'तुतारी' पक्ष्याचा नवी मुंबई ते चीन प्रवास; शहरातील पाणथळींचे महत्त्व अधोरेखित

    09-Jun-2021   
Total Views | 274
bird_1  H x W:



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाअंतर्गत नवी मुंबईच्या पाणथळीवर रिंग केलेला कर्ल्यु सॅण्डपायपर (बाकचोच तुतारी) पक्षी चीनमध्ये सापडला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'अंतर्गत हा अभ्यास सुरू असून त्याअंतर्गत या पक्ष्याच्या पायाला रिंग लावण्यात आले होते. या पक्ष्याने मुंबई ते चीन असा प्रवास केल्याने स्थलांतरित पक्ष्यांकरिता मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जागा महत्त्वाच्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय.
 
 
 
हिवाळ्यामध्ये दक्षिण आशियात आणि प्रामुख्याने भारतात स्थलांतर केलेल्या पक्ष्यांनी आता पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात केली. या स्थलांतरादरम्यान त्यांच्याकडून होणारा हजारो किलोमीटरचा प्रवास उलगडत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी रिंगिग आणि टेलिमेट्री पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये पक्ष्यांच्या पायात लोखंडी गोलाकार रिंग किंवा रंगीत फ्लॅग लावले जातात, तर सॅटेलाईट लोकेशनच्या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाचे ठिकाणे सांगणारे ट्रान्समीटर त्याच्या शरीरावर बसविण्यात येते. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून शतकापेक्षा अधिक काळापासून भारतामध्ये पक्ष्यांना रिंग लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईमध्ये स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांच्या पायात २०१८ पासून रिंग लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांनी मुंबई महानगर क्षेत्रात आजपर्यंत १० हजार पक्ष्यांना रिंग केले असून त्यामध्ये ३६ प्रजातींचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रज्ञांना प्रथमच मुंबईतून आंतरराष्ट्रीय सीमांपलीकडे गेलेल्या पक्ष्यांची नोंद मिळाली आहे.
 
 
 
प्रभू यांनी १८ मार्च, २०१९ रोजी नेरूळच्या पाम बीच रोडवरील टी.एस.चाणक्य इमारतीच्या मागे असलेल्या पाणथळीवर एका पक्ष्याला रिंग केले होते. कर्ल्यु सॅण्डपायपर नावाच्या या पक्ष्याच्या पायात लोखंडी रिंग लावण्याबरोबरच 7N5 सांकेतिक क्रमांक असलेला फ्लॅग लावण्यात आला होता. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वर्षभरानंतर म्हणजेच १३ जानेवारी, २०२० रोजी हा रिंग केलेला पक्षी प्रभू यांना भांडूप उद्दचन केंद्रामध्ये पुन्हा सापडला. म्हणजेच त्यावेळी या पक्ष्याने आपल्या स्थलांतराचे एक चक्र पूर्ण केले होते. हा पक्षी पुन्हा पकडला गेल्यामुळे प्रभू यांनी त्याची नोंद करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले. त्यानंतर आता हा पक्षी चीनच्या टियांजिन प्रातांमध्ये आढळून आला आहे. ६ मे रोजी हा पक्षी चीनच्या टियांजिन प्रातांतील टांगू मिठागरामधील पाणथळीवर दिसून आला. सध्या तो आपल्या विणीच्या ठिकाणी स्थलांतर करत आहे. या माध्यमातून मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जमिनी दूर देशातून स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121