तीन बायका मौलानाची फजिती ऐका! पती गायब अन् बिंग फुटलं

    12-Apr-2024
Total Views | 140
 Maulana
 
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. येथे बेपत्ता मौलानाच्या तपास करत असताना पोलिसांना मौलाना त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत सापडला. मौलाना बेपत्ता झाल्याची एफआयआर त्याच्या दोन पत्नींनी दाखल केली होती. मौलानाला तीन बायका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मौलानाला गोंडा येथून सुखरूप शोधून काढले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या सआदतगंजमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दि. १९ फेब्रुवारी रोजी पती मौलाना मंजर अली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. महिलेने सांगितले की, तिचा नवरा दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक घरातून गायब झाला आणि तो परत आलाच नाही. त्याचा मागमूसही नाही.
 
 
यानंतर पोलिसांनी मौलानाचा शोध सुरू केला. दरम्यान, आणखी एका महिलेनेही पोलिस ठाणे गाठून मौलाना बेपत्ता असल्याची तक्राद दाखल केली. तिचा पती मौलाना मंजर अली हा अनेक दिवसांपासून बेपत्ता असून त्याचा शोध लागत नसल्याचा दावाही महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही घटनांमधील साम्य तपासले.
 
दोन्ही महिला ज्या मंजर अलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार करत होत्या, तो पुरुष एकच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्याने दोनदा लग्न केले आहे आणि त्याच्या दोन्ही पत्नींना याची माहिती नाही. त्यानंतर पोलिसांनी मौलानाचा फोन आणि इतर माहिती घेऊन त्याचा शोध सुरू केला.
 
 
पोलिसांच्या शोधात या संपूर्ण कथेला आणखी एक वळण मिळाले. मौलाना मंजर अलीला उत्तर प्रदेशातील गोंडा येथून पोलिसांनी शोधून काढले, मात्र यामध्ये आणखी एक खुलासा झाला आहे. मौलाना मंजर अलीचा पोलिसांनी गोंडा येथून शोध घेतला तेव्हा तो त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत तिथे राहत होता.
 
मौलानाने तीन वेळा लग्न केल्याचे आणि त्यांच्या तीन पत्नींना याबाबत काहीही माहिती नसल्याचे समोर आले. मौलानाने सांगितले की, तो लखनऊहून आपल्या दोन बायकांवर नाराज होता, त्यामुळेच गोंडा येथे तिसऱ्या बायकोपाशी आला होता. मौलाना मंजर अलीला पोलिसांनी नुकतेच त्यांच्या पत्नींच्या ताब्यात दिले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121