"महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर! मोठा गँगवॉर सुरु!"

    12-Mar-2024
Total Views | 2978

MVA


मुंबई :
महाविकास आघाडीमध्ये मोठा गँगवॉर सुरु आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत खोटं बोलत असल्याचे म्हटले होते. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत आणि राहुल गांधींवरही टीका केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "काही महिन्यापासून मी जे काही बोलतोय तेच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. संजय राऊत हे कॅमेरासमोर खोटं बोलतात, खोटी माहिती देतात आणि खोटा आव आणतात. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आतमध्ये जी परिस्थिती आहे त्यात मोठा गँगवॉर सुरु आहे. एकमेकांवर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. म्हणजेच महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही."
हे वाचलंत का? - "निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा गटाचा फुफाटा होणार!"
 
"संजय राऊत हे बाहेर पत्रकार परिषदेत बोलत असताना आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही मान देतो, असं सांगतात. पण आता प्रकाश आंबेडकरांनी स्वत:च्या तोंडाने स्पष्ट केलंय की, भांडुपचा शकुनी मामा कुणाचाच नसून खोटं बोलणारा आहे," असे ते म्हणाले.
 
राहूल गांधींचा पायगुण!
 
नितेश राणे पुढे म्हणाले की, "राहुल गांधींचा पायगुण खुप चांगला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी ज्या ज्या राज्यात पाऊल ठेवलं आहे तिथे तिथे एकतर त्यांचा मित्रपक्ष त्यांना सोडून गेला आहे किंवा काँग्रेसमधून कुणीतरी फुटलं आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एकतर महाविकास आघाडीला भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल किंवा काँग्रेसमध्ये भुकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे. त्यांच्या बैठकांना काहीही अर्थ राहिलेला नाही," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121