रामाने सीतेला विक्रीसाठी खुल्या बाजारात ठेवले होते, सोनम वांगचूक यांचे वादग्रस्त विधान

    20-Mar-2024
Total Views | 117
ladakh-activist-sonam-wangchuk
 
 
नवी दिल्ली :    ‘रामाने सीतेला खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवले’, असे वादग्रस्त विधान लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केले आहे. दरम्यान, सोनम वांगचूक यांनी आपल्या हवामानाच्या निषेधाचे समर्थन करण्यासाठी हिंदू देवांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचे दिसून येत आहे. सोनम वांगचूक हे हवामान बदलाबरोबरच लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करण्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
 
दरम्यान, सोनम वांगचूक हे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने लोकशाही प्रतिनिधित्व देण्यासोबतच सहाव्या शेड्यूल अंतर्गत लडाखच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी करत अनेक स्थानिक लोकांना सहभागी केले आहे. दि. १८ मार्च रोजी एका मुलाखतीदरम्यान देवी सीतेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
 

वांगचुक म्हणाले, “मोदी सरकार असे राम निघाले आहे की, ज्याने सीतेला रावणापासून वाचवले पण नंतर तिला खुल्या बाजारात विकले.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना वांगचुक यांनी भाजपवर हल्ला चढविला असून लडाखला राज्याचा दर्जा देण्याचे  निवडणूक आश्वासन पूर्ण न करण्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना सोनम वांगचुक यांनी प्रभु रामचंद्र व देवी सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.

गेल्या १३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ करत असलेल्या सोनम वांगचुक यांनी सांगितले की, “राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर येथील लोकांना मी इतके आभारी कधीच पाहिले नव्हते. तसेच, असे करताना केंद्र सरकारने आम्हाला एका समस्येतून वाचवले पण दुसऱ्या अडचणीत आणल्याचेही वांगचुक यावेळी म्हणाले.






 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121