मागेच त्यांच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, अंगावर डास बसला, तर त्याला ते उडवू शकत नव्हते, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या उजव्या की डाव्या हाताने ब्रॅण्ड मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की, ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिपाणी का वाजवली नाही? हा काय प्रश्न आहे का? तसेही त्यांना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? त्यांच्यासोबत तुतारीवाले काका होते ना? तुतारी असताना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? तर अशीही ब्रॅण्ड मुलाखत येणार आहे बरं का? आम्ही काही जळत नाही, उलट आम्ही खूश आहोत, लोकांचे पुन्हा एकदा ब्रॅण्ड मनोर
Read More
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
दादरस्थित जुन्या महापौर बंगल्याचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार. दि. १ जून रोजी नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर उबाठा गटाचे एक नेते टीका करतात. पण आज बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उबाठा गटाला खडेबोल सुनावले. सोमवार, २६ मे रोजी नांदेड येथे आयोजित शंखनाद सभेत ते बोलत होते.
विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच अशा शब्दात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उबाठा गटाच्या नाशिक येथील मेळाव्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवण्यात आले. यावर आता सर्वत्र टीका होत आहे.
Woqf Bill लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर झालेल्या चर्चेत शिवसेना खासदार श्रीकात शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. संसदेत उबाठा गटाने मांडलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर तुम्ही असं भाषण केलं असतं का? असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ते दिल्लीतील संसदेत २ एप्रिल रोजी बुधवारी बोलत होते.
राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ‘सामना’ वृत्तपत्रात काम करत असताना, उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना एका मुलाखतीत ‘राजकारणात कधी येणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘तुम्ही राजकारणाच्या चिखलात कधी उतरणार आहात, हे विचारायचे आहे का तुम्हाला?’ असा उलट प्रतिप्रश्न केला. आज त्याच विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या सकाळच्या बांगेने, संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. बरं राऊत यांनी
बाळासाहेबांच्या विचारांचे मारक त्यांचे स्मारक बांधू शकत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. गुरुवार, २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बीकेसी येथे आयोजित शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतू, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींकडून बाळासाहेबांच्या जयंतीबद्दल साधे ट्विटही करण्यात आले नाही.
ठाणे : ठाणे शहराच्या तसेच शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सेना नेते सतीश प्रधान ( Satish Pradhan ) यांचे रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ठाणे महापालिकेचे पहिले महापौर म्हणून त्यांनी ठाण्याच्या परिवर्तनाचा पाया रचला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ते संघटनेत कार्यरत होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, कृती आणि तत्त्वज्ञान जनतेकडून अतिशय आदराने स्वीकारले गेले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला स्मारकाच्या रुपात अजरामर करण्याच्या जन इच्छेचा मान ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 27 डिसेंबर 2016 रोजी बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थेची स्थापनाही करण्यात आली. मात्र, बाळ
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
मुंबई : 'मातोश्री' म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर ( Matoshree ) जमायचे. पण, बाळासाहेबांच्या पश्चात 'मातोश्री'चा रुतबा कमी झाला. 'मातोश्री'वरील राजकीय दरबाराची जागा 'किचन कॅबिनेट'ने घेतली. त्यांचेचे निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्वशून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागले नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर
मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. अनेक जिल्ह्यांतून उबाठा गट हद्दपार झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना याबाबत आधीच ताकीद दिली होती. बाळासाहेब म्हणाले होते, “उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल...” बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. “माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली होती,” असेही त्यांनी सांगितले. सलग
निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोठ्या तोर्यात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधीच्या मुखातून बाळासाहेबांविषयी दोन शब्द तरी बोलवून दाखवा, या दिलेल्या आव्हानाची पार्श्वभूमी त्याला होती. पण, नको तिथे धाडस केले की, अंगाशी येते अशी अवस्था प्रियांका गांधी यांची झाली आहे. बाळासाहेबांबाबत भाषणात बोलताना प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब आणि काँग्रेस यांची विचारधारा भले भिन्न असेलही,
ठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणुकीत उभे ठाकलेले शिवसेना महायुतीचे उमेदवार विकास पुरुष प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी मतदारांना दुप्पट विकासाची हमी दिली आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता. अडीच वर्षे घरात बसून सगळ्या कामांना स्थगिती देणारे आणि विकासकामे बंद पाडणारे सरकार आणखी काही काळ राहिले असते तर हा महाराष्ट्र १०-२० वर्षे मागे गेला असता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ज्या पध्दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचे प्रवक्ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीचा घाट घातला गेला. जिल्ह्यातील विविध जागांसाठी ६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये सर्वाधिक ११ इच्छुकांनी नाशिक मध्यची जागा मिळण्यासाठी मुलाखत देत, आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस आमदार भाई जगतापांनी उपरणे गळ्यातच ठेवावे, असा आग्रह धरला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. संजय राऊतांनी आपल्या गळ्यातील उपरणे शेवटपर्यंत काढले नाही. माध्यमांनी उद्धव ठाकरेंची कृती कॅमेऱ्यात टिपल्याने त्यांना सारवासारव करावी लागली. आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो, त्याकडे विरोधकांचे जास्त लक्
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरीचे रुपडे आता दिवसेंदिवस बदलते आहे. अशावेळी राज्यातील सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित करण्याचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या 'हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक' अभियानांतर्गत 'अ' वर्ग राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या बसस्थानकाला ५० लाखाचे बक्षीस मिळाले असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
१९८३ साली स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त बाबांनी ‘अनादि मी, अनंत मी’ या स्वा. सावरकर जीवनदर्शन महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा, विचारांचा, दूरदर्शीपणाचा बारीक अभ्यास करून गुंफलेली, संस्कृतप्रचुर मराठीतील निवेदनात्मक संहिता, त्याला जोड देऊन वेगवान बनविणार्या संगीत रचना, सावरकरांच्या आयुष्यातील लक्षणीय प्रसंगांना जीवंत करणारे नाट्यप्रवेश, तडफदार पोवाडे, सावरकर स्वरचित गझल, कवने, कविता, भाषणे यांचा एकत्रित मिला
जनादेशाचा अवमान करून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त्यांनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल देशाने अनुभवली आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतलेली ‘मशाल’ ज्यावेळी पंज्याचा प्रचार करायला लागली त्याचवेळी जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला. आता भारतीयांचा विश्वास देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर आहे, या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सु
पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेनंतर उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १८ मे रोजी नालासोपाऱ्यात येत असल्याची माहिती भाजपा वसई विरार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान राज्यातील 13 मतदारसंघांत सोमवार, दि. 20 मे रोजी पार पडेल. तत्पूर्वी सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून मोदी सरकारविरोधी वातावरणनिर्मितीसाठी अफवांचे पेव फुटले आहे. तेव्हा, सुज्ञ मतदारांनी या अफवांना, खोट्या प्रपोगंडाला आणि नॅरेटिव्हला कदापि बळी न पडता, कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे पाठ फिरवू नये. मतदानातूनच राष्ट्राला सर्वोपरी बळकट करणारे सरकार आपण निवडून देणार आहोत, याचे कायम भान ठेवावे.
राज ठाकरे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. ‘लाव रे तो व्हिडिओ’चा शुभारंभही त्यांनी ठाण्यातील सभेत केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, व्हिडिओद्वारे पोलखोल केली. राज ठाकरे महायुतीत प्रत्यक्षरित्या सामील नसले, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सलग तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.ठाण्यातील सभेत तर त्यांनी अक्षरशः उबाठा गटाची पिसेच काढली.
बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता सहकाऱ्यांना घरगडी समजलं जातं, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार नाही त्यांची शिवसेना खरी शिवसेना होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंना खुर्चीसोबतच पैशाचाही मोह असून त्यांनी शिवसेनेच्या खात्यातून जनतेचे ५० कोटी रुपये काढले आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं त्यामुळे मी कधीच त्यांचं कर्ज विसरु शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. गुरुवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं भाष्य केलं.
बाळासाहेब नेहमी म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली आणि पक्ष गेला, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. सांगलीतील धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उबाठा म्हणजे बाप नंबरी आणि बेटा दस नंबरी, मुखात भवानी आणि पोटात बेईमानी, अशा प्रवृत्तींचा पराभव करण्याचे आवाहन शिंदेंनी केले. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केले. ठाकरे मला नीच म्हणाले, हा माझा आणि माझ्या समाजाचा अपमान आहे, असेही शिंदे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद उपसभापदी नीलम गोऱ्हे, प्रतापराव जाधव, राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, किरण सरनाईक, श्वेताताई महाले, ज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवरही
ठाकरे सरकारच्या काळात धीम्या गतीने सुरू असलेल्या दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला फडणवीस शिंदे सरकारच्या काळात गती मिळाली. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यावर खालच्या थराला जाऊन टिका केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्या डाँ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटीच, त्यांच्या अंतिम इच्छेनुसार मराठी जनतेने उद्धव ठाकरे यांना बराच काळ सांभाळून घेतले. पण, निव्वळ सत्तेच्या लालसेपायी उद्धव ठाकरे यांनी स्युडो सेक्युलर पक्षांशी आघाडी केल्यावर त्यांची हिंदुत्त्ववादी मराठी माणसाशी जोडलेली नाळ तुटली. मुख्यमंत्रिपदाच्या अल्पकाळात उद्धव ठाकरे यांनी सेक्युलर रंग उधळून महाराष्ट्रात पुन्हा जी मोगलाई आणली, ती गोष्ट मराठी जनता विसरू म्हटले तरी विसरू शकत नाही.
१९८७ सालं, विलेपार्ल्यात पोटनिवडणुक जाहिर झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून रमेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या प्रचार सभेसाठी आलेले बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार' हे १९८७ ला प्रभू यांच्या प्रचार सभेतील हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द होते. त्यावेळी शिक्षा म्हणून आयोगाने १९९५ ते २००१ पर्यत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. पण आता त्यातून
मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून एक शब्द घेतला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडी आघाडीच्या सभेत भाजपवर केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
सांगली आणि भिवंडी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यावर अडून बसल्याने अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या जागांचा हट्ट न सोडल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असतानाच १७ उमेदवारांची यादी जाहीर केली काँग्रेसचे इच्छुक उमेदवार sangli congress आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु विशाल पाटील यांनी मात्र सांगली काँग्रेसचीच असं म्हणत बंडाचा पवित्रा घेतला आहे.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ हा आवाज कानावर पडताच क्षणी साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यांसमोर उभे राहतात. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुकरण करीत, या घोषवाक्याद्वारे शिवसैनिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याला कधीही ’ठाकरे’ शैलीची धार चढली नाहीच. केवळ ‘बाळासाहेबांचा पुत्र’ म्हणून उद्धवरावांनी मान-सन्मान पदरात पाडून घेतला खरा; पण त्यांना तो फारकाळ टिकवता आला नाही.
आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज ठाकरेंना बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. यावेळी ते भाविक झाले आणि ही प्रतिक्रिया दिली आहे.
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
नाशिकमध्ये होणारं अधिवेशन हे उबाठा नावाच्या बचत गटाची ही छोटीशी सभा आहे. या सभेतून कोणालाही मार्गदर्शन होणार नाही, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. मंगळवारी नाशिकमध्ये उबाठा गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आहे. याविषयी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टिका केली आहे. ठाकरेंनी १३ जानेवारीला कल्याणच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे य़ांच्यावर घराणेशाहीवरुन टिप्पणी केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिले आहे. ठाकरेंनी आधी घराणेशाहीची व्याख्या स्पष्ट करावी, त्यांना स्वतःच घर आबाधित ठेवता आल नाही. सर्वांना त्यांनी बाहेर काढल, माझं कुटुंब माझी जवाबदारी एवढच त्यांना ठाऊक आहे अस एकनाथ शिंदेंनी म्हटल आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० जानेवारी २०२४ ला दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. ठाकरे गटाचे १४ आमदार किंवा शिवसेनेचे १६ आमदार यांच्यावर या निकालाअंतर्गत कारवाई होऊ शकते.
काँग्रेस पक्षाचा विचार स्वीकारून व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करून केवळ मतांच्या लांगूनचालनाकरिता उद्धव ठाकरे राम मंदिराच्या विरोधातील भूमिका घेत आहेत. असे करून ते हिंदू समाजाचा अपमान करीत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करीत आहेत.'
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज यांनी बाळासाहेबांचा आत्मा आज रडत असेल. त्यांचा स्वतःचा मुलगा सोनिया चरणी लीन झाला अस वक्तव्य केल आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. राममंदीराच्या उभारणीत महाराष्ट्राच्या लोकांच मोठ योगदान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
राजकारणात विरोधकांनी एकमेकांच्या नकला करणे, हे जनतेच्याही म्हणा आता चांगलेच अंगवळणी पडलेले. अगदी बाळासाहेबांपासून ते राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठांवरील नकलांनी खोचक राजकीय टिप्पण्या आणि एकमेकांना रीतसर चिमटेही काढले. नक्कलच काय तर व्यंगचित्रांच्या फटकार्यांतूनही बाळासाहेबांनी राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पण, नक्कलबाजीतून होणारी ही राजकीय शेरेबाजी नेमकी कोणाची, कुठे आणि कोणासमोर करावी, हेही तितकेच महत्त्वाचे.
‘डिंपल पब्लिकेशन’ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानिमित्ताने ‘डिंपल’चे सर्वेसर्वा अशोक मुळे यांचा जीवनप्रवास...