'वांद्रे वंडरलँड' कार्यक्रमाला अखेर स्थिगिती

२ जानेवारीपर्यंत महोत्सव नागरिकांसाठी बंद

    30-Dec-2021   
Total Views |
 
bandra-wonderland-new-year
 
 
 
मुंबई : मुंबईतील वाढती कोरोनास्थिती आणि ओमायक्रॉन बाधितांच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वी शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत वांद्रे येथे ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'वांद्रे वंडरलँड' नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियम पायदळी तुडवत साजरा करण्यात आलेल्या या कार्मक्रमावरून वादंग झाल्यानंतर अखेरीस या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. 'एएनआय'ने दिलेल्या बातमीनुसार शहरातील वाढत्या कोरोनास्थितीचा अंदाज घेत प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
२ जानेवारीपर्यंत महोत्सव नागरिकांसाठी बंद
वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावरून विविध राजकीय पक्षांनी घेतलेलया आक्षेपांमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी मुंबईत सुमारे २५०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यातच वांद्रे वंडरलँड प्रकरणामुळे सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची आणि शहरातील रुग्णसंख्येची दखल घेत रविवार, दि. २ जानेवारी २०२२ पर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
 
 
'मुख्यमंत्र्यांच्या वांद्रेत पार्ट्यांचे आयोजन'
मुंबईतील वाढत्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येचा अंदाज घेत पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांतर्फे शहरात ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यावर विविध निर्बंध लावले होते. ख्रिसमस आणि नववर्षाची आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या आणि त्यातील माणसांच्या संख्येवरही मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते. तथापि, मुंबईत अनेक ठिकाणी विशेषकरून मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजतर्फे उंची पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार्ट्या आयोजित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून अनेक इमारतीही सील करण्यात आल्या होत्या. शहरात निर्बंध लावलेले असताना देखील मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड असलेल्या वांद्रे मतदारसंघात असे आयोजन केले जात असेल तर ही बाब नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता विविध सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळींकडून केली जात आहे.
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121