(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
Read More
“समान नागरी कायदा’ (युसीसी) ही संविधाननिर्मात्यांची भावना असून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत दिली. राष्ट्रपती अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव राज्यसभेत चर्चेअंती मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेस उत्तर दिले.
ज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्याच टर्ममध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
(Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
नवी दिल्ली : राज्यसभा सभापतींच्या विरोधात महाभियोग प्रस्तावाच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत गदारोळ झाला. यावेळी सभापती जगदीप धनखड ( Vice President ) आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
नवी दिल्ली : अराजकतावादी जॉर्ज सोरोस ( Soros ) आणि सोनिया गांधी यांचे संबंध लपविण्यासाठीच काँग्रेसने राज्यसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची तयारी केली आहे, असा घणाघात सभागृह नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी केला आहे.
(Indi Alliance) संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या महासचिवांकडे मंगळवारी दुपारी सादर करण्यात आला असून त्यावर ६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हा ९० वर्षे जुना विमान कायदा, १९३४च्या जागी भारतीय वायुयान विधेयक (BVV), २०२४ गुरूवार, ६ डिसेंबर रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे विमान वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणे सुलभतेसाठी हा कायदा फायदेशीर ठरेल. भारतीय वायुयान विधायक, २०२४ नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या प्रतिसादानंतर मंजूर करण्यात आले, लोकसभेने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली : शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहात सांगितले की, "काँग्रेस खासदाराच्या आसनातून चलनी नोटांचे बंडल सापडले आहे." यावर अध्यक्षांनी अतिरिक्त माहिती देत सांगितले की, गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीट क्रमांक २२२ वरून रोख रक्कम जप्त केली. तेलंगणातील काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी ( Abhishek singhvi ) यांना ही जागा देण्यात आली आहे.
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोण जाणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती दिली आहे.
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार नाव जाहीर केले असून आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेवर मनोनित केले आहे. सुधा मूर्ती यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर दिली. सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. सुधा मूर्ती या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे, असे म्हणत सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले.
राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसैन यांच्या रॅलीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आणि व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. फॉरेन्सिक तपासणीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांची पुष्टी झाल्यानंतर, आता बेंगळुरू पोलिसांनी सोमवारी, दि.४ मार्च २०२४ एकूण ३ आरोपींना अटक केली आहे. इल्ताज, मुनाव्वर आणि मोहम्मद नाशीपुडी अशी त्यांची नावे आहेत.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राराज्यसभा निवडणूका पार पडणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे. यावेळी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज भरला.
राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. महायुतीच्या ५ आणि महाविकास आघाडीच्या एका नेत्याने उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर आता अपक्षाने सातवा अर्ज भरला आहे. विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्यसभेसाठी नुकताच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
लवकरच राज्यसभा निवडणुक पार पडणार असून आता शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपतर्फे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि भाजप वैद्यकीय आघाडीचे अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी गुरुवारी प्रफुल पटेलांच्या नावाची घोषणा केली.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. टीएमसीने रविवारी पत्रकार सागरिका घोष आणि पक्षाच्या नेत्या सुष्मिता देव यांच्यासह चार नावांची घोषणा केली.
दर पाच वर्षांनी लोकसभेतील सदस्य बदलतात तर राज्यसभेत दर दोन वर्षांनी नवे सदस्य नवी उर्जा घेऊन येतात. त्याच प्रकारे, द्विवार्षिक निरोपसमारंभ देखील नव्या सदस्यांसाठी अविस्मरणीय आठवणी आणि अमूल्य वारसा ठेवून जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत केले.
संपुर्ण देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच आता राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, यावेळी महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
मोदी हटाव' या एकमेव उद्देशाने एकत्र आलेल्या विरोधीपक्षांच्या एकीला उभा तडा गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूका लढविणार आहेत.
संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर लोकसभा सचिवालयाने खासदारांना त्यांची 'स्मार्ट कार्ड' तयार ठेवण्यास सांगितले.
सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) नियमावली पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र ‘टेनी’ यांनी उत्तर प्रदेशातील ठाकुरनगर येथील मतुआ समुदायास संबोधित केले.
महिला आरक्षण विधेयक काल लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले आहे. आज राज्यसभेत पास झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यसभेतील चर्चेदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महिलांचा आदर करणे हीच आपली संस्कृती असल्याचे विधान केले.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयेक संमत झाल्यानंतर राज्यसभेत केंद्र सरकारकडून विधेयक मांडण्यात आले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा करण्यात येत आहे. काँग्रेस राज्यसभा खासदार तथा सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन केले असून त्यांनी महिला आरक्षण विधेयकास पाठिंबा दिला आहे. के. सी वेणुगोपाल म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून अजून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सोशल मिडीयावर ही माहिती दिली. संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजेच हे अधिवेशन ५ दिवस चालणार आहे.
विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव हा सरकारविरोधात नसून त्यांच्यातीलच अविश्वासाचे निदर्शक आहे. त्यामुळे लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राज्यसभेत बोलत असतांना विरोधकांनी गोंधळ घातला. यावर नाराज झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, विरोधक 'इंडिया' (विरोधी आघाडीचे नाव) असल्याचा दावा करतात. परंतु ते देशाचे राष्ट्रीय हित ऐकण्यास तयार नसतील तर ते कोणत्या प्रकारचे 'इंडिया' आहेत?
गुजरातमधील तीन आणि पश्चिम बंगालमधील सहा जागांवर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी निवेदन जारी करून गुजरात आणि प. बंगालमधील राज्यसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.
ठाकरे सरकारच्या काळात सरकार आणि राज्यपाल यांच्या संघर्षातील कळीचा मुद्दा होता तो राज्यपाल नियुक्त आमदारांचा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये या विषयावरून सातत्याने संघर्ष होत राहिला
सीबीआयने १०० कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभा सदस्यत्व आणि राज्यपालपद देण्याचे आमिष दाखविणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक केली आहे
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत गदारोळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही काँग्रेससह विरोधी पक्षांचा गदारोळ कायम आहे
लोकसभेत बॅनरबाजी! विरोधकांचा गदारोळ!
राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवार सकाळपासूनच मतदान सुरू आहे.
राज्यसभेनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणूक येत्या २० जून रोजी होणार आहेत.
खा. संजय राऊत पुन्हा गोत्यात ?
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे, याच खापर शिवसेना नेते संजय राऊत अपक्ष आमदारांवर फोडत आहेत.
राज्यसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात पार पडत आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची उडालेली धांदल आणि दुसरीकडे भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ यामुळे दोन्ही निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल हे अजिबात धक्कादायक वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी येथे दिली.
"माविआकडे १७२ मतं असताना आमचा उमेदवार पराभूत झाला, गेम प्लॅन मध्ये आम्ही अपयशी ठरलो", अशी प्रतिक्रिया राज्यसभेच्या निकालावर नाना पाटोले यांनी दिली. "राज्यसभा निवडणुकीमध्ये आम्हाला एक मत जास्त मिळाले, ते कुणाचे मिळाले याचा शोध घेतोय", अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातला, या दशकातला सगळ्यात मोठा राजनीती धुरंधर आपल्या पक्षात आहे, हे समजायला अन्य पक्षांपेक्षा भाजपलाच जरा जास्त वेळ लागला. एका बाजूला घराणातल्या वारशाने मिळालेली बेलगाम सत्ता आणि अफाट पैसा, तर दुसर्या बाजूला शरद पवारांसारखा अस्तित्वासाठी चिवटपणे लढणारा जुना खेळाडू; फडणवीसांची लढाई या दोघांशींच होती. राऊत वगैरे तर फडणवीसांचे प्रतिस्पर्धीच नाहीत.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
"पाठीत खंजीर खूपसून विश्वासघातानं सत्तेत आलेल्या आघाडी सरकारला हे सर्व आमदार निश्चितपणे उत्तर देतील.", असे प्रतिपादन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. शुक्रवार, दि. १० जून राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विधानभवन परिसरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. मात्र अखेर शुक्रवारी सर्व आमदार मतदानासाठी विधानभवनात पोहोचल्याचे दिसून आले.
"आघाडी सरकार पुर्णतः हिंदुत्वाच्या विचारांना अनुसरुन असतं, तर त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष कसे असते? ते तर सेक्युलर पक्ष आहेत. त्यामुळे माझं मत आघाडी सरकारला जरी असलं तरी उघडपणे हिंदुत्वाला नसेल.", असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. शुक्रवारी (दि. १० जून) राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विधानभवनात हजर झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
येथील चिंचवड मतदार संघाचे लक्ष्मण जगताप,आणि कसबा पेठच्या मुक्ता टिळक या दोन भाजप आमदारांनी आज राज्यसभा निवडणुकी साठी दुर्धर आजाराने ग्रस्त असताना देखील मतदानास हजेरी लावल्याने सोशल मीडियावर या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्यसभा निवडणूक सहाव्या जागेसाठी प्रतिष्ठेची बनल्यानंतर ठाकरे सरकारचे आघाडीचे मंत्री आणि आमदार नाराज दिसत होते
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी येत्या १० जूनला होणार्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला (मविआ) आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक येत्या दि. २० जून रोजी पार पडणार आहे, निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांतर्फे उमेदवार बुधवार, दि. ९ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत.