हाच खरा संजय राऊतांचा पोटशूळ आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उदय सामंत म्हणाले की, "ज्या संस्थेने एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला त्यांना ते पात्र वाटले असावेत. शरद पवार साहेबांनादेखील एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार योग्य वाटल्याने ते सत्काराला उपस्थित राहीले आणि त्यांचे कौतुक केले. पण शरद पवार महाविकास आघाडीचे नेते असताना त्यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि त्यांचे कौतुक केले हाच खरा पोटशूळ आहे. स्वत:चे कौतुक आणि सत्कार होत नसल्याने हा पोटशूळ असावा," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार! संजय राऊतांचा थयथयाट
 
हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान!
 
"साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे असे संजय राऊत म्हणाले. परंतू, हा शासनाचा अपमान नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा, साहित्यिकांचा आणि मराठी भाषेचा अपमान आहे. साहित्यिकांनी दलालांची उपमा देणे या गोष्टीचा मी निषेध करतो," असेही उदय सामंत म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121