वायनाड लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नव्या हरिदास यांनी केला आणि त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात केली आहे.
Read More
'आयएनएस गुलदार'या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
( indian navy Shoot-to-kill orders ) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत गस्त वाढवण्यात आली आहे.
भारत आणि फ्रान्सने सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ६३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात हा करार करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या महिन्याच्या सुरुवातीला या कराराला मंजुरी दिली होती.
(Pahalgam Terror Attack Updates) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला आहे.
( Rafale Marine contract worth Rs 63,000 crore for the Navy ) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने (सीसीएस) भारतीय नौदलासाठी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीला बुधवारी मंजुरी दिली आहे. सुमारे ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा करार फ्रान्ससोबत सरकार-ते-सरकार करारांतर्गत केला जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
‘ Merchant Navy’ अर्थात व्यापारी जहाजांचे सध्याच्या काळात असलेले महत्त्व हे वादातीत आहे. अनेक देशातील खलाशी या क्षेत्रामध्येच यशस्वी करिअर घडवितात. देशालादेखील यातून लाभच होत असतो. मात्र, या खलाशांच्या जीवनावर मात्र कायमच धोक्याचे सावट असते. त्यात अनेकदा अडचणीमध्ये सापडल्यावर कंपन्यादेखील या खलाशांना वार्यावर सोडून देतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. आजकाल या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्यामुळे खलाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्याच्या पालनाची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर आ
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ( Navy ) ताफ्यात येत्या १५ जानेवारी रोजी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रियंका गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कौटुंबिक संपत्ती लपवल्याचा आरोप भाजपच्या नाव्या हरीदास यांनी केला आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांचा विजय रद्द करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदल सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे ‘आयएनएस तुशील’ ( INS Tushil ) ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. ‘आयएनएस तुशील’ ही प्रोजेक्ट ११३५.६ची क्रिवाक खखख श्रेणीची अपग्रेड केलेली युद्धनौका आहे. ‘आयएनएस तुशील’ युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉन एक्स्पोर्
(INS Arighaat) भारतीय नौदलाने आयएनएस अरिघात या पाणबुडीवरून ३,५०० किमी अंतराच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या के४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताची मारकक्षमता सिद्ध करणारी आहे.
मुंबई : ( Matangi Boat ) दिल्लीत स्वावलंबन २०२४ कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या सागरमाला परिक्रमेला हिरवा झेंडा दाखवला होता. क्रू नसलेल्या या बोटीचाही या कार्यक्रमात समावेश होता. या ‘मातंगी बोटी’ने ६०० किलोमीटर अंतराचा प्रवास चालकाशिवाय केला. देशातील पहिल्या स्वायत्त या बोटीने नुकताच नवा विक्रम प्रस्थापित केला. ही ‘ऑटोनोमस मोड’वर चालणारी बोट भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचा वापर सागरी सीमेवर पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षा मोहिमांसाठी केला जाईल.
Navya Haridas : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विरूद्ध नाव्या हरिदास असा सामना रंगणार आहे. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने ? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून
भारतीय जनता पक्षाने १९ ऑक्टोबर रोजी, केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नाव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवरुन त्यांचा सामना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्याशी होणार आहे.
इंट्रो - दि. 7 ऑक्टोबर रोजी ‘इस्रायल-हमास’ युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता या युद्धामध्ये इराण, हुथी आणि ‘हिजबुल्ला’ मोठ्या संख्येने भाग घेत आहे. रशिया युक्रेन युद्धाबरोबर इस्रायल-इराण युद्धाचा जगावरती आणि भारतावरती मोठा प्रभाव पडत आहे.भारत वेगवेगळ्या प्रभावाला कशा प्रकारे सामोरे जात आहे, याचे विश्लेषण करणारा हा लेख.
भारतीय नौदलासाठी खरेदी करावयाच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आला आहे.
भारतीय नौदलासाठी खरेदी करावयाच्या राफेल लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आला असून फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनने भारतास अनुकूल किंमतीचा प्रस्ताव दिल्याचे समजते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
भारतीय नौदलाच्या ‘माल्पे’ आणि ‘मुल्की’ या दोन पाणबुडीविरोधी जहाजांचे कोची येथे जलावतरण करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालय भारतीय नौदलासाठी सात प्रगत फ्रिगेट्स आणि लष्करासाठी टी-७२ रणगाड्यांऐवजी आधुनिक फ्यूचर रेडी कॉम्बॅट व्हेइकल्स (एफआरसीव्ही) वापरण्याचा सुमारे १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेणार आहे.
भारतीय नौदल आणि बीईएमएल इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून सागरी उपकरणे आणि यंत्रणा यांच्या स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत.
अमेरिकन नौदलाचे 'मंटा रे' ड्रोन सॅटेलाईटवर दिसल्याने नवी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमेरिकन सागरी ड्रोन कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्युनेमे येथील नौदल तळावर दिसले होते. विशेष म्हणजे मंटा रे ड्रोनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
भारताने प्रादेशिक संरक्षण मुत्सद्देगिरी, प्रतिबद्धता आणि समस्या-आधारित भागीदारीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे, असे शुक्रवारी येथे शांग्री-ला संवादाच्या एका प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले गेले आहे. अहवालात माहितीनुसार भारत-चीन संबंध आणखी बिघडल्यास संरक्षण संबंध आणखी बहिष्कृत होऊन या प्रदेशात दोन प्रादेशिक शक्तींमध्ये वाढत्या ध्रुवीकरणाचे स्वरूप येऊ शकते. आशिया-पॅसिफिक रिजनल सिक्युरिटी असेसमेंट (एपीआरएसए) या अहवालात म्हटले आहे की, पसंतीच्या सुरक्षा भागीदाराच्या स्थितीमध्ये प्रादेशिक प्राप्तकर्त्या
इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना गुरुवारी सोडण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताने मोठा कुटनितीक विजय मिळवला आहे. भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने अलीकडेच ताब्यात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजाच्या क्रू सदस्यांपैकी पाच भारतीय खलाशांना सोडले आहे. पाच भारतीय खलाशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत इराणहून भारतासाठी रवाना होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि खलाशांच्या सुटकेब
'ऑकस’ - ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका हा तीन देशांच्या आद्याक्षरांनी बनलेला एक त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी करार. या करारांतर्गत ब्रिटन आणि अमेरिका ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्यांचे तंत्रज्ञान देणार आहेत. २०२१ साली करण्यात आलेल्या करारामुळे जागतिक राजकारणात मोठा भूकंप आला.
लाल समुद्रातील सोमालियन समुद्रीचाच्यांमुळे जलमार्गाने होणार्या आंतरराष्ट्रीय व्यापार्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील आपली गस्तदेखील वाढवली असून, एका अपहरण केलेल्या जहाजावरुन क्रू मेंबर्सची सुटका करण्यातही यश आले. त्यानिमित्ताने नौदलासमोरील सागरी सुरक्षेची आव्हाने आणि उपाययोजना यांचा आढावा देणारा हा लेख...
सध्या ४५ हून अधिक सशस्त्र संघर्ष मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांमध्ये, गटांमध्ये, प्रदेशांमध्ये चालू आहेत. हे देश आहेत- सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, लिबिया, मोरोक्को, पॅलेस्टाईन, सीरिया, तुर्की, येमेन, पश्चिम सहारा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, युक्रेन आणि अनेक इतर देश. यामधील सर्वात दोन मोठी युद्ध म्हणजे, दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले, रशिया-युक्रेन युद्ध आणि ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेले इस्रायल आणि हमास युद्ध. वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली युद्धे आणि संघर्ष हे शस्त्रे आणि युद्धाला लागण
पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली असून गेल्या ५ महिन्यांतला हा दुसरा हल्ला आहे. या हल्ल्यासंदर्भात एक ऑडिओही व्हायरल झाला आहे.
अविष्कार जगताप आणि निवृत्ती बागुल या दोन तरूणांसाठी ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन ने पूढाकार घेतला होता. हे दोन तरूण ११ डिसेंबर २०२३ या दिवशी ईराण येथे शिपवर गेले होते. अशा नविन तरूणांना शिपवर पाठवतो असे सांगून त्यांना सेल्फ ईमायग्रेशन (पीओई)च्या माध्यमातून ईराण येथे पाठवण्यात आले होते.
संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी नऊ आणि भारतीय तटरक्षक दलासाठी सहा गस्ती विमाने खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. या करारानुसार, मेड इन इंडिया प्रकल्पांतर्गत देशात १५ सागरी गस्ती विमानांची निर्मिती केली जाणार आहे. हा करार एकूण २९ हजार कोटी रुपयांचा असेल. त्यासोबतच, बुधवारी संरक्षण मंत्रालयाने कानपूरस्थित कंपनीसोबत १७५२.१३ कोटी रुपयांचा करारही केला.
कतारमध्ये अनेक महिन्यांच्या वेदनादायक बंदिवासानंतर सुटका करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांपैकी सातजण आज मायदेशी परतले आहेत. कथित हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या माजी नौसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच त्यांची सुटका झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
लक्षद्वीपला जर मालदीवप्रमाणे पर्यटन विकसित करायचे असेल, तर दोन मोठ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. तिथे असलेली सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा विकास केल्यास पर्यटक तिथे मोठ्या संख्येने दाखल होतील. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा ने कोचीच्या किनारपट्टीपासून सुमारे ८०० मैल दूर समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे. सोमाली चाच्यांविरुद्ध भारतीय नौदलाची कारवाई सुरूच आहे. भारतीय नौदलाने २४ तासांत दुसऱ्यांदा अल नामी या मासेमारी जहाजाची सुटका केली आहे.
भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या जहाजाने सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर समुद्री चाच्यांचा डाव उधळून लावत एफव्ही इमान या जहाजाची सुटका करून चाचेगिरी विरोधात आणखी एक यशस्वी मोहीम आपल्या नावे केली आहे. या मोहिमेत आय एन एस सुमित्राने मासेमारी जहाज अल नईमी आणि त्यातील कर्मचाऱ्यांची (19 पाकिस्तानी नागरिकांची) 11 सोमाली चाच्यांपासून सुटका केली.
'इस्रायल-‘हमास’ युद्धात हुती बंडखोरांनी ’हमास’ला समर्थन देत, लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा प्रतिकार आक्रमक पद्धतीने केला.
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी अदानी समुहाच्या 'अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस' द्वारे निर्मित दृष्टी १० स्टारलाइनर ड्रोन सादर केले आहे. हैदराबाद येथे असलेल्या अदानीच्या ड्रोन निर्मिती कारखान्यात भारतीय तंत्रज्ञानाने ते तयार करण्यात आले आहे.
भारतीय समुद्र सीमेच्या हद्दीत व्यापारी जहाजांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांनंतर, भारतीय नौदलाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दि.३१ डिसेंबर २०२३ रविवारी भारतीय नौदलांनी व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी 'विध्वंसक' आणि 'फ्रीगेट्स'ची तैनाती केली आहे. भारताच्या समुद्र सीमेच्या हद्दीत कोणतीही अनूचित घटना घडल्यास नौदलाने व्यापारी जहाजांना सुरक्षा प्रदान करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
यमनमधील हुथी बंडखोरांनी दि. २४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात तेल वाहून नेणाऱ्या आणखी एका जहाजाला लक्ष्य केले आहे. या जहाजावर भारताचा ध्वज होता. अशी माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली आहे. या जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. ड्रोन हल्लानंतर तेलवाहू जहाजाने लाल सागरात उपस्थित असलेल्या अमेरिकन युद्धनौकेला धोक्याचा इशारा पाठवण्यात आला होता.
हुथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे लक्ष्य केलेल्या गॅबॉन जहाजावर भारतीय ध्वज नव्हता, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. दि.२४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात एक मालवाहू जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची माहिती देताना, अमेरिकी नौदलाने मालवाहू जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा केला होता. पण आता भारतीय हवाई दलाने अमेरिकी नौदलाचा दावा फेटाळला आहे.
अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून ते सौदी अरेबियातून भारतातील मंगलोरसाठी निघाले होते. भारतीय किनार्यापासून 217 सागरी मैल अंतरावर झालेल्या या हल्ल्यानंतर लगेचच भारतीय नौदल सतर्क झाले आणि त्यांनी आपले लढाऊ नौदल जहाज घटनास्थळी पाठवले.
दि. १६ डिसेंबर रोजी १९७१च्या युद्धाला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहे. याशिवाय दि. १९ डिसेंबर १९६१च्या गोवा मुक्ती संग्रामाला यंदा ६२ वर्षं पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले, सैनिकी अधिकारी होते-लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या शौर्यगौरवाचा आढावा घेणारा हा लेख...
दि. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांनी पांढरे निशाण फडकवले. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युअल अँटोनिओ वसालो इ सिल्वा याने त्या दिवशी रात्री ८.३० वाजता भारतीय सेनापतींसमोर शरणागतीच्या करारावर सही केली. गोवा मुक्त करून, भारतीय संघराज्यात दाखल करण्याच्या, या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव होते-‘ऑपरेशन विजय.’ गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख...
अरबी समुद्रात सागरी गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या मोहिमेअंतर्गत तैनात करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मने माल्टा-ध्वज असलेल्या एमव्ही रौन या जहाजाच्या अपहरणाला वेगवान प्रतिसाद दिला आहे. १८ जणांच्या क्रूसह जहाजाने १४ डिसेंबर २०२३ रोजी युकेएमटीओ पोर्टल पीएमवर ‘मे डे’ संदेश पाठवला होता.
मराठ्यांच्या आरमाराला समुद्राचे दरवाजे उघडणार्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाने केलेला मोठा सन्मान होता. नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शं नो वरुणः’ हे भारतीय परंपरेतील बोधवाक्य आहे. याचा अर्थ ’पाण्याची देवता वरूण आपल्यासाठी मंगलकारी होवो.’ नौदलाचा नवीन ध्वज म्हणजे आपली स्वतंत्रतेकडे केलेली वाटचाल आहे.
चिनी तटरक्षकांच्या जहाजांनी लागोपाठ दुसर्या दिवशी (दि. १० डिसेंबरला) फिलीपाईन्सच्या जहाजांवर पाण्याच्या तोफांनी हल्ला केला. फिलीपाईन्सच्या नौका आणि एस्कॉर्ट जहाज दक्षिण चीन समुद्रातील विवादित शोलजवळ सैन्याला अन्न पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना, हा सामना झाला. गेल्या काही महिन्यांपासून विवादित शोलमध्ये (एका छोट्या बेटावर) स्थित असलेल्या फिलीपाईन्स नागरिकांना आणि त्या शोलला चिनी जहाजांनी वेढा दिलेला आहे. त्यांना अन्नधान्य पोहोचण्याचा प्रयत्न फिलीपाईन्सकडून चालूच असतो. त्यानिमित्ताने दक्षिण चीन समुद्रातील ची
लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली आयएनएस चेन्नई च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रवीण नायर यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या त्या पहिल्या महिला अधिकारी असतील.
पूर्व समुद्रात ‘गाझी’चा निकाल लागत असतानाच, इकडे पश्चिमेला भारतीय नौदलाने कराचीवर जबर हल्ला चढवला. दि. ४ व ५ डिसेंबर आणि पुन्हा दि. ८ व ९ डिसेंबर असे लागोपाठ दोन हल्ले चढवून नौदलाने कराचीचं पेकाट मोडून टाकलं.
नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
भारतीय नौदलाचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौदलाच्या गणवेशावर उमटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे केली. नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावे देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला.