(Pandharpur Chaitri Yatra) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची यात्रा म्हणजे पंढरपूरची चैत्री यात्रा. या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला येतात. यंदाही या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झाले आहे.
Read More
( Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis ) “पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरासाठी आज मोठी घोषणा केली. मंदिरामध्ये टोकन दर्शन व्यवस्था करणार, तर या दर्शन व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून तब्बल १०३ कोटींचा निधी देणार , अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरमधील विठ्ठल -रुक्मिणी मंदीरातील सभामंडपात केली. तर लवकरात-लवकर हा निधी राज्य सरकारकडून मिळेल.
पंढरपूरच्या वारीला युनेस्को जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा नामांकन प्राप्त व्हावे, याचे संशोधन करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई येथील ‘मे. आभा नारायण लांबा असोसिएट्स’ या आस्थापनाची नियुक्ती केली होती. या आस्थापनाने याविषयीचे संशोधन आणि व्हिडिओ चित्रीकरण पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे सादर केले आहे. पुरातत्त्व विभाग याविषयीचा प्रस्ताव तयार करणार आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून पुरातत्त्व विभागाला 8 लाख 85 हजार रुपये निधी देण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आषाढी वारीसाठी नाशिकमधील विविध आगारांतून तब्बल 300 बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी नाशिकमधून जाणार्या भाविकांची प्रवासाची दगदग टाळण्यासाठी ही विशेष सेवा पुरविली जाणार आहे. आषाढी पंढरपूर यात्रा शनिवार, दि. 13 जुलै ते सोमवार, दि. 22 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीदरम्यान होणार असून यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
लाखो हिंदू भाविकांच अराध्य दैवत असलेलं क्षेत्र ‘पंढरपूर’ याच पंढकपूरमधील विठ्ठलरुख्मिणीच्या मंदीरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर याच मंदिराच्या सुशोभिकरणाच्या दरम्यान विठ्ठल रुख्मिणीच्या मंदिरामध्ये आता एक भूयार सापडले आहे. तसेच हे भुयार सात ते आठ फुटाचे असल्याचे आढळले आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाने ठिकठिकाणी जाळपोळ करत हिंसक रुप धारण केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर बसस्थानकानवर शुकशुकाट पसरलेला आहे.
मुंबई : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५ लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.
असेच काहीसे भक्तीने ओतप्रोत भरलेले क्षण घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वागत केले. दुपारी दोनच्या सुमारास ही पालखी विश्रांतवाडी येथे पुणे शहराच्या हद्दीत दाखल झाली.
शिवसेना सामान्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष असून उभ्या महाराष्ट्राला पांडुरंगाच्या पंढरीत शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी येत्या 24 तारखेला शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे तसेच तालुक्यातील दोन हजार शिवसैनिक पंढरपूरला जाणार असल्याचेही माजी आ. चिमणराव पाटील यांनी कृउबाच्या सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीत सांगितले.