रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट! बंगालमधून मतीन ताहा आणि मुसविर हुसैन शाजेबला NIA ने घेतले ताब्यात

    12-Apr-2024
Total Views | 142
 NIA
 
कोलकाता : कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पश्चिम बंगालमधून दोन संशयितांना अटक केली आहे. या स्फोटांचे मुख्य आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसविर हुसैन शाजेब हे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयए या दोघांची कसून चौकशी करत आहे.
 
एनआयएने या दोघांना कोलकाताजवळून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही बऱ्याच काळापासून फरार होते. एनआयएने त्यांच्यावर प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ते दोघेही ओळख बदलून येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तो चेन्नईत लपल्याची माहिती समोर आली होती. फिरताना आणि हॉटेलमध्ये राहताना दोघांनी नावे बदलल्याचेही उघड झाले आहे.
 
 
एनआयएने बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुझम्मिल शरीफला अटक केली होती. दहशतवाद्यांनी अब्दुल मतीन ताहा आणि मुवासिर हुसैन यांना लपून शहर सोडण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्याने या दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्यही पुरवले होते. तो सध्या एनआयएच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोटाची योजना आखणारा दहशतवादी अब्दुल मतीन ताहा याने विघ्नेश डी आणि सुमित ही हिंदू नावे धारण केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि राहण्यासाठी तो त्याचा वापर करत असे, अशी माहिती समोर आली आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये जाऊन स्फोट घडवून आणणारा मुस्विर हुसेन हा मोहम्मद जुनैद सय्यद या नावाने ओळखपत्रांवर बनावट कागदपत्रे बनवत होता.
 
 
एनआयएने या दोन फरार दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांच्याविषयी माहिती देण्यास सांगितले होते. हे दोघेही २०२० पासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा समावेश अल हिंद मॉड्यूलमध्ये करण्यात आला होता. एनआयएच्या छाप्यामुळे हे दोन संशायित बेपत्ता झाले होते. तेव्हापासून ते हल्ल्याचे नियोजन करत होते. या दोघांनी मिळून मार्च २०२३ मध्ये बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवून आणला.
 
उल्लेखनीय आहे की दि. १ मार्च २०२४ रोजी बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागात असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात ९ जण जखमी झाले. स्फोटामागील माहिती नंतर समोर आली. यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हापासून एनआयए त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121