(Biological Smuggling) अमेरिकेत जैविक सुरक्षा व्यवस्थेवर धोका निर्माण करणाऱ्या आणखी एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. चीनमधील वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करत असलेल्या चेंग्झुआन हॅन या महिला संशोधकाला अमेरिकेत जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एफबीआयने ८ जून रोजी डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन विमानतळावर ही कारवाई केली.
Read More
Ranya Rao कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राण्या रावला सोन्याच्या तस्करी प्रकरणात जबाबदार धरण्यात आले आहे. या घटनेने कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. वाढत्या दबावाखीलल राज्याच्या सरकारने सोमवारी सायंकाळी हे प्रकरण सीआयडी विभागाकडे दाखल केले. एका दिवसानंतर, गृह विभागाकडे बंगळुरूमधील केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस अधिकाऱ्यांच्या संभाव्य चुका आणि कर्तव्यावर निष्कळजीपणाकडे बोट दाखवत भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
India-Bangladesh border त्रिपुराच्या सिपाहिजला जिल्ह्यात सुमारे २०-२५ बांगलादेशी तस्करांनी भारत-बांगलादेश सीमेकडून प्रवेश केला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. संबंधित तस्करांनी भारतीय गुन्हेगारांसोबत मिळून मिसळून घुसखोरी केली होती. सायंकाळी ७. ३० वाजण्याच्या दरम्यान, बीएसएफच्या तैनात असलेल्या पथकाने त्यांना अडवले. इशारा असूनही तस्करांनी सैनिकांवर हल्ला केला. बीएसएफ जवान गंभीर जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरियाणात फरिदाबादामध्ये गो तस्करी करणाऱ्या गोरक्षकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या एका वाहनाचा पाठलाग गोरक्षक करत होते. यावेळी तस्कर हे मथूराहून मेवातला गोमाता घेऊन जात होते. यावेळी केएमपी महामार्गावर गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
Gujrat मधील अहमदाबादमध्ये एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याआधी त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गोमांस पकडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी पीडित गोरक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रारीत दाखल केली. या प्रकरणात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने रोहन नावाच्या तरुणाला मेरठमधून अटक केली आहे. रोहन हा शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
Illegle Meat Smuggling झारखंड जिल्ह्यातील रांची येथे काली मंदिरासमोर अवैध मांस आढळल्याची (Illegle Meat Smuggling) माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आढळली. ही घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता घडली आहे. यामुळे आता रांची येथील स्थानिक हिंदू या घडलेल्या प्रकरणाने संतापले आहेत. हे प्रकरण रांची येथील एचबी रोड येथील आहे. यावेळी काही स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेले प्रकरण हताळण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही तणावाची परिस्थिती आहे.
Beef Meat Smuggling उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील दोन कट्टरपंथींना गोहत्या (Beef Meat Smuggling) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिलशाद बेग आणि अरबाज अशी गोहत्या केलेल्या कट्टरपंथी आरोपींची नावे असून आरोपींनी ३२ किलोहून अधिक गोमांस जप्त केले अशी प्राथमिक माहिती आहे. दिलशाद आणि बेग अशी आरोपींची नावे असून शनिवारी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या घटनेत सहभागी असलेला सलमान आणि मोहम्मद शाह याचा मुलगा गुडनू फरार आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही आरोपींनी गोळीबार केला होता. फरार आरोपीच्या शोध सुर
Cow Smuggling हिंदू धर्मात गोमातेला हिंदूंची माता म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गोमातेची तस्करी होत आहे. उत्तर प्रदेशातील बदयू येथील कट्टरपंथी युवक नाझीमने गोमातेची तस्करी केली आहे. याचपार्श्वभूमीवर इस्लामनगर पोलीस हद्दीत हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी तस्करी करणाऱ्या कट्टरपंथींना अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार शकील आणि मोनीश अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील एका गावातून सातत्याने गोहत्या, तस्करी आणि गोमांसाचा व्यापार होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. शुक्रवार, दि. १४ जून २०२४, प्रशासनाने गौतस्करीशी संबंधित गावात छापा टाकला, ज्यामध्ये ११ घरांमधून गायींचे अवशेष सापडले. या घरांमध्ये गायींचे अवशेषही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचवेळी १५० जिवंत गायींचीही सुटका करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरची कारवाई करत सर्व ११ घरे जमीनदोस्त केली आहेत.
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात उंट तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवार, दि. ११ जून २०२४ पोलिसांनी ट्रकमधून नेले जाणारे १९ उंट जप्त केले. या उंटांची किंमत अंदाजे ३० लाख रुपये आहे. या उंटांची तस्करी करणाऱ्या चार तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. जुनैद खान अशी दोन तस्करांची नावे आहेत. शाहनवाज आणि साहिल अशी उर्वरित दोन जणांची नावे आहेत. यातील जुनैद खान आणि साहिल हे हरियाणातील मेवात येथील आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार यांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने बुधवार, दि. २९ मे २०२४ संध्याकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर त्याच्यावर कारवाई केली.
आसाम आणि मेघालयच्या सीमेजवळ केलेल्या कारवाईत सीमापार गो तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी रोखला आहे. आसाम आणि मेघालयच्या सीमेजवळ कार्यरत असलेल्या १४ गो तस्करांना पकडण्यात गुवाहाटी शहर पोलिसांना यश आले आहे. २५२ जनावरे वाचवण्यात आली आहेत. सोनापूर पोलिस स्टेशनच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी टाटा अल्ट्रा (AS01 QC 0994) डिगरू पॉईंटजवळ थांबवून १९ जिवंत गुरांची तस्करी रोखली. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे मोरीगाव जिल्ह्यातील २६ वर्षीय मोहम्मद इफ्तिकार हुसेन आणि ५० वर्षीय मोहम्मद सुरुज अली या दोघांना ताब्यात घेण्यात
एका पोलीस अधिकार्याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी. एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात उपचार सुरू करण्याआधीच त्या १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.मात्र, तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याला आणि कुटुंबाला काय करावे हे सुचेनासे झाले. कारण, शवविच्छेदन अहवालात लिहिले होते की, अंमली पदार्थाच्या प्रमाणाबाहरे सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या होत्या. तसेच त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना
सध्या पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली असून उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना पुढे आली आहे. पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. बुधवारी १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.
चंदन हे भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. चंदन हे फक्त देवालयात नाही तर' कॉस्मेटिक' मध्ये पण उपयोगी पडते. चंदनाचे झाड हे दुर्मिळ वनस्पती मध्ये येत असल्यामुळे त्याला अनेक निर्बंध आहेत.त्याचा उत्पादनावर व विक्रीस देखील अनेक निर्बंध आहेत. गेल्या अनेक वर्षांत चंदनाच्या झाडाचे नियोजन उपाययोजना यातील अभावामुळे एकेकाळी 'वीरप्पन 'जन्माला आला.
भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी गुजरातच्या कच्छमध्ये मोठी कारवाई करत ओखा जवळ एका इराणी नावेतून ४२५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले. या बोटीतून ६१ किलो ‘हेरॉईन’ची तस्करी केली जात होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्याण-अहमदनगर महामार्गावर रायते येथे मुंबईकडे जाणार्या एका संशयास्पद कारची तपासणी केली असता ५०० किलो गोमांस आढळून आले. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी कारचालक चैतन्य गफाले याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरातून मृत भारतीय गिधाडाचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. पश्चिम नाशिक इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चौकशी दरम्यान हे अवशेष सापडले आहेत. आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन होणारी वन्यजीवांची होणारी शिकार रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अंबोली गावातून बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्या प्रकरणी सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चार इसमांना रंगे हात पकडले आहे. वन विभागाने खरेदी करण्याच्या आवेशाने सापळा रचून या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान या आरोपींनी वन विभागाच्या कर्मचांऱ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चा
कोळसा तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दि. २ सप्टेंबर रोजी ईडीच्या कोलकाता कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, 'टीएमसी'चे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या वर्षी मार्चमध्ये ईडीसमोर हजर झाले होते.
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. नुकतेच त्याला न्यायालयाने दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. १५ वर्षांपूर्वी दिलर मेहंदीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA )ने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी निगडित मुंबईतील २० ठिकाणांवर सोमवारी छापासत्र सुरु केले आहे
संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावर देवालय येथे विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे सापडलेल्या खवले मांजरची सुटका काल दि २६ रोजी नैसर्गिक अधिवासात करण्यात आली. मात्र, यामुळे कोकणात अजूनही छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.
उत्तर बंगालमधील जलपाईगुडी येथून तीन कांगारूंची सुटका करण्यात आली आहे . वन्यजीव तस्करांकडून तस्करी करण्याआधीच वन अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. शुक्रवारी (१ एप्रिल रोजी) स्थानिकांना सिलीगुडीजवळ एका कांगारूचा मृतदेह सापडला. शनिवारी सकाळी स्थानिकांनी दुसऱ्या कांगारूचा मृतदेह पाहून वनविभागाला कळवले.
केशर ही वस्तू इतकी अवास्तव महाग असण्याचं कारण त्याची खर्चिक, वेळखाऊ प्रक्रिया हे आहे. केशरचे कंद जमिनीत पेरले जातात. त्याला जांभळ्या रंगाची जमिनी सरपट पानं आणि फुलं येतात. प्रत्येक फुलाला पिवळसर रंगाचे तीनच पराग येतात. ते हाताने खुडायचे. कागदाच्या थरांमध्ये ते ठेवून वर जड वजन ठेवून ते उन्हातच वाळवायचे. मग त्याच्या वड्या होतात. हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं केशर होय. त्याला ‘शाही केशर’ असं नाव आहे. असं एक किलो केशर तयार करायला किती फुलं लागतात माहितीय? तब्बल ८० हजार फुलं! म्हणून ते एवढं महाग पडतं!
वाराणसी येथून तस्करी करून १०० वर्षांपूर्वी कॅनडा येथे तस्करी करण्यात आलेली देवी अन्नपूर्णेची मूर्ती अखेर भारतात परत आणण्यात आली आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून मी ईशान्य भारताच्या वेगवेगळ्या सीमावर्ती भागांना भेट देत आहे. भारत-म्यानमार सीमेवर ‘आसाम रायफल्स’ सीमेचे रक्षण करण्याकरिता तैनात आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित हा लेख...
गेल्या महिन्याभरात मुंबईमधून 'व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीच्या (एम्बर्ग्रिस) तस्करीची सात प्रकरणे उडकीस आली आहेत. या माध्यमातून एकूण ६८ किलो 'एम्बर्ग्रिस' ताब्यात घेण्यात आलंय. या तस्करीमागे गुजरात आणि कर्नाटकमधील तस्करांचे धागेदोरे असल्याचे दिसून आले असून काही प्रयोगशाळाही यामध्ये गुंतल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई हे व्हेलच्या उलटीच्या तस्करीचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र दिसतंय.
मुलुंडमध्ये व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीची तस्करी (एम्बर्ग्रिस) उघडकीस आणण्यात आली. मंगळवारी सायंकाळी मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सोन्याच्या तस्करीमुळे केरळमधील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यावरून आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी तेथील डाव्या सरकारकडून विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचे प्रयत्नही होत आहेत. त्यामुळे केरळ सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे.
ठाण्यातील येऊर वन परिक्षेत्राच्या प्रवेशव्दारानजीक बुधवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली आहे.
परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने नोटीस बजावली आहे.
जनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाने पोलिसा शिपायाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा तपासणी नाका येथे ही घटना घडली.
भाजपला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी एका प्रश्नाचे उत्तर नक्कीच द्यावे. भाजप जर राष्ट्रीय आपत्ती असेल तर खुद्द शरद पवार आणि ते ज्यांच्या गळ्यात गळे घालून इच्छितात ते राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, देवेगौडा वा चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी ही मंडळी वा त्यांचे पक्ष काय ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहेत?