विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी आज मतदान होत असून, आतापर्यंत १२९ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यात भाजपच्या ७२ आमदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे.
Read More
विधानसभेच्या निवडणुकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे, मंदा म्हात्रे, बबनराव लोणीकर विजयकुमार देशमुख यांच्या सह भारतीय जनता पक्षाच्या २० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधान भवनात दाखल होण्याआधी भाजपच्या सर्व आमदारांची भारतीय जनता पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराशी संवाद साधून कशा पद्धतीने मतदान याचे निर्देश दिले.
सोमवारी २० जून २०२२ रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने, सगळेच पक्ष सावध झाले आहेत. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या १० जागांपैकी ५ जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला ४ जागा निवडून आणता येतील असं दिसत आहे. राज्यसभेच्या पराभवाने महाविकास आघाडी सतर्क झाली असून भाजपसाठी ५ वा उमेदवार निवडून आणणे कठीण झाले आहे. आमदार फुटण्याची भीती असल्याने शिवसेनेसह जवळ जवळ सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.