(PM Modi Speaks with Nepal PM Sushila Karki) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तसेच नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शोकही व्यक्त केला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली.
Read More
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. "हा नवीन भारत आहे आणि तो कोणाच्याही अणुहल्ल्याच्या धमक्यांना घाबरत नाही", असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावले.
(Patna High Court on PM Modi's Mother Al video by Bihar Congress) पाटणा उच्च न्यायालयाने बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाने राहुल गांधी, भारतीय निवडणूक आयोग, मेटा, गुगल, एक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
(PM Narendra Modi hits out at RJD-Congress) बिहारमध्ये काँग्रेसने नुकत्याच संपवलेल्या 'मतदार अधिकार यात्रे'दरम्यान माझ्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आले. या घटनेमुळे मी व्यथित झालो. या प्रकाराबाबत मी राजद-काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारचे लोक माझ्या आईचा अपमान केल्याबद्दल त्यांना माफ करणार नाहीत", असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले.
(PM Narendra Modi Receives The First Made In India Chip) भारताने आपली पहिली सेमीकंडक्टर चिप लाँच केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि. २ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली सेमिकॉन इंडिया २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी देशातील पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप स्वीकारली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबने विकसित केलेला विक्रम ३२-बिट प्रोसेसर, चार मंजूर प्रकल्पांमधील चाचणी चिप्ससह प्रोसेसर स
(Bihar) बिहारच्या दरभंगा येथील राजद आणि काँग्रेसच्या एका संयुक्त सभेत व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली गेली. त्यानंतर बिहारच्या पाटणा येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे
(Independence Day 2025) भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सलग १२ व्यांदा ध्वजारोहण केले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. 'नवा भारत' ही यंदाची थीम असून, २०४७ पर्यंत समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे ध्येय आहे.
(PM Narendra Modi) देशभरात आज सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतीय भाषांचा उल्लेख करत "आपल्या सगळ्या भाषा जेवढ्या समृद्ध होतील. तेवढे आपल्या ज्ञानप्रणालीला सामर्थ्य मिळेल", असे प्रतिपादन केले आहे.
(PM Narendra Modi on Semiconductor Development) भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी साल २०२५ च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभरातील इतर राष्ट्रे समृद्ध होत गेली, परंतु भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न ५०-६० वर्षांपूर्वीच जन्माच्यावेळीच स
(PM Modi warns Pakistan over Nuclear Blackmail) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीत झालेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी "स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचे' पर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.
(PM Modi on Operation Sindoor) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'विषयी बोलताना पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे.
(PM Narendra Modi inaugurates Kartavya Bhavan) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ६ ऑगस्ट रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावरील कर्तव्य भवनाचे उद्घाटन केले. दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी कर्तव्य भवन उभारण्यात आले आहे. कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
(PM Narendra Modi breaks Indira Gandhi's record) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन विक्रम केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढून आपल्यानावे केला आहे. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी आज म्हणजेच शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर इंदिरा गा
(PM Narendra Modi on India-Britain Trade Deal) भारत आणि ब्रिटनमध्ये बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार अस्तित्वात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या साक्षीने ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
(PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्क
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी निमंत्रणाला नकार दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. ह्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे.
(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे म
(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
(PM Narendra Modi inaugurated a locomotive plant in Dahod) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी दि. २६ मे रोजी वडोदऱ्यातील रोड शोने दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर दाहोद येथे पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील पहिल्या लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवत प्रकल्पाचा शुभारंभ केला. लोकोमोटिव्ह प्लांटच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी स्वतः इंजिनात बसून त्याची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आण
(PM Narendra Modi On Operation Sindoor at Bikaner) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भाषणापूर्वी त्यांना बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे.
(PM Narendra Modi at Adampur Air Base) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन थेट हवाई दलाच्या जवानांसोबत संवाद साधला.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
(Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
( PM Narendra Modi appeal to investors from the Waves platform ) भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. इथल्या पर्वतांमध्ये संगीत आहे, इथल्या नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ आमच्या परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तर्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणू
(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत
(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक
(Dawoodi Bohra Delegation meets PM Modi) सध्या देशात वक्फ सुधारणा कायद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना या कायद्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दुसरीकडे दाऊदी बोहरा समुदायाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वक्फ दुरुस्ती कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी त्यांनीही हेही सांगितले की, ही त्यांच्या समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी होती.
(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा आरो
(PM Narendra Modi On Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ एप्रिल रोजी हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी विमानतळावरच जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेसच्या विरोध करण्यावरुन "काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही?" असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
PM Narendra Modi And Dr. Mohan Bhagwat Meet पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार, संघ कार्यालयाला भेट देणार, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेणार, दोघांत चर्चा होणार, याची (निरुद्योगी) वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया यावर प्रचंड चर्चा सुरू होती. जणूकाही हा प्रसंग संघ आणि भाजपच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग ठरणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या घोळूनघोळून आणि निवेदक आपण संघासंबंधीचे महाज्ञानी आहोत, या आविर्भावात सांगत होते. या सर्वांचे दोन शब्दांत वर्णन करायचे, तर ‘महा करमणूक’ (The Great entertainment)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
(Rekha Gupta) राजधानी दिल्लीतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत.
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा