मुहूर्त ठरला! ४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार

    01-Jun-2024
Total Views | 602
 
Jayant Patil
 
मुंबई : ४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
सूरज चव्हाण म्हणाले की, "१० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर सर्व जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक जेष्ठ नेतेदेखील पक्षात येणार आहे."
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक
 
"तसेच ४ जूनच्या निकालानंतर जयंत पाटीलसुद्धा काँग्रेसमध्ये जातील. त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितली आहे. त्यांचा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे ४ जूननंतर शरदचंद्र पवार गट रिकामा होईल आणि तिकडचे अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करतील," असा दावा त्यांनी केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121