भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात दाखल!

    12-Sep-2024
Total Views | 152
 
Bhagyashri Atram
 
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी गडचिरोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
 
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. दरम्यान, आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाग्यश्री आत्राम यांना शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक यांच्यात सामना रंगणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  नरिमन पॉईंट ते वांद्रे अंतर अवघ्या १० मिनिटांत! वांद्रे-वरळी सेतुला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण संपन्न
 
याप्रसंगी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, "या क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. येथील रस्त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. शेतकरी, महिला आणि आदिवासींच्या प्रश्नावर बोलायला आमच्या मंत्र्यांकडे वेळ नाही. ते फक्त येतात आणि निघून जातात. त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रात फिरवलं आणि मला गाजर दाखवलं," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121