#ओवीLive - भांडी घासा तणाव घालवा!

    23-Oct-2016   
Total Views | 3

भांडी घासा तणाव घालवा!

“आई, हा Florida University चा शोध निबंध बघ काय आहे – मन लावून भांडी घासल्याने stress कमी होतो. उत्साह वाढतो. आणि आनंदी वृत्ती वाढते.”, प्रिया आईला एका नवीन प्रयोगाबद्दल सांगत होती. “फक्त भांडी घासाण्याने नाही तर, कुठलेही साधे किरकोळ वाटणारे काम मन लावून केले की हेच फायदे मिळतात. केर काढणे, घर आवरणे, furniture पुसणे, कपाट लावणे, गाडी पुसणे, बाथरूम घासणे, भाजी आणणे, फिरायला जाणे ... काही पण. रोजची फालतू वाटणारी कामे मन लावून केल्याने anxiety पळून जाते, असे हा paper सांगतो.”

“गधडे, इतकी वर्ष मी काय हे कानडीत सांगितल का तुला? घसा खरवडून हेच तर सांगितलं की ग! तू मन लावून थोडं काम केलं असतंस ना, तर तुझाच काय, माझा पण stress कमी झाला असता!”, आईने मागच्या अनेक वर्षातला त्रागा बोलून दाखवला.

“तसं नाही ग आई! आता कसं हे प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे ना ते सांगते. ते काय म्हणतात की हातातल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या. जसं भांडी घासातांना पाण्याचा स्पर्श अनुभवा. साबणाचा वास घ्या. भांड्याचा आकार feel करा. भांडे घासून झाले की नीट वाळायला ठेवा. वगैरे. असं केल्याने मनाला आनंद मिळतो!”, प्रिया म्हणाली.

“अक्का, हे आपण मुलांना सांगून सांगून दाताच्या कण्या झाल्या नाही?”, आई म्हणाली.

“हो ग हो! मी पण घरी असं बोलून बोलून थकले! ते असो. प्रिया आधी तुला ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिले आहे ते सांगते. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ठरलेल्या वेळी ठरलेले नित्यकर्म करणे ही आपली जबाबदारी तर आहेच, पण तो आपला अधिकार सुद्धा आहे. जसं डोळे आपोआप पाहतात किंवा दिवा लावला की प्रकाश पडतो, हे जितके सहज आहे, तितके नित्यकर्म करणे हे स्वाभाविक आहे.

“काही जणांना असे वाटते की, काय गरज आहे उगीच झीजायाची? त्यापेक्षा सरळ सगळ्या कामाला गडी लावून आपण स्वस्थ बसावं! पण जो माणूस नित्यकर्म करत नाही त्याचे जीवन कंटाळवाणे होते. निरुत्साही होते.

“भोजनाने जसे शरीर तृप्त होते, तसं नित्य – नैमित्तिक कर्म करून मन तृप्त होते. मात्र ते कर्म फळाची अपेक्षा न करता, भक्ती भावाने, लक्ष देऊन करावे. नित्यकर्म मनुष्याला सात्विक आनंद देते. मनाची शक्ती देते. आणि हा आनंदच त्या कामाच्या फलापेक्षा मोठे बक्षीस आहे!” 



 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121