शिवसेनेतर्फे मुंबईत मालवणी पॅटर्न राबविण्याचा डाव !

विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी हिंदूंचा गळा दाबण्याचे सेनेचे प्रयत्न ; मुंबई भाजप अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढांचे शिवसेनेवर गंभीर आरोप

    18-Jan-2022   
Total Views | 119
 
lodha ji
 
 
 
मुंबई : भायखळ्यातील आग्रीपाडा परिसरात प्रस्तावित असलेल्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार ही जागा उर्दू भाषा केंद्रासाठी आरक्षित नव्हती मात्र स्थानिक प्रशासन आणि महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जागेवर उर्दू भाषा केंद्राची उभारणी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांसह काही राजकीय पक्षांच्या वतीने केला जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी भाजप नेत्यांसह या जागेची मंगळावर, दि. १८ जानेवारी रोजी पाहणी केली. यावेळी आ. मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावर 'दै. मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, भाजप नेते मधू चव्हाण, वॉर्ड 207 च्या स्थानिक भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे यांच्यासह भायखळा परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
आग्रीपाडा परिसरात प्रस्तावित असलेल्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीवर स्थानिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर आपली भूमिका काय ?
'ही सर्व जागा आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होती. मात्र राजकीय हेतूसाठी आणि अल्पसंख्यांच्या तुष्टीकरणासाठी स्थानिक नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काही महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा घाट घातला आहे. मुळात उर्दूसाठी कधी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाऊ शकत नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक हे भवन या ठिकाणी उभारू देणार नाहीत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिकांच्या पाठीशी उभी आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मी स्वतः, भाजपचे सर्व नेते, विहिंप आणि बजरंग दलाचे सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते आम्हा सर्वांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. आमच्या विरोधाला न जुमानता जर या ठिकाणी हे काम असेच सुरु राहिले तर त्यांना हे प्रकरण नक्कीच महागात पडेल, हे शिवसेनेने लक्षात घ्यावे.'
 
 
 
स्थानिकांच्या आरोपानुसार या परिसरात उर्दू भाषेसाठी ४ ते ५ उर्दू भाषा संबंधित केंद्र आहेत. मग अशा परिस्थिती आणखी एका नव्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीमागे काय हेतू असू शकतो ?
'शिवसेनेला केवळ मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी संपूर्ण मुंबईमध्ये मुस्लिम वस्त्यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. आताच्या शिवसेनेला मुस्लिम मतांची हाव आहे आणि यातूनच ते हिंदू समाजाचा गळा दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत.'
 
 
 
मुंबईतील मराठी शाळा आणि विद्यार्थी संख्येतील घट चिंताजनक आहे. अशा स्थितीत मराठीला पाठबळ देण्याऐवजी इतर भाषांना प्राधान्यक्रम देणे या मागे नक्की कुठला अजेंडा असू शकतो ?
'केवळ मतांसाठी मराठीचा मुद्दा पुढे करणाऱ्या शिवसेनेला हा प्रश्न विचारला जाणे अधिक संयुक्तिक ठरेल की मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी ते काय भूमिका घेत आहेत. या प्रश्नावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आणि लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे.'
 
 
 
केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी हे प्रकार सुरु आहेत या आरोपात कितपत तथ्य वाटते ?
'हे पूर्ण सत्य आहे. केवळ अल्पसंख्यांक समाजाच्या तुष्टीकरणासाठी आणि त्यांच्या मतदानासाठी ही लाचारी स्वीकारणे हा शिवसेनेचा नवीन अजेंडा आहे. मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आम्ही चालू देणार नाही. निवडणुकीच्या राजकारणासाठी जे काही करायचे ते शिवसेनेने अवश्य करावे मात्र, या जागेवर कुठल्याही किंमतीवर आम्ही उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी आम्ही होऊ देणार नाही.'
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121