नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानची फाळणी होऊन जवळपास आठ दशके लोटली आहेत, पण लाखो लोक अजूनही फाळणीच्या भीषण काळात मागे राहिलेल्या आपल्या प्रियजनांना सापडतील अशी आशा बाळगून आहेत. पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडॉरमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे फाळणीच्या वेळी विभक्त झालेले भाऊ-बहीण ७६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी सुरिंदर कौर आणि पाकिस्तानी पंजाबमधील साहिवाल येथील रहिवासी मोहम्मद इस्माईल हे १९४७ मध्ये फाळणीदरम्यान वेगळे झाले होते. ते २०२३ मध्ये पाकिस्तानच्या करतारपूर कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा भेटले होते.
इस्माईलने सांगितले की, फाळणीपूर्वी ते जालंधरच्या शाहकोट शहरात राहत होते. सुरिंदर कौर ही त्यांची चुलत बहीण होती, फाळणीच्या वेळी दोन्ही कुटुंबे विभक्त झाली. भेटल्यावर दोघेही भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. करतारपूर कॉरिडॉर आणि सोशल मीडियामुळे या दोघांची भेट शक्य झाली आहे. इस्माईलने सांगितले की, काही काळापूर्वी त्यांचा व्हिडिओ एका स्थानिक यूट्यूबरने बनवला होता जो व्हायरल झाला होता.
यानंतर ऑस्ट्रेलियातील सरदार मिशन सिंग यांनी सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन्ही कुटुंबांशी संपर्क साधून पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही देशांमधील राजकीय समस्यांमुळे व्हिसा मिळण्यात अडचणी येत होत्या.यासाठी करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग तयार करण्यात आला होता, जेथे भारतीयांना व्हिसाशिवाय पाकिस्तानमधील करतारपूर साहिबलाही जाता येईल. या सुविधेचा फायदा घेत जालंधर येथील सुरिंदर कौर पाकिस्तानात पोहोचली जिथे इस्माईलही पोहोचला होता. यावेळी दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुरिंदर कौर शीख आहे, तर मोहम्मद इस्माईल मुस्लिम आहे. याचे कारण असे असू शकते की पाकिस्तानात गेल्यानंतर इस्माईलला आपला शीख धर्म सोडून मुस्लिम व्हावे लागले कारण पाकिस्तानमध्ये धार्मिक आधारावर छळ सुरू आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांनी करतारपूर येथे अखेरचा श्वास घेतला. येथे एक भव्य गुरुद्वारा बांधला आहे. ते भारतीय सीमेच्या अगदी जवळ आहे. भारतीय भाविकांना या गुरुद्वाराला भेट देता यावी, यासाठी २०१९ मध्ये पाकिस्तानच्या मदतीने कॉरिडॉरची स्थापना करण्यात आली होती.