भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफने ऑपरेशन सिंदूरचा एक नवा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. ज्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळ कसे अचूक लक्ष्य करून हल्ले केले हे दाखवले आहे. पाकिस्तानच्या या तळांद्वारे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत शिरकावासाठी पाठविण्यात येणार होते. हा कट भारतीय सीमा सुरक्षा दलाने उधळून लावला आहे.
Read More
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून त्याविषयी कोणासही पुरावे मागण्याची जागा ठेवली नसल्याचा टोला विरोधी पक्षांना लगावला.
( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल.
भारताने प्राचीन काळातच वैज्ञानिक प्रगती केली असल्याचे असंख्य पुरावे आहेत. अध्यात्मिक असो अथवा वैज्ञानिक असो, भारताने त्यात मोलाची कामगिरी केली. मात्र, पाश्चात्य इतिहास लेखक कायमच याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. भारताच्या प्रगतीला नाकारून, उणेपणा मात्र ते ठळकपणे जगासमोर मांडतात.
नुकतेच ‘भारतीय न्याय संहिता २०२३’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’, आणि ‘भारतीय साक्ष मसुदा (विधेयक) २०२३’ हे कायदे संसदेच्या सभागृहात सादर करून सर्वसामान्य लोकांच्या समोर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्वांच्या अभ्यासासाठी वेळ लागणार आहे. परंतु, या तिन्ही मसुद्यांना वरकरणी पाहून, प्रथमदर्शी लक्षात आलेले मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
“आगामी काळात भारतीय दंडसंहिता (आयपीसी), फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा (एव्हिडन्स अॅक्ट) यामध्ये व्यापक बदल होणार आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले. दिल्ली पोलिसांच्या ७६व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बिहारची राजधानी पाटणा येथील दिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट झाला. शुक्रवारी दि. १ जून रोजी झालेल्या स्फोटात एक हवालदार जखमी झाला होता. मोठी बाब म्हणजे हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात आणला होता, जेणेकरून तो संबंधित खटल्याच्या न्यायाधीशांना दाखवता येईल. मात्र त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाला.
ज्ञानवापीच्या वादग्रस्त रचनेत शिवलिंग सापडल्यानंतर आता मथुरेच्या शाही इदगाह मशिदी परिसराबाबत बाबत नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही मशिदीला तात्काळ टाळेबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिथले पुरावे नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.
शाह अतिशय स्पष्टपणे म्हणाले की, “गुन्हेगारांच्या मानवाधिकारांची चिंता करणारी भाषा बोलण्यात येत आहे. मात्र, बलात्कारपिडीता अथवा दरोड्याचा बळी ठरलेल्यांच्या मानवाधिकारांचे काय?, त्याची चिंता कोणी करायची?” त्यामुळे कायद्याचे पालन करणार्या देशातील नागरिकांच्या मानवाधिकारांची काळजी मोदी सरकारला असून, त्यासाठीच कायद्यामध्ये बदल केला जात आहे