राज ठाकरेंनी बोलवलं तरीही परत जाणार नाही : वसंत मोरे

    12-Mar-2024
Total Views | 93

Vasant More


पुणे :
मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून राज ठाकरेंनी बोलवलं तरी परत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबाबत अनेक खुलासे केलेत.
 
वसंत मोरे म्हणाले की, "आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून मी पुणे शहरात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. पण माझ्या शहरातील काही पदाधिकारी कधीही इच्छूक नसताना निवडणुक जवळ आल्यावर इच्छूकांची यादी वाढत गेली. राज ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते. यामध्ये पुणे शहराची जबाबदारी असलेल्या लोकांनी या अहवालात शहरात मनसेची स्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती जाणुबूजून राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली."
हे वाचलंत का? - वसंत मोरे मनसेतून बाहेर 'या' पक्षातर्फे लोकसभा लढविण्याची शक्यता!
 
"तेव्हापासूनच पुणे शहरात मनसे लोकसभा निवडणुक लढवू शकत नाही, असा दृष्टीकोन निर्माण झाला. मी एकनिष्ठ असूनही वारंवार माझ्यावरच अन्याय होत आहे. मी ज्या लोकांसोबत पुणे शहरात माझ्या राजकीय जिवनातील १५ वर्षे घालवली, तेच पदाधिकारी मला तिकीट मिळू नये यासाठी नकारात्मक अहवाल पाठवत आहेत. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करणं मला जमणार नसल्याने मी सगळ्या पदांचा राजीनामा देत स्वत:च्या हाताने परतीचे दोर कापले आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "मी वारंवार या सगळ्या गोष्टी नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण त्यांना त्या कळल्या नाहीत. पुणे शहरात लोकसभा लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरेंकडेसुद्धा वेळ मागितली होती. परंतू, तेसुद्धा यासंदर्भात बोलले नाहीत. माझा वाद कधीही राज साहेबांसोबत किंवा मनसेसोबत नव्हता. परंतू, ज्या चुकीच्या लोकांच्या हातात हे शहर दिलं आहे त्यांच्याशी माझा वाद आहे. यापुढे मला बोलवलं तरीही मी जाणार नाही. मी माझे परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत परत जाणार नाही. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत मी माझी भुमिका जाहीर करेन," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121