मुंबई: वर्ल्ड बँकेकडून भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक टिप्पणी आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारतीय अर्थव्यवस्था ६.४ टक्यांच्या ऐवजी ६.६ टक्क्यांनी वाढेल असे वर्ल्ड बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे बँकेने मत व्यक्त केले आहे. ही वाढ वाढत्या लोकांच्या मागणीमुळे,वाढत्या गरजां मुळे वाढत्या भांडवली खर्चामुळे, तसेच खाजगी वापर (Consumption) यामुळे होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच भारता त सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीत मोठी वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला वेग आला असल्याचे वर्ल्ड बँकेने अनुमान व्यक्त केले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी भारताची अर्थव्यवस्था २० बीपीएस पूर्णांकाने वाढत ६.७ टक्क्यांवर वाढेल असे निरिक्षण बँकेने नोंदवले आहे. घटत्या महागाईमुळे व वाढलेल्या शेती उत्पादनामुळे खाजगी वापरात वाढ होऊ शकते व त्यातून अर्थव्यवस्थेला गती येईल असे बँकेला वाटते. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या दरडोई उत्पन्नात देखील मोठी वाढ होऊ शकते.
नुकतीच भारतात लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला ज्यामध्ये भाजपा प्रणित एनडीए सरकार सत्तेवर आले होते. सरकार परतल्याने अर्थव्यवस्थेला वेग व स्थिरता मिळू शकते. बँकेने म्हटल्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील, उत्पादनात, बांधकाम व्यवसाया त अपेक्षेपेक्षा अधिक चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मान्सून पूर्व काळात नुकसान झालेल्या शेतकी उत्पन्नात नुकसान झाले असले तरी ती कसर औद्योगिक क्षेत्रातील वाढीने भरून काढली आहे असे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.
नुकतीच भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेहून अधिक ८.२ टक्क्यांवर वाढली असल्याचे सरकारच्या आकडेवारीत समोर आले होते. यामध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) ने भारताची अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांनी वाढेल असे अनुमान स्पष्ट केले होते तर आरबी आयने अर्थव्यवस्था ७ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच बँकेने म्हटले आहे की आरबीआयच्या २ ते ६ टक्क्यांपर्यंत मर्यादेत महागाई दर राहिले आहेत. आरबीआय महागाई दर ४.५ टक्क्यांवर राहिल असे अनुमान व्यक्त करत होती' असे बँकेने म्हटले आहे.
याशिवाय बँकेने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था स्थिर राहिल असे भाकीत केले आहे. मात्र पूर्वीच्या वर्षांच्या तुल नेत ही स्थिरता कमी असेल अशी टिप्पणी बँकेने केली. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जानेवारी मधील २.४ टक्यांच्या तुलनेत सरासरी २.६ टक्के राहील असे मत व्यक्त केले.