बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक.
Read More
वसई विधानसभेच्या सन्माननीय आमदार मा. सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या स्थानिक विकास निधी व नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १३३ वसई विधानसभेतील विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक ०८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे गुरुवार, ५ जून रोजी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिक सोडून कापडी पिशव्या वापरण्याची शपथ घेतली.
पावसाळा सुरू झाला की आषाढी एकादशीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघतो. प्रत्येक हृदयाच्या गाभार्यातून ’पांडुरंग हरी, वासुदेव हरी’चा निनाद उठतो. पंढरीच्या वाटा जिवंत होतात, त्या वाटेवरून चालत असतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... त्यांच्या पाऊलखुणा म्हणजेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची गाथा. संतांच्या या पालख्या म्हणजे चालती-फिरती भक्तीची विद्यापीठे, जिथे श्रद्धा हा श्वास आहे आणि समर्पण हा धर्म. या विशेष तीन भागांच्या सदरातून आपण
साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
Bhagyashree Desaiकलेच्या सर्वांगाला स्पर्श करत अभिनय, निर्मिती, चित्रकला, काव्यलेखन अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवणार्या भाग्यश्री देसाई यांच्याविषयी...
( 287th Vasai Vijayotsav Din ) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.
महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
स्वामी नरेंद्राचार्य संस्थान वसई येथे ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले
( Ravindra Prabhudesai thane satkar ) उद्योग क्षेत्रासह समाजकारण व अध्यात्मामध्ये विशेष योगदान देणार्या रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठाणेकर प्रभुदेसाई यांचा सन्मान हा आपल्या ठाण्याचा गौरव आहे. ठाण्याची प्रतिष्ठा वाढवून उद्योजकतेच्या बहुमानानिमित्त डॉ. प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(Tahawwur Rana Extradition) २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने कडक सुरक्षेत कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे विमान संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी एनआयए कोठडीत करण्यात आली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
( Old Shiv Sainik from Bhoiwada Parel area vishvnath khatate join shivsena ) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ-भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशी कोळी यांच्यासह 25 ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदीर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तास भाविक साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात.
कुणाल कामराच्या बाबतीत आता पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल, असा सूचक इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
पंजाब सरकार सध्या भलतेच तेजीत आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकर्यांच्या नावाने आंदोलकांनी लोकांना जेरीस आणले होते. भगवंत मानच्या पंजाब सरकारने या आंदोलकांना धडा शिकवला. तसेच, अमली पदार्थ व्रिकेत्यांच्या घरावर याच काळात पंजाब सरकारने बुलडोझर फिरवले. ‘उडता पंजाब’ म्हणत, पंजाब राज्याची बदनामी होत असते.
प्रपंचातून निवृत्त झालेल्या मनात क्षमाभाव विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर क्षमाभाव आपोआप विकसित होईल. क्षमा केली की प्रपंचाशी जोडलेला अंतिम धागासुद्धा गळून पडेल आणि मग परिपूर्ण शांतीचा आणि चिरकाल शांतीचा अनुभवही प्राप्त होईल. कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर येणारे अनुभव कथन करणार्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे हे अध्यात्मिक विवेचन...
( husain dalwai say abaout Chatrapati Sambhaji Maharaj ) नागपूर हिंसाचारप्रकरणी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता गेलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी “औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले,” असा अजब दावा करत आपल्या अकलेच्या दिवाळखोरीचे दर्शन घडविले आहे.
Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे.
नागपूर दंगलीमुळे राज्य ढवळून निघाले आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या नागपूरातील दंगलीतील प्रमुख आरोपी फहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. औरंगजेबाची कबर तोडण्यावरून हिंदूंनी आपली आक्रमकता दर्शवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. अशातच आता इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिम जमावाने तोडफोड आणि दगडफेक करत नकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
( Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years ) वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने भुमिगत करणार अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिली. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड वायरर्स असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे ओव्हरहेड वायरर्सवर पडून वीज वारंवार खंडित होते. यामुळे या वायरर्
बीडमधील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
लाडकी बहिण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात थेट आकडेवारी जारी करत सडेतोड उत्तर दिले.
( Ravindra Prabhudesai of Pitambari Products has received D.Lit ) पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकिय संचालक रवींद्र प्रभूदेसाई यांना आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कुलपती डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डि.लीट.पदवी प्रदान करण्यात आली.
( Vasai Virar Municipal Corporation ) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती. सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग, सर्वोच्च कचरा संकलन, प्लास्टिक कचर्याचे रिसायकलींग या तीन श्रेणीमध्ये वसई-विरार महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
Ulfat Hussain arrested उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने मोठी कारवाई करत हिजबुल मजाहिदीनचा फरार असलेला आंतकवादी उल्फत हुसेनला मुरादाबादमधून अटक केली आहे. या आतंकवाद्याचा शोध घेण्यासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. त्यानंतर आता एटीएसने कटघर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली. तो गेली १८ वर्षांपासून फरार होता, आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यासाठी निधीही पूर्णतः मंजूर झालेला नाही. शासनाने यात लक्ष घालून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थीम पार्क संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या थीम पार्क संग्रहालयाचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने घोषित करावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.
आपल्या स्वरांच्या माध्यमातून संगीत विश्वात माय मराठीची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सुधीर फडके यांच्या गीतांच्या श्रवणाचा आनंद पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. धुरी परिवार, समाज उन्नति मंडळाचे मनोहर वाचनालय आणि समर्थ मराठा संस्था आयोजित उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २ मार्च रोजी 'बाबुजी आणि मी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध संगीतकार श्रीधर सुधीर फडके व वाद्यवृंद मराठी भावगीतं, भक्तीगीते, सिनेगीतांचे अमृततुल्य सादरीकरण करणार आहेत.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून तेथील हा भाग झोपडपट्टीमुक्त व्हावा याकरिता वसई-विरार महानगपालिका परिसरात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून गुरुवार, दि.२८ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील स
सध्या अमेरिकेकडून मिळालेल्या ‘युएसएड’चे प्रकरण देशात चांगलेच चर्चेत असून, यानिमित्ताने परदेशी माध्यमांतून मिळणार्या निधींच्या गैरवापराचा प्रश्नही केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही परदेशी निधी धर्मांतरणासाठी वापरल्याचा संशय असणार्या ‘एनजीओं’वर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
USAID भारतातील निवडणुकांमध्ये USAID ने भारताला मतदानाच्या वाढीसाठी २१ दशलक्ष डॉलर्सचे वाटप केल्याचे वक्तव्य अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी या विधानातील तथ्ये लवकरच बाहेर येतील असे सांगितले.
भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
काँग्रेस पक्ष, गांधी घराणे आणि त्यांचे चीनप्रेम हे तसे परंपरागतच. गांधी परिवाराला अगदी चाचा नेहरूंपासून लाभलेला हा वारसाच. म्हणूनच एकीकडे नेहरूंच्या नेतृत्वात ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा नारा भारतात गुंजत असताना, दुसरीकडे कुरापतखोर चीन लडाखमध्ये सैन्य घुसवून आपल्या मातृभूमीचे लचके तोडत होता. एवढेच नाही तर चीनने लडाखचा काही भूभाग गिळंकृत केल्यानंतरही, नेहरूंनी चिनी ड्रॅगनला फारसे गांभीर्याने घेतले नाही. कारण, ‘त्या जमिनीवर साधं गवताचं पातंही उगवत नाही,’ म्हणत चीनने हडपलेल्या लडाखमधील त्या भूभागाचे (अक्साई चीन) लष
USAID अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID वर बंदी घातली गेली. तेव्हापासून यासंबंधित गैरकृत्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहेत. १० फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये USAID कडून भारताविरोधात असलेल्या शक्तींना मिळणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित केला.
पवित्र कुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. जातीपातीपलीकडे जाऊन संतमहंत हे सर्व हिंदू समाजाचे संतमहंत आहेत, हा संदेश यामध्ये होता. या महत्त्वाच्या घटनेच्या अनुषंगाने ‘भटके- विमुक्त विकास परिषदे’चा महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून भटके-विमुक्त समाजाच्या सद्यस्
जगातील गरीब देशांना दारिद्-यनिर्मूलनासाठी आणि तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘युएसएड’ या संस्थेचे कामकाज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठप्प केले. मानवतावादी कार्य करणार्या या संस्थेकडून गेल्या काही वर्षांत संशयास्पद कार्यासाठी अमेरिकी निधी वापरला जात असल्याचा आरोप होत होता. जागतिक डाव्या इकोसिस्टिमच्या घातक अजेंड्याचा फटका फक्त भारतालाच नव्हे, तर अमेरिकेतील उजव्या संघटनांनाही बसत होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या संस्थेच्या भारतातील अजेंड्याचा का
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव असेल.