धुळे आणि जालन्यासाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित! 'या' दोन जणांना तिकीट जाहीर

    11-Apr-2024
Total Views | 96

Congress 
 
मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असून लोकसभा निवडणूकांना आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, काँग्रेसने मंगळवारी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये धुळे आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
  
काँग्रेसने धुळे लोकसभेसाठी शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. तसेच जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने दोन बड्या नेत्यांना तिकीट दिले आहे. भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे तर जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  वर्षा गायकवाड नाराज? पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली भूमिका
 
जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी भाजपने रावसाहेब दानवे यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता धुळे आणि जालना या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
 
महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप जाहीर झाले असून यामध्ये उबाठा गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर लढणार आहे. यापैकी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने आता आपल्या दोन उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121