भारताच्या लोकसंख्येमध्ये वनवासी समुदायाचा वाटा सुमारे नऊ टक्के आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल ५२ वर्षांनंतर १९९९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये ही वस्तुस्थिती सांगितली आहे. याद्वारे वनवासी समुदायाच्या उत्थानासाठी भाजप प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा प्रचार भाजपतर्फे केला जात आहे.
Read More