नवी दिल्ली : ‘भारतीय मुस्लिमांना स्वतंत्र मातृभूमी हवी आहे’, असे वादग्रस्त विधान जय प्रकाश विद्यापीठाचे प्राध्यापक खुर्शीद आलम यांनी केले आहे. प्रा. आलम यांच्या देशविरोधी सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) खुर्शीद आलम यांच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, दि. ०२ जानेवारी २०२४ रोजी प्राध्यापक खुर्शीद आलम यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय मुस्लिमांना स्वतःसाठी वेगळे राष्ट्र हवे आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, "मी दोन्ही सरकारांना आवाहन करत आहे की भारतीय मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून स्वतंत्र मातृभूमी हवी आहे,", असे वादग्रस्त विधान आलम यांनी केले आहे.