कुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेने ‘एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
Read More
पाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ठरल्या आहेत. त्यांचा नेत्रदीपक प्रवास जाणून घेऊया....
सोव्हिएत रशियन समाजाची नीतिमत्ता इतकी खालावली की, आता नवीन महिला नेतृत्व वेश्यांमधूनच निर्माण होईल, अशी टवाळी होऊ लागली. त्या काळातल्या सुरस आणि चमत्कारिक कथा अधूनमधून बाहेर येत असतात, त्यातील ही एक कथा.
तिसर्या जागतिक महायुद्धाच्या झळा आजही जपानसारख्या देशांना सोसाव्या लागत आहे. या युद्धात ३० हून अधिक देशांची दहा कोटींहून अधिक लोकसंख्या भरडली गेली. ज्यापैकी या युद्धादरम्यान, सात कोटींहून अधिक जण मारले गेले. आतापर्यंच्या घातक नरसंहारापैकी एक म्हणून दुसर्या जागतिक महायुद्धाकडे पाहिले जाते. मात्र, खरा खेळ युद्धानंतर सुरू झाला. युद्धामुळे बरबाद झालेल्या युरोपियन देशांचे पुनर्निर्माण करण्याच्या उद्देशाने युद्धानंतर ‘याल्टा’ आणि ’पॉट्सडॅम’ संमेलने घेण्यात आली.
'जी २०’ शिखर परिषदेच्या भव्यदिव्य आयोजनानंतरही भारताला रशिया-युक्रेन युद्धावर रशिया-चीन आणि पाश्चिमात्य देशातील मतभेदांमुळे दिल्ली घोषणापत्रावर सहमती मिळवता येणार नाही, असा अंदाज होता. पण, दिल्ली घोषणापत्रावर सर्वच देशांची सहमती मिळवून भारताने जगाला आपल्या कुटनीतिक ताकदीचे दर्शन घडवले. दिल्ली घोषणापत्राचे सर्वांनीच स्वागत केले.
राजकारणात कुणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. राजकारणात परिस्थितीच सगळं काही ठरवत जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणही याहून वेगळे नाही. रशियाप्रती चीनचे बदलत चाललेले संबंध हे त्याचेच द्योतक. युरोपियन संघात चिनी दूत फु काँग यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याने चीनचे बदलते मनसुबे समोर आले आहेत. काँग म्हणाले की, “आम्ही सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो, म्हणून जेव्हा चीनने पूर्वीच्या सोव्हिएत युनियनशी संबंध प्रस्थापित केले, तेव्हा आम्ही याच गोष्टीवर सहमत झालो. परंतु, हे ऐतिहासिक मुद्दे आहे
जगाच्या नकाशावर प्रत्येक देश आपापल्या सीमांच्या संरक्षणाबाबत जागृत आणि तितकाच संवेदनशील असतो. मग त्यासाठी अफाट संसाधनांचाही वापर करायला तो पुढे-मागे पाहात नाही. सध्या युक्रेनसोबत युद्धस्थितीत असलेला रशियाही याला अपवाद नाहीच. नौदल, भूदल आणि हवाई दलात म्हणूनच सैन्यभरतीकडे रशियाचा कल असतो. इथंवरही ठीक, पण रशियाने फार पूर्वीपासूनच काही समुद्रीजीवांचाही हेरगिरीसाठी, निगराणीसाठी वापर केल्याचे उजेडात आले आहे.
१९९१ साली सोव्हिएत साम्राज्य कोसळल्यावर युक्रेन स्वतंत्र झाला. २०१० साली युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर युशचेन्को यांनी बांदेराला मरणोत्तर ‘हिरो ऑफ युक्रेन’ असा किताब दिला. याविरूद्ध युरोपभर काहूर माजलं. कारण, बांदेराने हजारो निरपराध ज्यूंना ठार मारलं होतं. अखेर २०११ मध्ये युक्रेन सरकारला तो किताब रद्द करावा लागला.
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या लष्करी ताकदीच्या अवास्तव कल्पना उघड्या पडल्या आहेत. रशियाचे सैन्य कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युरोपीय महासंघाकडून युक्रेनला होणारी मदत बंद करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमधील एकी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी रशियाने नैसर्गिक वायू आणि तेलाचे शस्त्र उगारले आहे.
पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसर्या खेपेत शिंजो आबेंनी भारतासोबत संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. या काळात त्यांनी तीन वेळा भारताला भेट दिली, तर नरेंद्र मोदींनीही अनेक वेळा जपानला भेट देऊन त्याची परतफेड केली. आज जपान हा भारतातील तिसरा सर्वांत मोठा गुंतवणूकदार देशांपैकी एक झाला असून, भारत-जपान द्विपक्षीय व्यापार १७ अब्ज डॉलरच्या वर गेला आहे.
भारताने यंदाच्या ‘प्रजासत्ताक दिना’ला प्रमुख अतिथी म्हणून मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले आहे. ‘विस्तारित शेजारी’ म्हणून मध्य आशिया भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहेच. परंतु, त्याचबरोबर आपल्यासाठी या पाचही देशांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच त्यापैकी प्रत्येकावर स्वतंत्रपणे नजर टाकणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या भागात माहिती करुन घेऊया किरगिझस्तानची...
दि. २६ जानेवारी, २०२२ रोजी होणार्या ७३व्या ‘प्रजासत्ताक दिना’ला प्रमुख अतिथी म्हणून भारताने मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले आहे. यानिमित्ताने या पाच देशांचे आणि एकूणच मध्य आशियाई प्रदेशाचे महत्त्व पुनश्च अधोरेखित झाले आहे. त्यानिमित्ताने ‘महत्त्व मध्य आशियाचे’ ही या पाच देशांचे सर्वार्थाने महत्त्व उलगडणारी ही खास रविवारीय लेखमाला...
१९९१ साली डावा-प्रतिडावांचा हा सगळा खेळच सोव्हिएत साम्राज्याच्या पतनामुळे संपला. परंतु, ‘युनो’ने म्हणजे अमेरिकेने ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ बनवून रूढ झालेला पायंडा पुढे चालूच ठेवला.
आपली हेर व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, हे सोव्हिएत रशियाच्या लक्षात आल्यामुळे तो कोसळला. म्हणजे ‘नाटो’वर मात करण्याची त्याची स्थिती राहिली नाही, एवढंच. इतरांसाठी तो अजूनही महाशक्ती होताच.
सोव्हिएत रशियाची शकले झाल्यानंतरही रशियाचे जागतिक महत्त्व कमी झालेले नाही. 20 वर्षांपूर्वी रशियाने शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना केली. या राष्ट्रसमूहाच्या स्थापनेमागे काही उद्देश होते. या गटातील राष्ट्रांत काही वाद झाले, आक्रमण झाले तरी त्यातून संवादाच्या माध्यमातून मार्ग काढणे हाही त्यामागचा हेतू होता. भारत आणि पाकिस्तान हे सुरुवातीला या सहकार्य परिषेचे सदस्य नव्हते. गेल्या तीन वर्षांपूर्वी हे दोन देश शांघाय सहकार्य परिषदेचे सदस्य झाले.
वुहान आता चीनसाठी चेर्नोबिल ठरेल काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण, चेर्नोबिल आणि वुहानची प्रयोगशाळा या दोन्ही घटनाक्रमात बरेच साम्य आहे. या वार्तापत्रात चेर्नोबिल घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे, तर पुढील वार्तापत्रात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न असेल.
अमेरिकेतल्या अटलांटामधल्या इमोरी विद्यापीठातल्या हार्वे क्लेहर या अभ्यासकाने डेव्हिड कारच्या मृत्यूनंतर आज 40 वर्षांनी त्याच्याबद्दलची माहिती अभ्यासून मांडली आहे.
पॅथॉलॉजी म्हणजे रोगनिदान करण्याचं शास्त्र म्हणजे तसे इथे वेगवेगळ्या मानवी रोगांवर प्रतिबंधक अशी लस वगैरे शोधण्याचे प्रयोग होणारच होते. पण, खरा 'ग्रँड प्लॅन' होता तो 'वानर-नर' बनवण्याचा...
अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात चीनने ‘रेअर अर्थ’ हे नवे शस्त्र वापरण्याची तयारी चालविली आहे. ‘रेअर अर्थ’ या धातूचा वापर साध्या बल्बपासून, प्रक्षेपणास्त्रांमध्ये होत असतो. या धातूच्या जागतिक व्यापारात एकट्या चीनचा ९५ टक्के वाटा आहे. चीनने त्याच्या निर्यातीवर कर लावलेला नाही. चीनने याची निर्यात थांबविल्यास अमेरिकेतील वाहन कारखाने, कॉम्प्युटर, विमान कारखाने यातील उत्पादन ठप्प होईल, असे चीनला वाटते.
अमेरिका अतिशय उघडपणे आर्थिक दहशतवाद पसरवत असून त्याला चीनने ‘आर्थिक दहशतवादाचा नंगानाच’ असे संबोधले. अमेरिकेची भूमिका आर्थिक दृष्टीने उग्र राष्ट्रवादाची-धमकावण्याची आहे, असा आरोप चीनने केला. चीनच्या या तडफडीमागे दोन-तीन कारणे आहेत; त्याचबरोबर चीनने अमेरिकेवर कितीही आरोप केला तरी चीनही अमेरिकेपेक्षा उजवा आहे, असे नाही.
सध्या जगाच्या पाठीवर एका देशाने मात्र आपले नाव बदलण्यासाठी जनतेचा कौल रविवारी आजमावला. या देशावर ही वेळ अगदी स्वखुशीने आलेली नाही की या देशावर इतर कुठल्या राष्ट्राने आपला अधिकारही सांगितलेला नाही; पण तरीही या देशाने काळजावर दगड ठेवत आपले नाव बदलण्याचा....त्यामध्ये एका शब्दाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकन हेरखातं सीआयए आणि रशियन हेरखातं केजीबी यांच्यातील स्पर्धेच्या, डावा-प्रतिडावांच्या, कुरघोडीच्या प्रयत्नांच्या असंख्य कहाण्या प्रसिद्ध आहेत.
कवीला जिथे सगळं विसरून थांबावं, विसावा घ्यावा, असं वाटतं; नेमक्या त्याच वळणावरून अभ्यासक, राजकीय-सामाजिक निरीक्षक, संशोधक, पत्रकार, इतिहासकार यांना अभ्यासाकरिता प्रचंड बौद्धिक खाद्य उपलब्ध होत असतं.
खरं म्हणजे, अमेरिकेचा किंवा ‘नाटो’ संघटनेचा युद्ध करण्याचा किंवा अवकाशयुद्ध करण्याचा तर अजिबातच उद्देश नव्हता. त्यांना फक्त शक्तिप्रदर्शन करायचं होतं, पण याने सोव्हिएत श्रेष्ठी खरंच घाबरले आणि प्रतिहल्ल्याच्या तयारीला लागले