मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये जय बजरंग आखाडा येथे हनुमंतांच्या मूर्तीची विटंबना केली. यानंतर हिंदूंनी आखाड्यात भिंतींवर मुस्लिमांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध केला आहे. परिणाम कहीही होऊ शकतात, असे लिहून इशारा दिला आहे. त्यानंतर संबंधित परिसरात तणाव पसरला आहे.
Read More
मुंबई : “हिंदुत्वाच्या गाभ्यातच विश्व कल्याण समाविष्ट आहे. आज जो काही विकास झाला, तो अपूर्णच राहिला आहे. किंबहुना, धर्म आणि राजकारणाच्या बाबतीतही धर्म आणि राजकारण या संकल्पनेला व्यवसाय बनवले गेले. संपूर्ण जग नास्तिक आणि आस्तिक अशा दोन विचारधारांमध्ये विभागले गेले. पुढे ते संघर्षाचा विषयही बनले. संसाधने अमर्यादित झाली, पण मार्ग सापडला नाही. त्यामुळे जग भारताकडे आध्यात्मिक शांतीच्या आशेने पाहात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Mohanji Bhagwat ) यांनी केले.
दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येऊन मंडळाला भेट द्यावी म्हणून प्रत्येक गणेशोत्सव मंडळ काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. जबलपूरमधील अशाच एका गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सव मंडपाबाहेर चक्क हत्ती आणून उभा केला आहे. या गजराजाच्या दर्शनामुळे येणाऱ्या भाविकांनाही आनंद झाल्याचे पहायला मिळते. (Gajraj in Jabalpur ganpati pandal)
मध्य प्रदेशातील दमोहमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गोवंश तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांना ज्या कंटेनरमध्ये तस्करी झाल्याचा संशय होता. तो कंटेनर ताब्यात घेण्यासाठी गेल्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात हिंदू संघटनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. २० ते २५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथके छापे टाकत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना दि.१९ फेब्रुव
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, कानपूर) येथील वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्यावर व्याख्यान देताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना घडली तेव्हा ते एका माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्याचे शेवटचे शब्द होते, "तुमच्या तब्येतीची काळजी घ्या...." भाषणादरम्यान स्टेजवर पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. समीर खांडेकर हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या न
मध्य प्रदेशातील दमोहमध्ये शाहवाज खान नावाच्या तरुणावर 'लव्ह जिहाद'चा आरोप करण्यात आला आहे. शाहवाजवर २० वर्षीय पीडित तरुणीने लग्नाच्या नावाखाली बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. दीड वर्षांपूर्वी आरोपी शाहवाज याच्याशी तिची भेट झाल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जबलपूरमध्ये 'वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान'ची पायाभरणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. दरम्यान आरोपी अमजद खान हा फरार आहे. अमजदची पीडितेच्या पतीशी मैत्री होती. याचा फायदा घेत त्याने महिलेचे घरातून अपहरण केले. त्यानंतर तिला भोपाळमध्ये बंधक बनवून तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केला.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुस्लिम तरुणासोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे पिंडदान केलेयं. या आगळ्यावेगळ्या अंत्ययात्रेचे कार्डही छापण्यात आले होते. आपल्या मुलीला लव्ह जिहादचा बळी असल्याचे सांगताना मुलीच्या आईने ती आमच्यासाठी मेली असल्याचे सांगितले. नर्मदा नदीच्या काठावर दि. ११ जून रोजी पिंडदान करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणाला नवा सन्मान मिळाल्याची माहिती दिली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडली बेहन योजने' अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात १००० रुपये जमा केले जाणार आहेत.त्यामुळे १० जून हा दिवस मध्य प्रदेशातील महिलासाठी ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. अनामिका दुबे नावाची हिंदू तरुणी फातिमा झाली. त्यामुळे फातिमाच्या व्हायरल लग्नपत्रिकेवर पोलिसांकडून कारवाईची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. दरम्यान मुलीच्या आईने वराने नाव बदलून आमची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. व्हायरल होत असलेल्या लग्न पत्रिकेमध्ये लग्नाची तारीख ७ जून अशी नोंदवण्यात आली आहे. मात्र , अयाजला क्लीन चिट देताना पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या इच्छेनुसारच लग्न झाल्याची माहिती दिली.
जबलपूर येथील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. जबलपूरच्या गोहलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दमोह नाक्याजवळील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी आग लागली. रूग्णांना बाहेर काढण्यासाठी रुग्णालयात बचाव कार्य सुरू आहे असल्याचे जबलपूरचे जिल्हाधिकारी डॉ इलयाराजा टी यांनी सांगितले.