"मनसे आणि रासपच्या येण्याने कोणताही पेच नाही; महायुतीची ताकद वाढणारच आहे"
26-Mar-2024
Total Views |
मुंबई : मनसे आणि रासपच्या महायुतीत ( MNS Jankar Mahayuti ) येण्याने कोणताही पेच निर्माण होणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ सुद्धा नाशिकच्या जागेवर इच्छुक आहेत. या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ इच्छुक असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर छगन भुजबळ यांनी कामासंदर्भात पाच मिनिटे भेटलो होतो. कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. महायुतीमध्ये अनेक जागांवरुन एकमत झाले आहे. आणि नाशिकच्या जागेवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत असही त्यांनी म्हटलं आहे.
मनसेसोबत सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले मनसेच्या महायुतीत येण्याने कोणताही पेच निर्माण होणार नाही. याउलट महायुतीची ताकद वाढणार आहे. रासपचे महादेव जानकरही निश्चितपणे महायुतीतुन निवडणुक लढवतील. ते कोणत्या जागेवरुन त्यावर चर्चेतुन मार्ग निघेल. असही त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महादेव जानकर महायुतीतुन एक जागा लढवतील यावर शिक्कामोर्तब केले आहे.
भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी इच्छुक नसल्याचेही त्यांनी सांगितले. माझी काही मागणी असेल तर ती मी अजित पवार, सुनिल तटकरेंना सांगेन असंही ते या वेळी म्हणाले. शिवसेनेला मिळतील तेवढयाच जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. आणि आपलं मत सांगणं म्हणजे भांडण आहे अशा अर्थ होत नाही असंही यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.