अजितदादांना राखी बांधण्याबाबत राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
14-Aug-2024
Total Views | 257
मुंबई : अजित पवार राखी बांधायला आणि भाऊबीजेलाही सुप्रिया सुळेंकडे जातील. पण यावर सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात, हे महत्वाचं आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतू, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
"बारामतीमध्ये बहिण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे, हे त्यावेळी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला कळत होतं. पण ही गोष्ट पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळली नाही. याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत. विधानसभा निवडणूकीच्या आधी ते काहीही करु शकतात. लोकसभेत फटका बसल्यावर विधानसभेतसुद्धा त्यांचे पाय मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील. ते भाऊबीजेलासुद्धा स्वत: जातील. पण आता सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न आहे. सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे," असे संजय राऊत म्हणाले. यावर सुप्रिया सुळेंना विचारले असता त्यांनी फक्त 'रामकृष्ण हरी' असे म्हणत यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.