वंचितची पहिली यादी जाहीर! प्रकाश आंबेडकर 'या' मतदारसंघातून लढणार

    27-Mar-2024
Total Views | 88
 prakash ambedkar
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवारांच्या च्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
 
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी महासंघाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात उमेदवार देणार आहोत. याबाबत ३० मार्चला घोषणा केली जाईल."
 
 
पुढे बोलताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टरला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्ही त्यांना जरांगेंना सोबत घेण्यास सांगितले होते. पण महाविकास आघाडीने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
 
प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची देखील घोषणा केली. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार आहेत. त्यासोबतचं भंडारा-गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा चार वाजेपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
वंचितच्या उमेदवारांची नावे
अकोला – प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली- - हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महावितरणचा २० वा वर्धापन दिन भांडुप परिमंडलात उत्साहाने साजरा

महावितरणचा २० वा वर्धापन दिन भांडुप परिमंडलात उत्साहाने साजरा

ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचा व त्याची देखभाल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विलगीकरण करुन २००५ साली महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनी निर्माण करण्यात आल्या. दि. ६ जून २०२५ रोजी महावितरणच्या २० वा वर्धापन दिनानिमित्त भांडुप परिमंडल व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.संजय पाटील सोबत ..

“कुशल मनुष्यबळ हेच महानिर्मितीचे बलस्थान” - राधाकृष्णन बी

“कुशल मनुष्यबळ हेच महानिर्मितीचे बलस्थान” - राधाकृष्णन बी

गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरता कार्यक्षमता वृद्धी आणि तंत्रकुशल होणे गरजचे आहे. मुख्यमंत्री यांचे नेतृत्वामध्ये अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यास महानिर्मिती प्राधान्य देत असून महानिर्मितीचे व्हिजन २०३५ द्वारे आपण शाश्वत हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे प्रतिपादन, राधाकृष्णन बी., अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती यांनी केले. ते महानिर्मितीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त रंगशारदा सभागृहात आयोजित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121