दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एका मोठया हल्याचा प्रयत्न उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सुरनकोटच्या मारहोट परिसरात तपासादरम्यान सुरक्षा दलांना पाच आयईडी, काही रेडिओ सेट्स, कपडे सापडले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधून काढल्यानंतर या बाबी उघड झाल्या. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल अधिक सतर्क झाले असून जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले, तर २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी लंडनमधील पाकिस्तान दूतावासा बाहेर जोरदार निषेध केला. भारतीयांनी हातात पोस्टर्स आणि झेंडे घेतले होते. त्यांनी पाकिस्तान विरुध्द घोषणाबाजी केली.