पश्चिम बंगालमधील संदेशखाली (Sandeshkhali) येथे झालेल्या एका महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले, ज्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते दिलीप मलिक आरोपी आहेत. या प्रकरणाच्या तपासात आधीच विलंब झाल्यामुळे न्यायमूर्ती तीर्थंकर घोष यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
Read More
संदेशखलीचा कसाई म्हणून प्रसिद्ध असलेला टीएमसी नेता शाहजहान शेख याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. संदेशखली येथील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. याविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
पश्चिम बंगालसह देशाला हादरून सोडणाऱ्या संदेशखाली प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. संदेशखाली येथे दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख आणि इतर सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये अद्यापही भीतीचे आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. टीएमसीचा बाहुबली गुंड नेता शाहजहान शेख आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचाराच्या रोज नवनवीन कथा समोर येत आहेत, ज्याने लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहबे. या संपूर्ण प्रकरणात आता टीएमसीचे गुंड पुन्हा सक्रिय झाले आहेत.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे छापा टाकला. सीबीआयने संदेशखळी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सीबीआय जानेवारी २०२४ मध्ये संदेशखळी येथे ईडी टीमवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सीबीआयने जमीन बळकावणे आणि लैंगिक छळाच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासासंदर्भात पाच आरोपीसह इतर अज्ञातांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
पश्चिम बंगालच्या संदेशखाली मधील प्रकरण ताजे असतानाच. तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांवर पुन्हा एकदा स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने आरोप केला आहे. बुधवारी १० एप्रिलला रात्री टीएमसी कार्यकर्त्यांनी घर जाळल्याचा आरोप भाजप कार्यकर्ता सुब्रता मंडल यांनी आरोप केला आहे. टीएमसी कार्यकर्त्यांनी ( TMC goons ) महीलांना साड्या वाटुन मतदानासाठी आमिष दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशीचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी यांसारखे अनेक आरोप आहेत. सदर प्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नेत्यांनी पोसलेल्या, माफिया गुंडांनी स्वत:ला विधानसभा आणि लोकसभेवर निवडून आणले होते. लोकप्रतिनिधी असल्याचा गैरफायदा घेत, या गुंडांनी आपली साम्राज्ये ठिकठिकाणी स्थापन केली. पण, योगी आदित्यनाथ यांनी राज्याची सूत्रे सांभाळल्यावर, या सर्व माफियांची रवानगी एक तर तुरुंगात तरी झाली किंवा जहन्नुममध्ये! आता बंगालमधील जनता उत्तर प्रदेशच्या या धोरणाची पुनरावृत्ती आपल्या राज्यात कधी होणार, त्याची प्रतीक्षा करीत आहे.
संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले की, राज्यातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली तर त्याची जबाबदारी संपूर्ण राज्य सरकारची आहे. न्यायालयाने म्हटले की, "संदेशखालीमध्ये घडलेल्या घटनेत १ टक्केही सत्यता असेल, तर ते अत्यंत लाजिरवाणे आहे. कारण बंगाल महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य असल्याचा दावा सांख्यिकीय अहवालात सरकारने केला आहे."
संदेशखालीतील आमच्या माता – भगिनींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, ही मोदी गॅरंटी असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहिर सभेत केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमधील जमुई आणि प. बंगालमधील कुचबिहार येथे जाहिर सभेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, संदेशखालीमध्ये आमच्या माता आणि भगिनींवर अनन्वित अत्याचार झाले आहे. सभ्य समाजास मान खाली घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. मात्र, संदेशखालीमध्ये अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना
पश्चिम बंगालच्या बशीरहाटहून भाजपच्या उमेदवार असलेल्या रेखा पात्रांनी त्यांच्या सोबत तृणमुलच्या गुंडांनी केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान काही माध्यमांशी चर्चा करताना बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. जनसत्ताच्या रिपोर्टनुसार, रेखा पात्रांनी भीषण वास्तव सांगितले आहे. गावातील महिला वर्ग जो त्यांच्या सोबत उभा आहे. या गावातील वातावरण पहाता या त्यांनी आपल्या मुलींना दूरच्या नातेवाईकांकडे पाठविले आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाची देशभरात दखल घेण्यात आली होती. आता यात एक नवी माहिती समोर आली असून टीएमसी खासदार नुसरत जहाँ रील बनविण्यात व्यस्त असल्याचे एका व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. जेव्हा खासदार नुसरत जहाँ रील बनवण्यात व्यस्त होती तेव्हा रेखा पात्रा तिच्या लहान मूल घेऊन शेख शाहजहान आणि संदेशखालीतील टोळीशी भांडत होती, असे व्हिडीओत तिसत आहे.
भाजपने रविवारी, दि. २४ मार्च २०२४ बंगालमधील १९ उमेदवारांची यादी जाहीर केली. संदेशखली येथील रहिवासी असलेल्या बशीरहाटमधून भाजपने रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीच सर्वप्रथम संदेशखलीमध्ये महिलांसोबत होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता.
तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख याने आमचे शारिरिक, सामाजिक आणि आर्थिक शोषण केले आहे. त्याला कठोर शासन न झाल्यास आमचे प्राण धोक्यात आहेत. त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आर्त हाक संदेशखालीतील पीडितांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली आहे.
विश्व संवाद केंद्र आयोजित लक्ष्य या सोशल मीडिया कॉन्फ्लुएंसचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंदा बोस (आयएएस निवृत्त) यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्राचे विघटन आणि नाश करणाऱ्या नरेटिव्ह विरोधात लढा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "सोशल मीडियावर अशा प्रकारची बहुतांश नरेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सत्याची खरी माहिती दिली पाहिजे. भारत हे महान राष्ट्र आहे. हे सत्य साऱ्या जगाने ओळखले आहे. मात्र, आपल्या देशात
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दि. १० मार्च रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली. हे सर्व उमेदवार पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या वेगवेगळ्या जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा बशीरहाट (संदेशखाली) लोकसभा मतदारसंघाची आहे. येथून टीएमसीने विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांना हटवून माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना तिकीट दिले आहे. त्यात तृणमूलचा नेता शाहजहान शेख आणि त्यांच्या गुंडांना संदेशखाली अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील संदेशखाली हे गाव हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि अनाचाराच्या निमित्ताने चर्चेच्या केंद्रस्थानी आले. बातम्या, लेख, अग्रलेखांतूनही ‘संदेशखालीचे सत्य’ दै. ‘मुंबई तरुण भारत’ने वारंवार वाचकांसमक्ष मांडले. पण, हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित नाहीच. नुकत्याच समोर आलेल्या सत्यसोधक समितीच्या अहवालातूनही संदेशखालीशी संबंधित आणखीन काही मन विषण्ण करणार्या बाबी समोर आल्या आहेत. त्याचेच मांडलेले हे भीषण वास्तव...
'संदेशखालीतील महिला खरंच पीडित आहेत, हे कसं मान्य करायचं, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार असणाऱ्या रचना बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येकजण या घटनेला लैंगिक छळ असे म्हणत नाही आहे. तसेच, आम्हाला कसे कळेल की जे लोक पीडित असल्याचा दावा करत आहेत तेच खरे बळी आहेत, असेही रचना बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत कुर्ला येथे 'घे भरारी' संस्थेकडून या प्रकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. 'घे भरारी' संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा भालेराव यांच्या नेतृत्वात कुर्ला टर्मिन्स बाहेर संदेश खाली प्रकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी, दि. ५ मार्च २०२४ सीबीआयला शेख शाहजहानला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी दिली. शाहजहानला सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश येताच ममता बॅनर्जी यांच्या सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शेख शाहजहानला सीबीआयकडे सोपवण्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार विरोध करत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला दणका दिला.
तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत महिलांविषयी घोर पाप घडले आहे. मात्र, असे कृत्य करणाऱ्यांना वाचविण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्यामुळे संदेशखालीच्या नारीशक्तीचे वादळ संपूर्ण बंगालमध्ये घोंघावणार आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारासात येथे भाजपतर्फे आयोजित नारीशक्तीवंदन अभिनंदन कार्यक्रमास संबोधित केले. या कार्यक्रमास संदेशखालीमधील महिलादेखील उपस्थित होत्या.
नराधम शाहजहान शेखचे गुंडाराज, महिलांवरील अनन्वित अत्याचार आणि जमिनी बळकावण्याच्या उद्योगामुळे चर्चेत आलेले प. बंगालमधील संदेशखाली हे गाव. सहा सदस्यीय ‘सत्यशोधक समिती’लाही पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, न्यायालयात धाव घेऊन, मगच संदेशखालीत प्रवेश करता आला. या समितीच्या निरीक्षणातून संदेशखालीचे ‘पराजित’ न झालेले आणि ‘परेशान’ करणारे हे सत्य...
पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यातील संदेशखाली मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. याचं गावातील महिलांनी तृणमुल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख यांच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला आहे. यानंतर संदेशाखालीच्या महिलांना न्याय देण्यासाठी विरोधकांनी आवाज उठवला आहे. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न बंगालमधील ममता सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाने आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखाली प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचा नेता आणि संदेशाखालीमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा आरोपी शाहजहान शेखने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या विरोधात जमाव भडकवून त्यांच्याविरोधात हिंसा घडवून आणली होती, अशी कबुली त्याने दिली आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहानला अखेर अटक केली आहे. दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या ५५ दिवसांपासून तो फरार होता. दरम्यान, त्याच्या अनेक जवळच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली होती, मात्र शाहजहानचा शोध लागू शकला नाही. गुरुवारी बंगाल पोलिसांनी त्याला मिनाखान परिसरातून पकडले.
राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाने संदेशखाली येथे नुकत्याच झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला आहे. समितीने राज्यातील महिलांच्या दुर्दशेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करणारा ठराव संमत केला असून केंद्र सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. (Sandeshkhali Samiti Baithak)
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते शंकर सरदार यांच्या घरावर आता महिलांनी हल्ला केला आहे. यापूर्वी टीएमसी नेते अजित मैती यांना चप्पलने मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले असून शेख शाहजहानला तात्काळ अटक करण्यास सांगितले आहे.दरम्यान संदेशखालीच्या पोलपारा येथील टीएमसी नेते शंकर सरदार यांच्या घरावर महिलांनी हल्ला केला. त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शंकर सरकार या
संदेशखाली येथील बलात्कार आणि जमीन बळकावल्याच्या आरोपात तथ्य गोळा करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहा सदस्यीय पथकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला कोलकाता येथील लाल बाजार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारने सर्वप्रथम पश्चिम बंगालमधील संदेशखालीतून उठलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र आता भाजपच्या संघर्षामुळे ते बॅकफूटवर आले आहेत. भाजपने ज्या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पीडितांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळेच आता स्थानिक लोक टीएमसी नेत्याविरोधात तक्रार करण्यासाठी जमले आहेत. ६ दिवसात ७०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये पुन्हा एकदा महिलांचा रोष उसळला आहे. आंदोलकांनी टीएमसी नेते शेख शाहजहान यांच्या साथीदाराला मारहाण केली. अजित मेती यांनी शेख शहाजहानचे नाव घेऊन स्थानिक लोकांना गुंडगिरी करून त्यांच्या जमिनी बळकावल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक लोकांचा विरोध पाहता दोन ग्रामपंचायत क्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. लोकांनी अजितच्या घराचीही तोडफोड केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण बंगालने गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी संदेशखाली अत्याचार प्रकरणी रस्त्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पश्चिम बंगालच्या राज्यपालांना निवेदन सादर करत संदेशखालीमध्ये न्याय आणि शांततेची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. (ABVP on Sandeshkhali)
महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी शेख शाहजहानच्या सहा ठिकाणांवर ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. शाहजहानवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेख शाहजहान अटकेच्या भितीने सध्या फरार आहे. ईडीच्या पथकाने दि. २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी अवैधरित्या जमीन बळकवल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा फरार नेता शेख शाहजहान याच्या ठिकाणांवर धाड टाकली.
संदेशखाली प्रकरणातील आरोपी सिराज शेख याची मालमत्ता संतप्त नागरिकांनी आगीच्या हवाली केली आहे.संदेशखाली प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये स्थानिक लोकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. शुक्रवारी स्थानिकांनी तृणमूल काँग्रेस नेता आणि या प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याचा भाऊ सिराज शेख यांची मालमत्ता जाळली. बेरामजदूर येथील कचारी भागात शाहजहान शेखच्या भावाच्या या मालमत्तेला आग लावण्यात आली. यापूर्वी गुरूवारीदेखील सिराज शेख याच्या मालमत्तेला आग लावण्यात आली होती.
"पश्चिम बंगालमधील संदेशखळीमधून तेथील सत्ताधारी पक्ष आणि मुस्लीम गुंड यांच्यातील असलेल्या परस्पर संबंधांच्या गंभीर बातम्या समोर येत आहेत. "पश्चिम बंगालमधील संदेशखालीमधून तेथील सत्ताधारी पक्ष आणि मुस्लीम गुंड यांच्यातील असलेल्या परस्पर संबंधांच्या गंभीर बातम्या समोर येत आहेत. संदेशखालीतील वाढत्या हिंसाचारास राज्य सरकारचे संरक्षण आणि खुला पाठींबा मिळत आहे. त्यामुळे पीडितांना न्याय देण्यासाठी आणि अराजकतेला आळा घालण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे!", असे विधान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्
लोकशाहीत लोकनियुक्त सरकारचे महत्त्व असले, तरी असे सरकार हे लोकहिताचेच निर्णय घेईल, याची खात्री नाहीच. काश्मीरमधील लोकनियुक्त सरकारही ना काश्मीरवरील दहशतवादाचे सावट दूर करू शकले, ना राज्याचा विकास करू शकले. आज हा प्रदेश भयमुक्त होऊन विकासाच्या महामार्गावर धावत आहे. आज प. बंगालची स्थिती काश्मीरपेक्षा वेगळी नाही. म्हणूनच प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची किंवा या प्रदेशाला थेट केंद्रशासित करण्याची मागणी जोर घेताना दिसते.
'रिपब्लिक बांगला' टीव्ही वृत्तवाहिनीचे पत्रकार संतू पान यांना पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. संदेशखळी, उत्तर २४ परगणा येथील महिलांवरील बलात्काराच्या आरोपांबाबत ते वार्तांकन करत होते. संतू पानला पश्चिम बंगाल पोलिसांनी लाईव्ह कव्हरेजदरम्यान पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला दोन्ही बाजूच्या दोन पोलिसांनी पकडले आणि नंतर टोटो (ई-रिक्षा) मध्ये नेले. या काळातही त्यांनी वार्तांकन सुरूच ठेवले.
संदेशखली अत्याचार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला फटकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये, पीडितांनी त्यांच्या निवेदनात स्पष्टपणे तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याचे नाव आरोपी म्हणून घेतले असताना तरीही तो मुक्त कसा? असा सवाल कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला केला.
बंगालच्या संदेशखळीनंतर आता हावडा जिल्ह्यातील पाचला शहरात महिलांचा एक मोठा समुहाने रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हे निदर्शन सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ झाले. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शेख खलील अहमद यांच्यावर गावकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्याच विरोधात महिला आंदोलन करत होत्या. याठिकाणी मोठ्या संख्येने महिला झाडू आणि काठ्या घेऊन निदर्शने करण्यासाठी आल्या होत्या.
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना येथील संदेशखळी गावातील महिलांच्या छळाच्या प्रकरणावर दि. १९ फेब्रुवारी २०२४ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची बंगालबाहेर चौकशी व्हावी आणि पीडितांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यासोबतच राज्य पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेस नेते शिबू हाजराला पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे अटक करण्यात आली आहे. इतके दिवस तो संदेशखळी येथील त्याच्याच ठिकाणावर लपून बसला होता. अटकेनंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे. दरम्यान, पीडित महिलेने बलात्कार प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे नोंदवले, त्यानंतर शिबू हाजराविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बलात्काराचे कलमही जोडण्यात आले आहे. या सगळ्यात मुख्य आरोपी टीएमसी नेता शेख शाहजहान अजूनही फरार आहे. तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे
पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचारप्रकरणानंतर ममता सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंधवडे निघाले आहेत. हिंदूविरोधी व्यक्तींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेची उमेदवारी दिल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. तसेच, संदेशखाली हिंसाचारावर तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून या प्रकरणावर कोणतीही ठोस पावले उचलली नाही आहेत.
संदेशखळी येथील पीडित महिलांना भेटण्यासाठी गेलेल्या सहा महिला खासदारांना पश्चिम बंगाल पोलिसांनी रोखले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सहा महिला खासदार दि. १६ फेब्रवारी २०२४ मंगळवार पीडित महिलांची भेट घेणार होत्या, पण बंगाल पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही.
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या बातम्या मीडियात आल्यानंतर आता बंगाल पोलिसांनी आपले वक्तव्य जारी केले आहे. संदेशखळीवर माध्यमांनी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. स्थानिक महिलांवर बलात्कार झाल्याची त्यांची कोणतीही तक्रार नाही, त्यामुळे अशा बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर आम्ही कारवाई करणार आहोत, अशी माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली.
पश्चिम बंगाल आणि हिंसाचार हे आता अतूट समीकरण. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीही कोलकात्यातील नोआखालीमध्ये भयानक हिंसाचार उफाळून आला. महात्मा गांधी यांनाही तो थोपविता आला नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही नक्षलवादी आणि माओवादी आंदोलनांनी हिंसाचाराचे सत्र सुरूच ठेवले. पण, मार्क्सवादी आघाडीच्या राजवटीत जितका हिंसाचार होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक हिंसाचार आता तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत होत आहे. पण, त्यावर बहुतांशी प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे आणि कथित बुद्धिजीवी मूग गिळून बसले आहेत.