वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तो फरार होता. यादरम्यान, त्याने विविध राज्यांतून प्रवास करत नेपाळ गाठले. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read More
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
( protests in Nepal ) नेपाळमध्ये जनता राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली असून त्यामुळे देशात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र असलेले नेपाळ, आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या बुलंद आवाजाने दुमदुमून गेले आहे. नेपाळी नागरिक मोठ्या संख्येने राजेशाही आणि हिंदूराष्ट्राच्या पुनर्प्रस्थापनेसाठी ओली सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यानिमित्ताने नेपाळचा हिंदूराष्ट्र ते सेक्युलर राष्ट्र हा धार्मिक, राजकीय, सामाजिक इतिहास विशद करणारा हा लेख...
( Yogi Adityanath ) नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे आंदोलनामध्ये समर्थकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही छायाचित्र झळकविले आहे.
दक्षिण तिबेट आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागात मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतात सुद्धा जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल ५३ माणसांना आपला जीव गमवावा लागला असून, ६० लोकं गंभीररित्या जखमी झाले आहेत. इमारतींना तडे गेले असून, अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत.
‘बीआरआय’ प्रकल्पाबाबत चीन आणि नेपाळमध्ये नुकताच एक करार झाला असून, नेपाळने चीनवर विश्वास ठेवण्याचे नको ते धाडस केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास नेपाळने व्यक्त केला असला, तरी ते कितपत शक्य आहे, याबाबत साशंकताच!
नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून वायूसेनेच्या विमानाने त्यांना शनिवारी नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पाळ येथील बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आ
महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तानाहुन इथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बसमध्ये एकूण ४० लोकं असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे बुधवार, दि. २४ जुलै २०२४ एक मोठा विमान अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण भरताना कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नेपाळ भारताचे मित्रराष्ट्र असले तरी नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनाने त्या देशात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण, याठिकाणी पुष्प कमल दहल प्रचंड यांचे सरकार जाऊन पुन्हा के. पी. शर्मा ओली यांचे सरकार आले.
केपी शर्मा ओली यांनी सोमवार, दि. १५ जुलै २०२४ चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेल्या केपी ओली यांनी रविवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
एखाद्या वस्तीचे सोडा, एखाद्या गल्लीचे जरी नाव बदलायचे असले, तरी त्याला खूप सोपस्कार पार पाडावे लागतात. पण, ‘त्यांची’ त्या गावात फक्त दहाच घरे. म्हणून, काय झाले? त्या दहा घरांनी एकत्रित येत गावाचे शतकानुशतकांचे नाव बदलून चक्क ‘इस्लामनगर’ असे केले. हिंदुबहुल नेपाळ मधील ही घटना. त्या गावात केवळ चार टक्के आणि नेपाळमध्ये सध्या पाच टक्के मुस्लीम वास्तव्यास आहेत, हे इथे उल्लेखनीय!
नेपाळमधील कोसी भागात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. सुनसरी जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीवर म्हशीच्या मांस सांगून गायीचे मांस विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेकू महंमद मियाँ असे आरोपीचे नाव आहे. गोहत्येचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकारावरही खुकरीने हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महंमद मियाँला अटक केली आहे. ही घटना रविवार, दि. २६ मे २०२४ घडली.
भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धेत सोयीनुसार दोघांशी सलगी करून त्याची किंमत वसूल करण्याचे धोरण नेपाळने अवलंबले आहे. कधी भारताची शिडी चढायची आणि चीनच्या सापावरून घसरत खाली यायचे आणि कधी चीनची शिडी चढायची, असे केल्यामुळे सत्तेवर राहण्यात प्रचंड यांना यश मिळाले असले, तरी त्यामुळे नेपाळचे नुकसानच झाले आहे.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून लव्ह जिहादचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. नेपाळमधील एका मुलीने अब्दुल सलामवर हिंदू असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केल्याचा आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. तिला जबरदस्तीने मांस खाऊ घातल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ATS पथकाने दि. ३ एप्रिल रोजी नेपाळ सीमेवरून हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील मोहम्मद अल्ताफ आणि सय्यद गझनफर हे पाकिस्तानचे आहेत तर तिसरा दहशतवादी नासिर अली काश्मीरचा आहे. चौकशीदरम्यान त्याने काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याचा मनसूबा स्पष्टपणे सांगितला. काश्मिरी दहशतवादी नसीरने स्वत:ला कारगिल युद्धानंतर दहशतवादी झाल्याचे सांगितले. त्यांच्याकडून अनेक भारतीय बँकांनी जारी केलेली डेबिट आणि क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, महाराजगंज जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांना अटक करून त्यांना एटीएसच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन पाकिस्तानी आणि एक जम्मू-काश्मीरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.
सशस्त्र सीमा बल(एसएसबी) व पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्ह्यात नेपाळ सीमेनजीक २ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळमधून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न एसएसबी व पोलिसांनी सदर प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत एका महिलेसह २ चीनी नागरिकांना पकडले असून मोबाईल, सिम व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
'परत या, राजा देश वाचवा. आमचे प्रिय राजा अमर राहोत, आम्हाला राजेशाही हवी’ असे म्हणत हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांना जगातून जवळजवळ हद्दपार झालेली राजेशाही पुन्हा हवी आहे. देशातील लोकशाही घालवून, पुन्हा राजेशाही आणण्यासाठी, येथील लोक उत्सुक आहेत. इतकेच नव्हे, तर हे लाखो लोक देशाचा राजधर्म हिंदू करा, अशीही मागणी करत आहेत. कुठे घडतंय हे सगळं? तर हे घडतंय आपला शेजारी देश नेपाळमध्ये. तसेही काही वर्षांपूर्वी नेपाळ हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही घोषित असे एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र, नेपाळ कम्युनिस्
शेकडो बुद्ध भिक्षू गुडघ्यावर बसून शांतपणे सहकार्य मागत होते. मात्र, त्याबदल्यात त्यांच्यावर पाण्याचा मारा, पेपर स्प्रे आणि टेसरचा मारा केला गेला. त्या शेकडो भिक्षूंना तुरुंगात डांबले गेले. शांततापूर्ण मार्गाने मागणी करणारे हे भिक्षू आहेत. चीनच्या अधिपत्याततील गार्जे तिब्बती स्वायत्त प्रांतातील डेगे काउंटी येथील वांगबुडिंग टाऊनशीपमध्ये राहणारे. चीनमध्ये ड्रिचू नदीवर २ हजार, २४० मेगावॅटच्या गंगटुओ जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होत आहे. हा परिसर यांगत्से नदीच्या वरच्या भागात. मात्र, या प्रकल्पाला तेथील स्थानिक
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात गुरुवारी, दि. १५ फेब्रुवारी २०२४ सरस्वती देवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर हल्ला झाला. सरस्वतीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिरवणूक ईशानाथजवळील मशिदीसमोर आल्याने वादाला सुरुवात झाली. यादरम्यान भाविकांच्या सोबत असलेल्या प्रशासनावर दगडफेकही करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ हिंदू संघटनांनी वीरगंज बंदची घोषणा केली होती.
नेपाळला 'हिंदू राष्ट्र' बनवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. या मागणीसाठी सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ गोदावरी, ललितपूर येथे सर्वसाधारण समितीची बैठकही सुरू झाली आहे. या बैठकीचे नेतृत्व नेपाळी काँग्रेसचे खासदार आणि केंद्रीय समितीचे सदस्य शंकर भंडारी करत आहेत. नेपाळला पुन्हा ‘वैदिक सनातन हिंदु राष्ट्रा’चा दर्जा कसा देता येईल, यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
अयोध्या येथे नुकताच रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाचे फलित मिळाले आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असताना जगभरातही अनेक देशांनी हा दिवस साजरा केला आहे. तेथील मंदिरांची सजावट करुन विविध प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. त्यापूर्वी सरयूच्या तीरावर ‘राम नाम महायज्ञ’ सुरू होईल. यात सहभागी होण्यासाठी नेपाळमधून २१ हजार पुजारी येत आहेत. आत्मानंद दास महात्यागी उर्फ नेपाळी बाबा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या यज्ञादरम्यान सरयूच्या तीरावर १००८ नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सरयूच्या काठावर १०० एकरांवर टेंट सिटी उभारण्यात आली आहे. त्यात १००८ तंबू लावण्यात आले आहेत. महायज्ञासाठी यज्ञमंडपही बांधण्यात आला आहे.
पाच दिवसांचा रशिया दौरा आटपून, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. ४ ते ५ जानेवारीदरम्यान दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर गेले. या दौर्यात त्यांनी नेपाळसोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच परराष्ट्र मंत्री नेपाळमधील चीनच्या प्रभावाला रोखण्यातसुद्धा यशस्वी झाले. नेपाळसोबत भारताचे ’रोटी-बेटी’चे नातं आहे. पण, डाव्यांची सत्ता आल्यापासून, नेपाळमध्ये चीनचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या, नेपाळमधील चिनी कुरापती बंद करणे, भारतासाठी क्रमप्राप्
व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक
लखनौ : अयोध्येतील राम मंदीराचे २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललला ज्या पाण्याने अभिषेक केला जाईल ते पाणी नेपाळच्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले आहे.
सध्या न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे सुरूयं. आजच माझ्या मित्रानं पण मला एक रिल पाठवली. कारण कुठे फिरायला जायचंयं हे हल्ली रिल्सपाहून मित्रमंडळी ठरवतात. कमी खर्चात नेपाळ फिरायचयं? चला तर मग आमच्या ट्रॅव्हल कंपनीशी त्वरित संपर्क करा. डीएम करा, अशा रिल्सचा सध्या महापूर आलायं. पण समजा त्यांचं ऐकून आपण नेपाळला गेलो आणि तिथेच अडकलो तर? तुम्ही म्हणाल आम्ही नेपाळमध्ये का अडकू? तर आज तुम्हाला मी अशीच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५८ पर्यटकांसोबत घडलेला थरारक अनुभव सांगणार आहे. हे प्रवासी सध्या सुखरुप घरी पर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे नागरीक नेपाळ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असता त्यांना तीथे काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आले या प्रसंगी त्यांना या संकटातून सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राममंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी नेपाळ विविध प्रकारची स्मृतीचिन्हे पाठवणार आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे दागिने, भांडी, कपडे आणि मिठाई यांचा समावेश आहे. माय रिपब्लिका या नेपाळी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही स्मृतिचिन्हे जनकपूरधाम ते अयोध्याधाम असा प्रवास करणार आहेत. हा प्रवास जलेश्वर नाथ, मलंगवा, सिमरौनगड, गधीमाई, बीरगंज ते बेतिया, कुशीनगर, सिद्धार्थनगर गोरखपूर मार्गे केला जाणार आहे.
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील 108 मदरशांमध्ये विदेशी निधीचा पुरावा सापडला आहे. शिक्षणाच्या नावाखाली या मदरशांना आखाती देशांकडून सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. हा पैसा कुठे खर्च झाला याचा तपास उत्तर प्रदेश एसआयटी करत आहे. यूपी सरकारने मदरशांना दिल्या जाणाऱ्या निधीची चौकशी करण्यासाठी एडीजी मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली. अहवालानुसार, एसआयटीच्या तपासात 108 मदरशांना परदेशी निधी दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. या मदरशांकडून त्यांच्या बँक
भारत आणि अफगाणिस्ताननंतर आता नेपाळ सरकारनेही चिनी शॉर्ट व्हिडिओ ॲप 'टिकटॉक' (TikTok) वर बंदी आणली आहे. टिकटॉक अॅप नेपाळमधील सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाला हानी पोहोचवत असल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
नेपाळमध्ये शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भुकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के नेपाळसह भारतातील अनेक भागांमध्ये जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यात जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
आपल्या संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या पाऊलखुणा वाचणे, ही एक आनंदाची पर्वणी! ही संस्कृती बहरली ती तिला लोकांनी आपलीशी केली, शाश्वत (time tested) होती म्हणून. जिथे-जिथे भारतीयांनी प्रवास केला, तिथे-तिथे तिनेही प्रवास केला आणि तेथील लोकांनी ती आत्मसात केली. म्हणूनच तिच्या पाऊलखुणा आजही जगभरात सर्वत्र दिसतात. या पाऊलखुणा विध्वंसक नाहीत, तर जगाच्या सौंदर्यात भर टाकणार्या, रचनात्मक आहेत. त्या जीवनातील सृजनशीलतेला, आयुष्याच्या रसरशीतपणाला वाढवणार्या आणि त्या सर्वेश्वर जगतव्यापी, परमोच्च शक्तीबरोबर सर्वांना एकरूप कर
इस्त्रायलवर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जवळपास १० नेपाळी विद्यार्थी ठार झाले असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यामुळे इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळ आजवर कधीही परकीय गुलामगिरी न पाहिलेला हा देश. पण, नेपाळमध्ये 2008 साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर तेथील कॅम्युनिस्ट पक्षाने सत्तेत येताच, भारतापेक्षा आपल्या विदेशनीतीमध्ये चीनला झुकते माप देण्यास प्रारंभ केला. माजी पंतप्रधान के. पी. ओली यांनी तर भारतासोबत अनावश्यक सीमावाद उकरुन काढून चीनला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न अख्ख्या जगाने पाहिला.
यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नेपाली समाज सेवा संस्थात देखील गणरायाचे आगमन झाले आहे. नेपाली समाज सेवा संस्थाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे २६वे वर्ष आहे.
मणक्याचा आजार, बोलण्यातील शारीरिक व्यंग अशा अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी जगण्यातला आनंद शोधला आणि इतरांनाही दिला. जाणून घेऊया गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्याविषयी...
कार्यक्षम सीमापार व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी ‘एलडीबी’ने आता नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार केला आहे आणि एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बंदराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारताच्या ‘एक्झिम कंटेनर’ अर्थात आयात आणि निर्यात करणार्या कंटेनरचा मागोवा घेण्यासाठी सागरी ट्रॅकिंग प्रणालीदेखील वापरली जात आहे.
सीमा हैदरच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रत्यक्षात दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या हबीब बँकेशी सीमाचे संबध असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील हबीब बँकेच्या माध्यमातून सीमाशी संपर्क साधला जात होता. तसेच त्या बँकेच्या माध्यमातून सीमाला मदत ही केली जात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांचा परस्पर करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानी हबीब बँकेने हिमालय बँकेच्या सहकार्याने नेपाळमध्ये आपल्या शाखा उघडल्या. अमेरिकेत हबीब बँकेवर अल कायदासारख्या मो
सीमा हैदर हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्ज पाठवला आहे. त्या अर्जात भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तुरुंगात आयुष्य घालवणार, पण पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन माझं आयुष्य असल्याचे सांगत.सीमा म्हणाली की, तिचा एकच गुन्हा आहे की ती नेपाळमार्गे भारतात आली. दरम्यान, सचिनसोबतच्या तिच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
सीमा हैदर आणि सचिन अचानक गायब झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ३६ तासांपासून सीमा आणि सचिन मीणा गायब आहेत. पब्जी खेळताना सचिनवर प्रेम झाल्यानंतर सीमा पाकिस्तानच्या कराचीतून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती, असा दावा तिने केला होता.त्यानंतर तिने सचिन मीनासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.यानंतर त्यांचे व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. ग्रेटर नोएडा या ठिकाणी ते राहत होते.
महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोकण रेल्वे आता दोन देशांमध्ये रेल्वे लिंक जोडण्याचे काम करणार आहे. भारत-नेपाळदरम्यान रेल्वे लिंक तयार करण्याची एक मोठी जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली होती. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करून व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला देण्यात आली.
भारताने सुद्धा आपली पारंपरिक लढाईची क्षमता पद्धतशीरपणे वाढवत राहायला पाहिजे. चिनी कारवायांवरती लक्ष ठेवून त्या कारवायांचे विश्लेषण वेळोवेळी करत राहिले पाहिजे आणि कुठल्याही चिनी कारवाईला प्रत्युत्तर देण्याची क्षमता निर्माण करत राहिले पाहिजे.
नेपाळचे धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेतून पुन्हा राजेशाहीत रुपांतर करावे, अशी मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे प्रचंड यांनी आपल्या भारत भेटीत आपली धार्मिक ओळख दाखवण्याचे प्रयत्न केले.
मुंबई : नेपाळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनाच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे समारे आले आहे. नेपाळमध्ये २०२१ मध्ये जणगणना करण्यात आली होती. त्या जणगणनेचे तपशील आता समोर आले आहेत. त्या तपशीलानुसार, नेपाळमधील जाती आणि विविध जमातींची संख्या १४२ च्या पुढे गेली आहे. २०११ च्या जणगणनेत जाती आणि जमाती यांची संख्या १२५ होती ती आता १४२ च्या पुढे गेल्याचे उघड झाले आहे.