वर्षा गायकवाड नॉट रिचेबल! मुंबई काँग्रेसची बैठक रद्द

    10-Apr-2024
Total Views | 223
 
Varsha Gaikwad
 
मुंबई : लोकसभा निवडणुकांची सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसची बैठकही रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
 
बुधवारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, अध्यक्षा वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित झाल्या नाही. त्यामुळे त्यांना अनेक फोनही करण्यात आले. दरम्यान, सकाळपासून त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांनी कुणालाच भेटही दिली नसल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? - माझ्या नादी लागू नका! आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत : प्रकाश आंबेडकर
 
महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप मंगळवारी जाहीर करण्यात आले. मात्र, यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस पाहायला मिळत आहे. या जागावाटपावरून काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच मुंबईतील ४ जागा उबाठा गटाकडे गेल्या आहेत. दरम्यान, सकाळपासून वर्षा गायकवाड कुणाचेच फोन घेत नसल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात नेमकं चाललंय काय? आणि गायकवाडांची पुढची भूमिका काय असेल? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121