"बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये!"

महादेव जानकरांचा सुप्रियाताईंना खोचक टोला

    04-May-2024
Total Views | 319
 
Supriya Sule
 
पुणे : लग्न झाल्यावर बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये, असा खोटक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते सध्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आहेत.
 
शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "बहिणीने लग्न झाल्यानंतर भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये. त्यांनी त्यांच्या घरी जावं, अशी माझी सुप्रियाताईंना विनंती आहे," असा खोचक टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.
 
हे वाचलंत का? -  नसीम खान काँग्रेसचा प्रचार करणार? पक्षश्रेष्ठींकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
 
ते पुढे म्हणाले की, "ज्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी आदिवासींच्या २२ योजना सुरु केल्या. काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी काहीही केलेलं नाही. त्या २२ योजनांना उद्धव ठाकरेंच्या सरकारने एकही रुपयाचं बजेट दिलं नाही. उद्या मी केंद्रात खासदार होणार आहे. त्यावेळी केंद्रातसुद्धा या योजना लागू करण्याची मोदी साहेबांना विनंती करणार. शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी ४० वर्ष राज्यकारभार केला त्यांनी धनगर समाजाला वंचित का ठेवलं?," असा सवालही त्यांनी केला. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121