वर्षाअखेरीस तब्बल ६५१ ख्रिस्ती कुटुंबांची घरवापसी!

    31-Dec-2024
Total Views | 67

Gharvapsi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chhattisgarh Gharwapsi News)
छत्तीसगडच्या सकती येथे तब्बल ६५१ ख्रिस्ती कुटुंबांनी घरवापसी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ सनातन धर्मात प्रवेश केला आहे. हे कुटुंब सुरुवातीला हिंदूच होते, मात्र काही कारणास्वत ते धर्मांतरणास बळी पडले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. भाजप नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबांची घरवापसी झाली आहे.

प्रबल प्रताप सिंह जुदेव हे बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सानिध्यात काम करणारे व अखिल भारतीय घरवापसी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कुटुंब दोन पिढ्यांपासून या कार्यात गुंतले असून हजारो कुटुंबांना त्यांनी सनातनमध्ये परत आणले आहे. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासह अनेक हिंदू संत सहभागी झाले होते.
 
यावेळी प्रबल प्रताप सिंह जुदेव म्हणाले, “सनातन संस्कृतीला सर्वात मोठा धोका छद्म हिंदूंपासून आहे. आपल्या हिंदू समाजात राहणारे हे क्रिप्टो ख्रिश्चन फसव्या पद्धतीने धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि स्लीपर सेलसारखे काम करतात. त्यांचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.”
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121