"मुघलांच्या घोड्यांना जसे संताजी, धनाजी पाण्यात दिसायचे तसे..."; मुख्यमंत्री शिंदेंचं टीकास्त्र

    12-Aug-2024
Total Views | 48
 
Shinde
 
मुंबई : मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी विरोधकांना दिसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला हे त्यांना पचत नाही, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर सोडलं आहे. तसेच लाडकी बहिण योजनेवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी पाण्यात दिसायचे तसं त्यांना मी दिसतो. महायूतीचं सरकार स्थापन झालं तरीसुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला हे त्यांना हजम होत नाही. त्यामुळे त्यांना रोज बसता, उठता आणि स्वप्नातसुद्धा मीच दिसतो. पण घटनाबाह्य सरकार म्हणणारे लोक लाडकी बहिण योजनेचे फॉर्म कसे भरतात? कारण ते दुटप्पी आहेत. त्यांना माझ्या बहिणींशी आणि भावांशी काहीही देणंघेणं नाहीये."
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा मान्य आहे का? २४ तासांत जाहीर करा
 
"गेल्या ८ ते १० महिन्यांपासून लाडकी बहिण योजनेची तयारी सुरु होती. त्यामुळे निवडणूका आणि योजना याची सांगड आम्ही घालत नाहीत. आम्ही विकास आणि कल्याणकारी योजना राबवत आहोत. नवीन प्रकल्प सुरु करून त्याला चालना दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू निसटली आहे. त्यामुळे बहिण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी असं झालंय. त्यासाठी ते कोर्टात गेले आणि ही योजना रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टानेसुद्धा माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दिला," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले कीस, "आनंदाचा शिध्याविरोधातसुद्धा कुणीतरी कोर्टात गेलं. पण ते गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. कोविडमध्ये तुम्ही खिचडी हिसकावली पण आता जे तुम्ही पाप करत आहात, त्याचं उत्तर निवडणूकीत द्यावं लागेल. त्यामुळे माझ्या बहिणींनी या कपटी सावत्र बहिणींपासून सावध राहावं. तुम्हाला त्या दीड हजार रुपयांचं मोल नसलं तरी या सर्वसामान्य महिलेला त्याचं मोल आहे. कुटुंबातील स्त्री ही अर्थव्यवस्खेचा कणा आहे. त्यामुळे आम्ही मोफत गॅस सिलिंडर आणि लाडकी बहिण योजना दिली आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121