पश्तून नेत्याची पाकिस्तानी लष्कराला धमकी; म्हणाला, 'बंगालींनी तुमची पँट काढली आम्ही तुमची...'
20-Aug-2023
Total Views |
मुंबई : पाकिस्तानामध्ये वेगवेगळे गट स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पश्तून, बलूच आणि इतर मुस्लिम जातींवरील अत्याचाराविरोधात शुक्रवारी (१८ ऑगस्ट २०२३) निदर्शने झाली. राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायालयासमोर पश्तून नेत्यांनी आयोजित केलेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी पश्तून नेत्याने पश्तूनांचा आवाज ऐकला नाही तर स्वातंत्र्यासाठी युद्ध होईल, अशी धमकी दिली आहे.
या निदर्शनावेळीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये, 'पश्तून तहफुज मूव्हमेंट (पीटीएम)'चे प्रमुख मंजूर पश्तीन हे भाषण करताना दिसत आहेत. ते म्हणाले की, "आता एक गोष्ट होईल, एकतर आम्हाला हक्क द्यावे लागतील किंवा स्वातंत्र्यासासाठी युद्ध होईल."
"Manzoor Pashteen asserts that unless the rightful rights of the Pashtun community are acknowledged, he envisions a movement for independence from Pakistan." #PashtunRightspic.twitter.com/nAcFBg0MMb
पाकिस्तानी नेत्यांना लष्कराचे गुलाम ठरवत मंजूर पश्तीन पुढे म्हणाले की, येथील नेते लष्कराचे गुलाम आहेत. तालिबान पाकिस्तानच्या विविध भागात हल्ले करत आहे. यामागे लष्कराचा हात आहे. पश्तीन पुढे बोलताना म्हणाले की, “आम्हाला इतर कोणत्याही रुपात इस्लामाबादला येण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानी लष्कराचा फक्त गुंडगिरीवर विश्वास आहे. मग पश्तून बघा, आम्ही निंदकांची काय अवस्था करतो. बंगाली लोकांनी त्याची पँट काढली होती. पण पश्तून त्यांची चमडी काढतील.
पश्तूनांच्या या आंदोलनात पाकिस्तानचे माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या पक्षाची प्रमुख नेता शिरीन मजारी यांची मुलगी इमान झैनब मजारी यांनीही सहभाग घेतला. यावेळी इमान झैनब मजारी म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांना लष्कर जबाबदार आहे. ते खरा दहशतवादी आहेत. एवढेच नाही तर इमानने पाकिस्तानी लष्कराविरोधात 'ये जो दहशतगर्दी है, इससे पीछे वरदी है' अशा घोषणा दिल्या.
पश्तून तहफुज मूव्हमेंट (पीटीएम) प्रमुख मंजूर पश्तीन यांनी बलुच, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाबमधील उपेक्षित वर्गांना रॅलीत सामील होण्यासाठी आणि एकत्र येण्याचे आवाहन केले होते. 'इस्लामाबाद जलसा' नावाच्या या आंदोलनाचा उद्देश प्रामुख्याने विविध जातींच्या लोकांवरील खोट्या केसेस आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणे हा होता.