मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Read More
जयंत सहस्रबुद्धे गेल्याची बातमी वाचून बसलेला धक्का, हा माझ्यासाठी साधा धक्का नाही. कारण, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्या विचारसरणीवर आहे, ती व्यक्ती या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे वेदनादायक आहे. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात, पण आपल्या आयुष्याला समृद्ध करणार्या त्यातील काही व्यक्तींना आपण सदैव गुरुस्थानी पाहतो. १९८० ते १९९९ या काळात संघकार्य करताना अनेक विदूषींचा सहवास लाभला. त्यात प्रामुख्याने संघ प्रचारक होते होते. १९९०-९२ या काळात जयंतजी वांद्रे ते सांताक्रुझ या शांतीनगर भागात प्रचा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याविषयी अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे नॅशनल हेराल्डच्या संपादिका चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लूटमार करणारे होते आणि ते महिलांचा बलात्कार करायचे अशी टिप्पणी सुजाता आनंदन यांनी ट्विटरवरून केली होती. त्यांच्या या ट्विटची दखल घेत भाजप आमदार नितेश राणे यांनी या विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. यावरून सांताक्रुज पोलिसांनी राणेंच्या तक्रारीची दखल घेत सुजाता आनंदन आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक
मुंबईत पाणीप्रश्न ज्वलंत का झाला?
फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (एफआयएनएस) संस्थेच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ एका विशेष व्याख्यानाचे आयोजन
महापालिकेतर्फे सांताक्रूझ पूर्व येथे नेहरू रोडवर मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक होत असून त्याचे भूमिपूजन मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली.
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या मानखुर्द येथील बेस्ट कर्मचार्यांच्या पुनर्वसनाबाबत पुन्हा एक नवी गंभीर समस्या पुढे आली आहे.