भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या समाजमाध्यमांवरील प्रोफाईल तपासणीचा ट्रम्प सरकारचा निर्णय हा अमेरिकेच्या दादागिरीची मक्तेदारीच सिद्ध करणारा म्हणावा लागेल.
Read More
वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्याची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील १९ वर्षीय रेना ओ'रूर्के हिने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'डस्टिंग चॅलेंज'मध्ये भाग घेतला. या धोकादायक ट्रेंडमध्ये कीबोर्ड क्लिनिंग स्प्रेचा वास घेतला जातो. रेनाला हे करताना हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोमात गेली. तीला लगेच उहचारांसाठी इस्पीतळात नेण्यात आले. चार दिवसांच्या उपचारांनंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
जो काळाच्या पुढे विचार करतो, तोच राज्यकर्ता दिशादर्शक काम करू शकतो, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दाखवून दिले. डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्र सरकारने आणलेले जाहिरात धोरण, हे त्याचे ठळक उदाहरण.
(Who is Madam N )पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रावर कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात सहज प्रवेश मिळवून देणाऱ्या आणि 'आयएसआय'च्या सहाय्याने गुप्त नेटवर्क तयार करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. नोशाबा शहजाद असं तिचं नाव असून ती ‘जय्याना ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या ट्रॅव्हल एजन्सीची मालक आहे आणि पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक मानली जाते.
माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५' देऊन करण्यात आला. 'माई मीडिया २४' प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने व प्लँनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर
सोशल मीडिया इन्फ्लूएझर्समध्ये अचानक काळा तांदूळ हा प्रसिद्ध होऊ लागला आहे. मात्र, हा तांदूळ नेमका कुठे पिकतो? कुठे विकाला जातो? त्याची किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Women Media Workers Conference ‘विश्व संवाद केंद्रा’तर्फे पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील महिला माध्यमकर्मींचे संमेलन नुकतेच पार पडले. माहितीचा अखंड ओघ, सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान, विविध विचारधारांचा प्रभाव आणि सद्यस्थितीत आव्हानात्मक परिस्थिती सर्व क्षेत्रांत आहे. ती स्वीकारत वास्तवाला विवेकाची जोड देत सातत्याने समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी माध्यमातील ‘ती’ जाणून घेण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचा मागोवा घेणारा हा लेख...
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. विशेषतः एक्स या प्लॅटफॉर्मवर ते दररोज रात्री आपली दिवसाची सांगता खास "T-" या क्रमांकासह ट्विट करतात. त्यांच्या या खास ट्विटसचा एक वेगळा फॅनबेस आहे. पण अमिताभ बच्चन गेल्या २० दिवसांपासून दररोज एक ट्विट करत आहेत, पण हे ट्विट पूर्णपणे रिकामं असतं – फक्त "T-" असा क्रमांक असतो आणि त्याशिवाय काहीही नाही.
“माझा देश हा विनाकारण पुरावे नसताना भरडला जात आहे. इथल्या नागरिकांवर बेछुट हल्ले केले जात आहेत. माझ्या देशावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच. मला माझ्या देशावर अभिमान आहे. पाकिस्तानला विनाकारण पुरावे नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.”, अशी गरळ पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने ओकली आहे.
धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसे जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते आणि लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले.
भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला, पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडियावर बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने पाकिस्तानमधील १६ युट्युब चॅनल्स बंद केले होते. आता त्या बरोबरच भारतातील युजर्ससाठी काही पाकिस्तानी कलाकारांची इन्स्टाग्राम अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत.
सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्
काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारी २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेवर अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी रात्री एक भावनिक आणि संतप्त व्हिडीओ शेअर करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. काश्मीरी पंडित असलेले अनुपम खेर यांनी दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसारख्या अॅप्सची मातृत्व संस्था असलेल्या ‘मेटा’ या कंपनीला दि. 14 एप्रिल रोजी अमेरिकेत न्यायालयाचा दणका बसला. ‘अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन’तर्फे ‘मेटा’ आणि संस्थापक मार्क झुकरबर्गविरोधात समाजमाध्यमांवरील एकाधिकाराचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. याचमुळे कंपनी दुभंगण्याची शक्यता आहे त्याविषयी...
बंगळुर : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बँक जनार्दन यांचे रविवारी रात्री, १३ एप्रिलला निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जनार्दन गेल्या काही काळापासून आजारी होते आणि त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याच प्रकरणी शनिवारी ५ एप्रिल रोजी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या याचिकेवर मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
महाराष्ट्र पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या 'नया भारत' या कार्यक्रमाला २ फेब्रुवारी रोजी हजर असलेल्या लोकांना नोटिसा पाठवल्या. या नोटिस सीआरपीसी कलम १७९ अंतर्गत जारी करण्यात आल्या असून, या कलमानुसार पोलिसांना साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे.
Kunal Kamra स्टँडअप कॉमेडियन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ती गरळ ओकत आहेत. मागे काही दिवसाआंधी रणवीर अलाहाबादियाने खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कमराने सध्याच्या राज्य सरकारवर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एका कवितेच्या माध्यमातून विडंबन पद्धतीचा वापर चांगलंच टोकलं आहे. यामुळेछ आता कुणाल कामरा हा चांगलाच गोत्यात आला आहे.
मुंबई : जपानी अॅनिमेशनमध्ये वेगळीच जादू निर्माण करणारी स्टुडिओ घिबली (Studio Ghibli) ही कंपनी त्यांच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मऊ, जलरंगसदृश पार्श्वभूमी, सूक्ष्म तपशील असलेल्या दृश्यरचना आणि भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टींमुळे ही शैली जगभर लोकप्रिय झाली आहे. माय नेबर टोटोरो (My Neighbor Totoro), स्पिरीटेड अवे (Spirited Away), प्रिन्सेस मोनोके (Princess Mononoke) यांसारख्या चित्रपटांमुळे घिबली (Ghibli) अॅनिमेशनला एक वेगळाच दर्जा मिळाला.
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशक
काल दिवसभर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर आपण सगळ्यांनीच ऐकले. हे गाणे व्हायरल झाल्यावर अपेक्षित ती जळजळीत प्रतिक्रियाही शिवसेनेकडून आलीच. पण, त्यानंतर महाराष्ट्रात कशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते, इथे कशी हिटलरशाही आहे, कलाकारांना, त्यांच्या विनोदी कलेला कशी किंमत नाही वगैरे प्रतिक्रिया ठाकरे गटासह विरोधकांच्या तोंडून बाहेर पडल्या. आता असेच एखादे टीकात्मक गाणे उद्धव ठाकरेंवर कॉमेडीच्या नावाखाली क
‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन...
बॉलिवूडमध्ये सध्या एका अनोख्या गोष्टीची जोरदार चर्चा आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील रॅप वॉर एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान दोघांनी स्टेजवर एकमेकांना रॅपमधून टोले हाणले, आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग नेहमीच आपल्या अनोख्या स्टाइल आणि दमदार गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली असून, त्याचा चाहता वर्ग संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मात्र, सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मराठीत संवाद साधताना आणि मराठी गाणं गाताना दिसत आहे!
Unnav उत्तर प्रदेशातील उन्नवमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आपल्या पथकांसोबत घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
Shri Ram उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील धामपूरमध्ये एका कट्टरपंथी मुस्लिम समाजाच्या युवकाने प्रभू श्री राम आणि माता सितेबाबत गरळ ओकत पायरी सोडली आहे. संबंधित देवदेवतांचे फोटो शेअर करत त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शुक्रवारी दुरापी ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. अनेक गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांना कायमच विशेष स्थान मिळालं आहे. आता या परंपरेत भर घालत, समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आहे.
इंडियाज गॉट लॅटेंट या यूट्यूब शोवरील रणवीर अल्लाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, शोचे निर्माता आणि प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याला त्याचा मित्र मुनावर फारुकीने पाठिंबा दिला आहे.
सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीकरिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या जाहीरात प्रसिद्धीकरिता सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
(Pranit More Assault Case) स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापूरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने कार्यक्रम संपल्यावर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टद्वारे देण्यात आली होती. अशातच आता याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
समाजात अलीकडील काळात मोबाईल फोन हाती आल्यानंतर जे वाट्टेल तसे अभिव्यक्त होण्याचे ‘फॅड’ आले आहे, ते पाहता यातील बहुतांश प्रमाणात समाजातील संवेदनशून्यताच दुर्देवाने अधिक प्रभावी ठरू पाहत आहे. जसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे ( Insensitive ) आणि युट्यूबवरून नको असलेली व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित केली जातात, तसेच आजकाल रिल्सच्या माध्यमातून तर भयंकर प्रकार उजेडात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून केवळ समाजातील मानसिकता आणि संवेदनशून्यता प्रकर्षाने जाणवत असली, तरी त्यावर बंधने आणण्याची व्यवस्थाच कूचकामी असल्याचे देखी
Minor girl raped एका नऊ वर्षीय मुलाने अवघ्या तीन वर्षीय मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यातील कोंढवा परिसर रविवारी हादरुन गेला. पण, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य केल्याची त्या इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलाने दिलेली कबुली! यानिमित्ताने मुलांकडून होणारा सोशल मीडियाचा गैरवापर आणि कठोर निर्बंधांची आवश्यकता पुनश्च अधोरेखित झाली आहे.
कॉमेडियन सुनील पाल यांनी आपल्या विनोदी अभिनय शैलीने सगळ्यांनाच खळखळून हसवले होते. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी कामं केली आहेत. मात्र, सध्या सुनील पाल त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. सुनील पाल यांच्या पत्नीने त्यांच्या बेपत्ता होण्याची ३ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार केली होती. मात्र आता या घटनेसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बेपत्ता झालेले सुनील पाल २४ तासांमध्ये सापडले असून त्यांचे पोलिसांशी बोलणे झाल्याची माहिती देखील पाल यांच्या पत्नीने दिली आहे.
(Social Media) सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करणारे सध्याचे कायदे मजबूत करण्याची नितांत गरज आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडावल्या. मात्र, सोशल मीडियात ( Social Media ) प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची २४x७ करडी नजर असणार आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार ( Voters ) जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
मागील काही दिवसांत विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांना पेव फुटले होते. या खोट्या धमक्यांचा समाज माध्यमांवरून होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. समाज माध्यमांनी विहीत कालमर्यादेत अफवा हटवाव्यात, धमक्यांबाबत तपशीलवार कळवावे आणि यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश सरकारने मार्गदर्शक सूचनांच्या द्वारे संबंधितांना दिले आहेत.
तेलंगणातील हैदराबादमध्ये कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. कट्टरपंथी जमावाने सोशल मीडियावर इस्लामविरोधी कथित पोस्टच्या निषेधार्थ जमला होता. जमावाने हैदराबादमध्ये रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करत सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसही मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर असल्याचे पाहायला मिळाले.
Hindu उत्तर प्रदेशात सुलतानपूर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर हिंदू धर्माबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शाहिद कुरेशी, अयान अहमद, हसनैन आणि आणखी एकावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आईने याप्रकरणात पोलिसांनी बुधवारी २ ऑक्टोबर रोजी एफआरआय दाखल करण्यात आली असून याप्रकरणीचा पुढील तपास सुरू आहे.
‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. अद्वैत थिएटर संस्था १८ वर्षे रंगभूमीवर सक्रीय कार्यरत असून आजवर दर्जेदार २६ नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अद्वैत थिएटर संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजले
हिंदी बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीत गेला असता त्याला ही धमकी देण्यात आली असून तो तातडीने मुंबईला रवाना झाला आहे, दरम्यान, शनिवारी दिल्लीतल्या इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली.
Social Media ऑस्ट्रेलियात १३-१४ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणण्यासाठी कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. त्यासंबंधीचे सूतोवाच पंतप्रधान अॅन्थोनी अल्बानीस यांनी नुकतेच केले. पण, केवळ सोशल मीडियावरील बंदीने आजच्या डिजिटल विश्वातील सगळेच प्रश्न सुटतील का? यासंबंधीचे चिंतन...
आजच्या काळात मानवी जीवनात समाजमाध्यमांनी एक विलक्षण पगडा निर्माण केला आहे. मुक्तपणे आपले विचार मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ही समाजमाध्यमे. पण, काही समाजमाध्यमे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजविघातक मजकुरालाही समर्थन देताना दिसतात.