झोपेचा अधिकार ही मानवाची मुलभूत गरज : मुंबई उच्च न्यायालय

    17-Apr-2024
Total Views | 47
 
Sleep
 
मुंबई : झोपेचा अधिकार ही मुलभूत मानवी गरज असून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी एका जेष्ठ नागरिकाची रात्रभर चौकशी करुन त्याला सकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी न्यायालयाने ईडीला फटकारत हा निर्णय दिला आहे.
 
६४ वर्षीय राम इसरानी यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ७ ऑगस्ट २०२३ रोजी ते ईडीसमोर हजर झाले असताना त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत सांगितले आहे.
 
हे वाचलंत का? -  "आम्ही फुटलो नाही, तर राऊतांच्या समोर गेलो!"
 
यावर न्यायालयाने म्हटले की, "झोपेचा अधिकार ही मानवी मूलभूत गरज आहे आणि ती हिरावून घेणे हे एखाद्या व्यक्तीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. झोपेच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीने याचिकाकर्त्याचे जबाब इतक्या रात्री उशिरा नोंदवले गेले त्याचा आम्ही निषेध करतो."
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121