संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

    30-Mar-2024
Total Views | 41
Sanjay Nirupam mets CM Shinde


मुंबई : 
  उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे संतप्त झालेले काँग्रेस नेते संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे कळते. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली. अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केल्याचे कळते.
 
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काल बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला. पण त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर खूपच नाराज आहेत, त्यांनी सौम्य भाषेत काँग्रेसची सर्व उतरवली आहे. त्यामुळे मला वाटते की, ते येत्या दोन-तीन दिवसांत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील. जर ते आमच्याकडे आले, तर त्यांचे आम्ही स्वागत करू.



 
संजय निरुपम यांना शिवसेनेने कुठलीही ऑफर दिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते भेटले, पण अद्याप पक्ष प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पण ते जेव्हा येतील, तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.


उत्तर पश्चिममधून उमेदवारीची मागणी
 
- संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. येथील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला उबाठा गटाने तिकिट जाहीर केल्यामुळे ते मुलाला राजकारणात स्थीर करण्याच्या दृष्टीने पावले टाकताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना उमेदवारी दिल्यास पराभव अटळ आहे, ही बाब हेरून एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराची शोधाशोध सुरू केली आहे.
 
- नुकताच अभिनेते गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना येथून उमेदवारी मिळेल, अशा चर्चा असतानाच निरुपम यांच्या भेटीमुळे वेगळ्या समीकरणांचे संकेत मिळत आहेत. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निरुपम यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी ३ लाखांहून अधिक मते घेतली होती. आता महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरल्यास निकाल वेगळा लागू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121