विशेष प्रतिनिधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारत – युरोपीय संघ (ईयू) मुक्त व्यापार करारावरील (एफटीए) चर्चा वेगाने प्रगती करत आहे आणि वर्षाच्या अखेरीस एक करार होऊ शकतो. त्याचप्रमाणे ईयूच्या कार्बन कर आणि जंगलतोड धोरणांवर चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, भारताने डब्ल्यूटीओ विवाद निवारण प्रणालीच्या पुनर्संचयनावरही भर दिला असल्याचे गोयल म्हणाले आहेत.
Read More
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
प्रामाणिकपणे कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असून कर भरणे ही समाजसेवा आहे, त्यामुळे सर्वांनी अवश्य कर भरायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवार, १० एप्रिल रोजी केले.
जागतिक एआय प्रवास भारताशिवाय अपूर्ण आहे, असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवार, १ मार्च रोजी व्यक्त केले. मुंबई टेक वीक २०२५ मध्ये ते बोलत होते.
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
(Devendra Fadanvis) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.
(Ajit Pawar) केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २०% शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २०% निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. उद्योग जगतात यामुळे भारताने नवीन शिखरं गाठली आहेत. अशातच आता टेसला आणि स्टारलिंक यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केंद्र सरकारशी संवाद साधत तातडीची पाऊले उचलली आहेत. त्यामुळे आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी १३ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचा निर्णय झाला असून खरेदीकेंद्रांवर सोयाबीनला ४ हजार, ८९२ रुपये हमीभाव मिळणार आहे. त्याचबरोबर, सोयाबीनमधील ओलाव्याची अट १२ वरून १५ टक्के इतकी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने केंद्रीय कृषिमंत्री आणि केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांशी संपर्क करून महाराष्ट्रातील सोयाबी
मुंबई : “एक हैं तो सेफ हैं’ हे त्यांच्यासाठी आहे, जे राष्ट्रवादावर विश्वास ठेवतात. हे कोणत्याही धर्माबद्दल नाही,” असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ( Piyush Goyal ) यांनी व्यक्त केले. तसेच, “हे उल्लेखनीय आहे की, देशातील सर्वाधिक चार्टर्ड अकाऊंटंटची लोकसंख्या उत्तर मुंबईत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
भाजप नेत्या मनिषा चौधरी यांनी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत बोरीवलीमध्ये भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी भाजप आमदार प्रविण दरेकर, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
(Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्
(Mith Chowky Junction) मालाड (पश्चिम) मीठ चौकी जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका रविवार, दि. ६ ऑक्टोबरपासून खुली होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या मार्गिकेचे लोकार्पण होईल
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' मांडले जाऊ शकते, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालय 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' वर काम करत असून पुढील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे, असेही केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यात इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता करण्यात आली असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सिंगापूर येथे इन्व्हेस्ट इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
(Piyush Goyal) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवार, दि. १८ सप्टेंबर रोजी उत्तर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचा उत्साह वाढवला.
भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) भारताच्या सागरी सुरक्षेत आणि युरोप आणि आशियामधील मालाची जलद वाहतूक करण्यास हातभार लावू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केले. भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) भारत-भूमध्य व्यापार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या चार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट) योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रूपये अनुदानासह मान्यता देण्यात आली आहे.
देशातील ‘ई-कॉमर्स’ बाजारपेठ विस्तारली असून, दिग्गज कंपन्या आपले बस्तान बसविण्यासाठी कमी दरात, सवलतीच्या दरात आकर्षक ऑफर्समधून ग्राहकांना जाळ्यात ओढतात. साहजिकच स्थानिक दुकानदार अशी भरघोस सवलत देऊ शकत नाहीत. अशा धोरणांमुळे दिग्गज कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होणे, जेे मुक्त व्यापाराला अभिप्रेत नाही. म्हणूनच या जागतिकीकरणाच्या मुक्त बाजारपेठेतही स्थानिकांचे हित जपून बाजारीय संतुलन राखणे हे क्रमप्राप्तच.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. बोरिवलीतून कोकण रेल्वे सुरु होणार असून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात कोकणासाठी बोरिवलीतून ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. भाजप नेते सुनिल राणे यांनी ही माहिती दिली.
चीनमधून थेट परकीय गुंतवणूक धोरणात(एफडीआय) केंद्र सरकार बदल करणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले.
उत्तर मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दि. २८ जुलै रोजी कांदिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी आणि हरिलाल भगवती रुग्णालयाची पाहणी केली. तसेच भगवती रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. तसेच रुग्णांना योग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही गोयल यांनी दिले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादननिर्मिती करणाऱ्या उद्योगक्षेत्रास होत असून उत्पादनांच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशवासीयांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयातून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो, पण विरोधकांना देशातील जनतेने नाकारले हे बालबुद्धी विरोधी पक्षनेते समजू शकलेले नाही.” अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. पीयूष गोयल रविवारी दिल्ली प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणूक मजबुतीने लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या दिनदयाल उपाध्याय मार्गावरील मुख्यालयात महाराष्ट्र भाजपची सुकाणू समिती आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महाराष्ट्र भाजपमधील बदलांच्या चर्चेस पूर्णविराम दिला आहे. ते म्हण
मोदी सरकारचे खातेवाटप Modi Cabinet जाहीर झाले असून अनेक मंत्र्यांचे मागील खाते कायम राहिले आहेत. तर काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात आली आहेत. सोमवार, १० जून रोजी एनडीए सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं. दरम्यान, राज्यातील ६ मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान वाटचाल होत आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असून राहुल गांधी यांना हे सहन होत नाही. त्यामुळेच ते गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला आहे. शेअर बाजारमध्ये मोठ्या घटनांच्या वेळी बदल होत असल्याचे नेहमी घडत असते. त्यामुळे दीर्घकाळात शेअर बाजारामध्ये कसे बदल झाले, हे बघणे आवश्यक ठरते.
सकाळपासूनच लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यातील पहिल्या लोकसभेचा निकाल समोर आला आहे. उत्तर मुंबई लोकसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पियुष गोयल निवडून येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार असून त्याच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या आहेत.लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 695 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५, ओडिशातील ५, झारखंडमधील ३, जम्मू – काश्मीरमधील १ आणि लडाखमधील एका जागेवर मतदान होणार आहे.
देशाने ठरवले आहे येणाऱ्या कालावधीत भारत अमृत काळात प्रवेश करत आहे. त्या काळात आपल्याला देशाला विकसित भारत, समृद्ध देश बनवायचा आहे. विकसित भारताला हिंमतीने, इमानदारीने, आत्मविश्वासाने आणि जनतेच्या समर्थनाने गती देऊ शकतील तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे विधान उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मेळाव्यात केले.
बोरीवली हेच आता माझं पहिलं घर आहे आणि उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं वक्तव्य उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायूतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केले आहे. कांदिवली येथील नमो रथयात्रेच्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त मताधिक्य मोजायचे आहे. केंद्रीय मंत्री असताना त्यांनी मुंबईला खूप काही दिले. यापुढेही ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस सरकारने कायम मध्यमवर्गीयांची पिळवणूक करण्याचे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम निम्न आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले. पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे या दोन्ही वर्गाला समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला. डोळे बंद करून कोणालाही तिकिट द्यावे, निवडून येण्याची खात्री हमखास. यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उमेदवार असल्यामुळे बळ दुपटीने वाढले. अशावेळी विरोधी पक्षांपैकी कोणीही येथून लढण्यास तयार नसताना, ठाकरेंनी मोठ्या शिताफीने ही जागा काँग्रेसच्या गळ्यात मारली आणि अंग काढून घेतले.
उत्तर मुंबईचा कायाकल्प करण्यासाठी येत्या काळात येथील पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर देत अनेक अद्ययावत सुविधा दिल्या जाणार असल्याचे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते, देशाचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री, माजी रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, वाणिज्यमंत्री आणि अशाच महत्त्वपूर्ण खात्यांचा यशस्वीपणे पदभार सांभाळलेले पीयूष गोयल. मूळचे मुंबईकरच असलेल्या गोयल यांना यंदा भाजपकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ‘उत्तर मुंबई’ला ‘उत्तम मुंबई’ करण्याचा संकल्प गोयल यांनी व्यक्त केला आहे. तेव्हा नेमकी उत्तर मुंबईकरांसाठी पीयूष गोयल यांची ‘गॅरेंटी’ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ऋतुवल नव
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीचे भाजप उमेदवार पीयूष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली असून या रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, तसेच यावेळी नागरिकांनी पीयुष गोयल यांच्या समर्थनार्थ 'जय श्रीराम'चा जयघोषही केला.
येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उत्तर मुंबईचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांची प्रचार रॅली काढण्यात आली.
नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला, की तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी हीच नीती अवलंबत एका महिला सहकार्याला अलगद बाजूला केले, तेही तिला थांगपत्ता लागू न देता. होय, वर्षा गायकवाड. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यापासून मुंबईबाहेर त्यांची ओळख पोहोचली आणि त्याचा फायदा करून घेत, त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या राजकारणात शिरकाव केला.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायूतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भव्य रॅलीदेखील काढण्यात आली. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बोरीवली येथील पुष्टिपती विनायक मंदिरात दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रंदिवस एक करून भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. आज पूर्ण देशाचा विश्वास त्यांच्याबरोबर आहे. ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. प्रत्येक मतदार नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. तो आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदरी ही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे.
लोकसभा निवडणूकांना आता काहीच दिवस शिल्लक असून सर्वत्र निवडणूकांची धामधूम सुरु आहे. यातच उत्तर मुंबई लोकसभेतील महायूतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीदेखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान. त्यांनी गुरुवारी अध्यात्मिक गुरू श्री सद्गुरू अनिरुद्ध बापू यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
उत्तर मुंबईची जागा उबाठाने काँग्रेसच्या माथी मारली असून आता उमेदवार मिळेल का उमेदवार अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १० एप्रिल रोजी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रेया बुगडे पाठोपाठ चला हवा येऊ द्या मधील आणखी एक कलाकार हॉटेल व्यवसायात आला आहे. मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक कलाकार वेगळ्या वाटेवर चालताना दिसले. यापैकी एक कलाकार म्हणजे तुषार देवल
पियुष गोयल यांचे 'उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई', हे स्वप्न आपल्याला अधिक गतीने साकार करायचे आहे, असे आवाहन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. उत्तर मुंबईतर्फे आयोजित केलेल्या 'लोकसभा चुनाव-२०२४' या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई निवडणूक प्रमुख आ. योगेश सागर, दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी, अंदमान-निकोबारचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, आ. भाई गिरकर, भाजपा सचिव संजय उपाध्याय, विनोद शेलार, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा रोडमॅप तयार करण्यासाठी भाजपचा जाहिरनामा महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या लोकसभा निवडणूक जाहिरनामा समितीची बैठक सोमवारी दिनदयाल उपाध्याय मार्गावरील मुख्यालयात पार पडली.
मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या पदवीमध्ये सिल्व्हर मेडल. त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटेंटमध्ये ऑल इंडिया रँक दुसरी. यशस्वी बँकर, त्यानंतर राजकारणी, राज्यसभेवर खासदार, मोदी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री आणि आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यांची संधी. हा जीवनप्रवास आहे, भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा. तीन टर्म राज्यसभेचे खासदार आणि सभागृहाचे नेते असलेल्या पियुष गोयल यांना यावेळी भाजपने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून
आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मांडली असून,मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती भूमिका आहे. त्याचा वैयक्तिक राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाचे संपूर्ण कॅडर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे’, असे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.